सवत...
सवत...
"पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंतले"....
हरी असाच दारू ची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता... चालत चालत तो रेल्वे क्रॉससिंग ला पोचला...
गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टरीवर बसला आणि जोर जोरात गाणे म्हणू लागला, हरी ला नशेत तो काय करतोय की कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती तितक्यात जोरात गाडी चा आवाज आला पण हरी ला काहीच शुद्ध नव्हती तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता.....
गाडी चा आवाज हळू हळू मोठा होत होता हरी ने जसच बघितलं की गाडी जवळ येत आहे तो उठला आणि गाडी च्या समोर पट्टरीच्या मधोमध येऊन थांबला...
त्याने डोळे बंद केले आणि दारू ची बाटली हातातून सोडली आणी हळूच म्हणाला "ईशा".….
हरी चा जीव मात्र जाणारच होता तितक्यात एका मुलीने जोरात हरीचा हाथ ओढला आणि हरी पट्टरीवरून खाली पडला, गाडी निघून गेली....
हरी ला काही समजलच नाही की नेमकं काय झालं, तो उठला आणि स्वतः सोबतच बोलायला लागला.…
"मी मेलो की नाही, स्वर्ग कुठे आहे.... सगळं काळं काळं दिसतंय हम्म नरक असेल हे"...
"यमदेव कुठे तुम्ही .... मी हरी, आलो इथं स्वागत करा माझा"...
तितक्यात ती मुलगी बोलली... "जिवंत आहे तू , समजलं का जा आता घरी"....
"जिवंत, तू वाचवलंस मला"...
"हो मीच अजून कोण दिसतंय का तुला इथं मीच वाचवलं तुला"....
"का वाचवलं मला, ए बघ ऐक घरी जा खूप रात्र झाली आहे घरी तुझी वाट पाहत असेल आई जा, हा जा"...
"ते तू समझ घरी, आई तुझी वाट पाहतेय, का स्वतः सॊबत असं करतोय जा घरी जा"... ती मुलगी अगदी प्रेमाने हरी ला बोलली
हे ऐकताच हरी परत खाली बसला आणि रडू लागला....
"काय तोंड घेऊन घरी जाऊ, मला नाही जगायचं, मी खूप चुका केल्या पण आता बस आता माझा कडून नाही होत आहे"....
"तू काहीच चुकीचा केलं नाहीये,प्रत्येक माणसाच्या जीवनात अशे दिवस येतात, जसंचांगलं वेळ निघून जातो हेहि निघून जाणार".... ती मुलगी
"पुढच्या महिनाला माझं लग्न आहे आणि आज मी, आज मी त्या लग्न साठी नकार दिला, आई बाबांनी त्या मुलीचा आई बाबांना काय जवाब दिला असेल, त्यांच्यावर काय वितली असेल आणि तू मुलगी तिची काय चूक होती बिचारी तिची काय अवस्था असेल हे ऐकून.... काय करू काहीच कळत नाही".….. हरी
"मग घरी जा आणि लग्न साठी हो म्हणून टाक"....
"नाही , लग्नाचा निर्णय तर मी असच रागात घेतला होता, मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं होऊन जाईल मला तर फक्त इशा ला घाबरवायचं होतं पण यार, कायचं काय झालं सगळं.... पूर्ण वाटोळं करून ठेवलं आहे मी"....
"अजून काही बिघडलं नाहीये इशा ला जाऊन खरं सांगून टाकना म"...
"नाही ऐकत ना ती, आणि आता जेव्हा पासून तिला माझं लग्न जमलंय हे कळलं तेव्हा पासून तर ती अजिबात बोलायला मांगत नाही"....
"मग आता तिला सांग की तू लग्न मोडलं तिच्यासाठी, sorry बोल तिला माफी मांग"...
"ती ऐकेन का"...??
"हो ऐकेन ना, आणि आता घरी जा आई वाट पाहते तुझी"....
"तू पण जा तुझी आई पण वाट बघत असेल तुझी, चल मी तुला घरी सोडतो तसाही खूप रात्र झालीय कुठे राहते तु सांग,मी येतो तुला सोडायला"....
"मी तर इतच राहते"....
"इथं, कुठं....मस्करी करू नको चल मी सोडतो तुला"...
"अरे खरच मी इतच रहाते थांब तुला खोटं वाटाय ना"....
हरी ला काहिच समजत नव्हतं,ती मुलगी वळून समोर एका पटरीवर जाऊन थांबली.... आणि हरी काय विचार करेन त्या आधीच वेगाने एक गाडी त्या पटरीवरून गेली...
हरी जोरात ओरडला.....आईईए
गाडी तिथून निघून गेली, गाडी गेल्यावर हरी ने पाहिलं की तिथं कोणाचं नव्हतं, हरी खूप घाबरला त्याच्या अंग पसिनेने भिजलं,
आणि तितक्यात हरी ला आवाज ऐकू आलं...
"हरी घरी आई वाट बघतेय जल वकर घरी"....
आवाज ऐकताच हरी ने मागे फुडें काय बघितलं नाही आणि धावत सुटला फाटक ओलांगून तो पुढे जाऊन थांबला....
हरी खूप घाबरला होता, हिम्मत करून त्याने मागे पाहिलं....
आणि मागे पाहतच तो परत दचकला ती मुलगी तिथंच त्या गाडी च्या पटरीवर उभी होती आणि हारी ला हाथ हलवून "bye" म्हणत होती...
हे बघताच हरी ने देवाचा नाव घेतला आणि जोरात धावत सुटला.....
जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोचला... हरी चे हातपाय अजून थरथरत होते, हरी घरा जवळ पोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला...
आई ने दार उघडला..…
"हरी काय झालं, घाबरलास की काय स्वाश घे आधी थांब मी बाबांना उठवते".... आई
"नको आई राहूदे बाबांना उठवू नकोस, काय नाही झालं... मी ठीक आहे तू जाऊन झोप".… हरी, हरी ने आरामाचा स्वाश घेतला...
"अरे पण अवस्था बघ तुझी घामाने भिजला आहेस पूर्ण.… कायझालं सांगशील"
"आई बोलो ना काही नाय झालं तू झा आणि झोप…. हा आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया"
हरी बेडरूम मध्ये आला, आणि बेडरूम मध्ये येताच त्याला गरगरल्या सारख वाटायला लागलं, हरी च्या नजरे समोर सगळं गोल गोल फिरत होतं आणि तो एक दम बेड वर पडला आणि झोपी गेला..…
.......................................
"अगला स्टेशन डोंबिवली"...
"Next station dombivali"....
"पुढील स्टेशन डोंबिवली"…..
हरी एक ट्रेन मध्ये दाराच्या जवळ टेकून थांबला होता, गाडीत annoucment चालू होती पुढील स्टेशन ची अगदी मारण्याची गर्दी... थांबायला सुद्धा जागा नव्हती
गाडी स्टेशन वर येऊन थांबली, लोक गाडीतून उतरत होते त्यात हरी ने त्या मुलीला ही उतरताना पाहिलं आणि अचानक हरी ला असं वाटलं की जग जणू जागच्या जागे वर थांबला आहे सगळे आप आपल्याला जागे वर स्तंभ झाले हरी ने हळूच त्या मुलीला आवाज दिला
"ए तू... कोण आहेस".... हरी
ती मुलगी मागे वळली आणि अचानक सगळं जसं होतं तसं झालं गाडी परत चालू झाली... पण त्या गाडीत हरी आणि त्या मुलीला सोडून कोणाचं नव्हतं
"मला नाही ओळखत तु पण मि ओळखते तुला"....
"कोण आहेस तू, माझा जीव वाचवलंस तू".... हरी
"मी तुझी soulmate".….
"Soulmate"... ????
"हो, मी तुझा जीव वाचवलं पण काय, तू मला घाबरतोस ना म्हणून मी जातेय".....
तेवड्यात गाडी बरोबर त्या फाटक च्या इथं येऊन थांबली.…. आणि ती मुलगी खाली उतरली
"मी आहे इतच आहे, तुला जर कुठे नाही भेटली तर इतच भेटेन मी"....
आणि हरी एकदम अलार्म चा आवाज ऐकून उठला.....
"नशीब स्वप्नं होतं".... हरी
हरी हॉल मध्ये येऊन खुडचिवर बसला....
तितक्यात बाबांनी विचारलं, "कुठे होतास रात्री, काय झालं होतं"....
"काय नाही बाबा सगळं ठीक आहे"..... हरी
"ठीक तर असणारच ना तुम्हाला कुठे चार लोकांमध्ये तोंड दाखवायचं असतं, जीमेदारी नावाची , शिष्ट नावाची तर वस्तू आहेच नाही ना आपल्यात, काय"....????
"बाबा हो माहीत आहे मला, चुकी झाली माझी"...
"बाळा चूक नाही खूप मोठी चूक केली आहेस तू".....
तितक्यात आई ने बाबांना मध्येच बोलतांना अडवलं.... "अहो जाऊद्याना"....
"चढवा अजून डोक्यावर चढवा"..… बाबा रागात उठून निघून गेले
हरी डोक्यावर हाथ ठेऊन तिथंच बसून होता, आई जवळ आली आणि हरी चा हाथ धरला, बाळा.... हाथ धरताच आई मोठ्याने बोलली....
"हरी काय झालं तुला बाळा तुझं अंग तर ताप्लाय आखं"...
"काय नाही आई जाऊदे"...
"जाऊदे काय जा तू जाऊन झोप, आज काय कुठे बाहेर जाऊ नकोस, मी डॉक्टर ला पण घरी बोलावते".....
आईने हरी ला जबरदस्ती रूम मध्ये पाठवलं आणि हरी जाऊन झोपला…...
थोड्या वेळ नंतर डॉक्टर आले त्यांनी हरी ला तपासलं आणि एक इंजेक्शन दिलं..…
"काय नाही थोडा ताप आहे बरं होऊन जाईल".... डॉक्टर
"ठीक आहे डॉक्टर".... आई
हरी झोपूनच होता, रात्री तो जेवायला ही नाही उठला... दुसऱ्या दिवशी सकाळी, हरी उठला आता त्याला बरं वाटत होतं, तो ऑफीस साठी तयार झाला... आणि नास्ता करून निघाला....
खाली उतरताना त्याने घरातून बाहेर निघायच्या आधी आईने त्याचा हथावर एक काळा डोरा बांधला होता आणि हरी निरखुन त्या डोरालाच बघत होता...
दिवस खूप चांगला गेला.… संध्याकाळी घरी येताना हरी ने हिम्मत करून इशा ला कॉल केला... पण इशा ने कॉल उचला नाही
हरी चालत चालत फाटक जवळ पोचला, फाटक पाहताच त्याला पर्वा रात्री सगळं घडलेलं आठवायला लागलं... आणि अचानक त्याच्या फोन ची रिंग वाजली, हरी ने बघून खुश झाला....
इशा चा फोन होता...
"हॅलो... इशा".... हरी ने उत्तर दिलं
"कॉल केला होतास".... इशा
"हो, कशी आहेस"...
"ठीक आहे मी"...
"बरं, मग लग्नाची शॉपिंग कशी चालु आहे"...
"कुठलं लग्नं इशा, ते तर मी फक्त तुला घाबरवण्यासाठी बोललो होतो, खरं तर असं काहीच नाहीये'.....
"मला घाबरवण्यासाठी खोटं बोलू शकतोस पण माझ्या घरी येऊन तू आई बाबांन सोबत बोलू नाही ना शकत"...
"बोलतो ना इशा तू बोल आता येऊ का"...
"का यायचा आहे तुला नको येऊस ना, मला गरज नाहीये, मी विसरून गेली तुला, तू पण विसरून जा परत कधी चुकून पण कॉल करू नकोस मला"....
"इशा ऐक तर"....
इशा ने काहीच ऐकलं नाही आणि फोन ठेऊन दिला….
हरी एक दम शांत झाला आणि घरी निघून आला....
रात्री ची वेळ होती हरी झोपला होता आणि ईशा चा विचार करत होता तितक्यात त्याला पर्वा रात्रीचा किस्सा आठवला....
ती मुलगी बोलली होती "अजून काही बिघडलं नाही इशा ला जाऊन खरं सांगून टाक"....
हरी स्वतः सोबतच बोलू लागला…..
"नो doubt ती मुलगी भूत होती, पण तिने माझं जीव वाचवलं, मला त्रास नाही दिला आणि इतकाच नाही ती बोलली पण मला की इशा ला खरं सांगून टाक"...
"आणि बहुतेक म्हणूनच मी आज हिंमत केली इशा सोबात बोलायची.... ती कोण आहे यार"
तेव्हाच हरी ला त्याचं स्वप्नं आठवलं.... जर कुठे नाही भेटली तर मी इथंच भेटेन....
हे आठवतच हरी पटकन उठला आणि फाटक जवळ गेला.... हरी ला भीती पण खूप वाटत होती पण ती मुलगी कोण आहे तिने हरी ला का वाचवलं, हरी ला ते माहीत करायचं होतं आणि त्या साठी त्या मुलीचं भेटणं गर्जेजचं होतं...
हरी फाटक ओलांडून त्या पट्टरीवर आला आणि इथं तिथं तिला शोधू लागला पण ती मुलगी हरी ला कुठेच दिसत नव्हती....
हरी विचारात पडला की नेमकं काय करावं, त्याला भित्ती पण वाटत होती रात्री चा काळोख आणि त्यात रेल्वेचा फाटक....
हरी ला काहीच सुचत नव्हतं की काय करावं, तेव्हाच तो हळूच बोलला....
"तू बोलली होतीस ना की भेटशील मला इथं, मी नाही घाबरत तुला ये समोर.…. Soulmate"
तेव्हाच एक बाजूने हळूच आवाज आला.... "हरी"
हरी आवाज ऐकताच दचकला त्याचे हात थरथरायला लागे, त्याच्या कपाळाला घाम फुटला आणि तो मागे फिरला.......
मागे फिरताच त्याने पाहिलं की... रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं अश्या गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीचा चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होतं, जणू कोण भूत नाही पण एक आधी अपसारच स्वर्गातून खाली उतरलीय...
"मग काय बोलली ईशा"... ती मुलगी
"तुला कसं माहीत मी ईशा सोबत बोललो".… हरी
"मला माहित आहे, पण तू हे सांग की काय झालं, मिटला तुमचा भांडण"...????
"नाही ना आता तर खूप रागावलीय ती, म्हणे फोन पण करू नकोस कधी, काय करू काहीच समजत नाहीये मला.... एकतर बाबा नीट बोलत नाहीये वरून इशा पण, काय करू काहीच कळत नाहीये"...
"हो हो... धीर घे सगळं ठीक होईल, ये बस".….
हरी त्या मुलीसोबत तितच पट्टरींवर बसला...
"अच्छा मला एक सांग असं काय झालं होतं की तुझं आणि ईशा चं भांडण झालं, जरा मला तुमची स्टोरी सांगशील"...
हरी थोडं गालातच हसला, आणि बोलला......
"खूप चांगला चालू होतं सगळं, अजून पण आठवतं तो कॉलेज चा दिवस जेव्हा पहिल्यांदा मी ईशाला पाहिलं होतं आणि कधी आम्ही दोघंही एक मेकांच्या एवढे जवळ आलो काही कळलंच नाही, बघता बघता कॉलेज चे तीन वर्षनिघून गेले, ती पण जॉब ला लागली आणि मी पण"....
"प्रत्येक रविवारी आम्ही ठरवून भेटायचो, मूवी, डिनर साठी.... खूप मस्त चालू होतं".… हरी
"मग एवढ चांगलं चालू असताना मग का भांडलास तिच्या सोबत".... ती मुलगी
"त्या दिवशी मी तिला लग्नासाठी प्रोपोसे केलं आणि ती म्हणाली की".... हरी तिच्या आणि ईशा बद्दल त्या मुली ला सांगू लागला....
"हरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मी घरी नाही सांगू शकत, मला भित्ती वाटते, मला नाही वाटत की बाबा आपल्या लग्ना साठी परवानगी देतील please जसं चालू आहे तसं चालू दे".... ईशा
"ईशा आज ना उद्या तुला बाबांना सांगावाच लागेल ना, आपण आयुष्यभर तर असं नाही ना जगू शकत, चार वर्षे झाले आपल्या relation ला आता आपण पुढचा विचार केला पाहिजे".... हरी
"हरी please पण मि कधी पुढचा विचार केलाच नाही"...
"ईशा तू हे काय बोलतेय आज झालाय काय तुला".....
"हरी please seen create करू नकोस"....
"Please ईशा seen मी नाही तू create करतेय".....
"हरी माझ्यात हिम्मत नाहीये खरच आणि मी त्यासाठी काहीच नाही करू शकत, प्ली जबरदस्ती करू नकोस"....
"जबरदस्ती, जर असंच करायचं होतं तर मग इतके वर्ष का अडकवून ठेवलंस मला, का अशे प्रेमाचे स्वप्ने दाखवलेस"...
"हरी ते स्वप्ने मी पण बघितले आहे तुझा सोबत"....
"पण तुला ते पूर्ण नाही ना करायचे"....
हे ऐकून ईशा चूप झाली आणि पुढे काहीच बोलली नाही….
हरी पुढे काय बोलला नाही ना तर ईशा काय बोलली, हरी तसाच तिथून निघून गेला
२ दिवस निघून गेले ईशा चा काहीच फोन नाही आला... तेव्हा हरी ने समोरून कॉल केला
"Hello ईशा"....
"हम्मम्म्म… बोल"
"२ दिवस झाले काहीच कॉल नाही मेसेज नाही, काय झालं ठरवून घेतलंस का हां... break Up"…....
इतकं ऐकताच ईशा अगदी रागात बोलली.…
"हो ठरवलंय तुला वाटाय ना तर हो करायचं आहे मला break up नाही रहायचं मला अश्या व्यक्ती सोबत जो मला समजून घेत नाही"....
इतकं सांगून ईशा ने रागात फोन ठेवून दिला, हरी ला काहीच कळत नव्हतं की काय चाललय,पण त्याला इतकी खात्री होती ईशा आता त्याला नाही भेटणार...
बघता बघता १ महिना निघून गेला, हरी ने खूप प्रयत्न केलं,पण त्याला शेवटी एकच उत्तरं मिळालं...
"हरी तुला कळत का नाही मी नाहीये रेडी लग्नासाठी".... ईशा
"मग हे प्रेम, हे सगळं काय timepass होतं".... हरी
"तुला जे समजायचं आहे ते समज, मला फरक पडत नाही".... ईशा
हरी ने ह्यापुढे ईशा सोबत बोलण्याचा प्रयत्नं पुढे केला नाही, ह्याच मधी ईशा ने भरपूर प्रयत्नं केलं हरी सोबत बोलण्याचा पण हरी नेहमी टाळत गेला....
आणि २ महिन्या नंतर शेवटी हरी ईशा ला भेटायला रेडि झाला…. आणि ते दोघं भेटले
हरी येऊन शांत बसला होता , ईशा सारखं हरी कडे बघत होती
"बस्स ना आता, किती तो राग.... sorry ना शोना".....ईशा
"माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं".... हरी
ईशा हे ऐकून shock झाली, पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतंच नव्हतं, हरी उठून निघून गेला, आणि ईशा तिथंच बसून रडू लागली....
वेगाने एक रेल गाडी समोरच्या पट्टरीवरून गेली, आणि हरी च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, ती मुलगी हरी च्या जवळ आली आणि त्याच्या हाथ पकडायला जातच होती तितक्यात.....
हरी मागे वळला, ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली...
"मग पुढे काय झालं".... ती मुलगी
"ईशा ने मला मनवायचं खूप प्रयत्नं केलं पण मी हठ पकडून बसलो होतो, प्रेम नेमकं काय आहे ते समजलच नाही मला, आधी तिची हठ पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं, तेव्हा मी".... हरी
"पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो"...
"अरे हरी आलास तू".... आई
"बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे आले होते त्यातून काही बायका हसत म्हणाले
"बाळा आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्न ची वेळ जवळ आलीय".… पाहुण्यातून एक बाई बोलली
"कुठे होतास चल पटकन"... आई
"आई बाबा कुठेय".... हरी
"बाबा आत बसले आहेत, हे बघ हे तुझे बाबा ची आत्या आहे पाया पळ".... आई
"आई बाबा कुठेय, मला भेटायचं आहे त्यांना"....हरी
"काय झालं असं का वागतोय तू"..... आई
"इथं आहे मी काय झालं".... बाबा आतून बाहेर आले
बाबांना बघून मी थोडं घाबरलो पण, मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं...
"बाबा मला लग्न नाही करायचं".... हरी
"काय बोलतोय पाहुणे आले आहे, चल मस्करी करू नकोस,भेट सगळ्यांना".... बाबा
"बाबा मी मस्करी करत नाहीये खरच बोलतोय मला लग्न नाही करायचे".…. हरी ओरडून बोलला
बाबांनी पाटी पुढे काही विचार न करता जोरात मला काना खाली वाजवली....
घरात एकदम शांतता झाली सगळे माझ्या आणि बाबांन समोर बघत होते.....
"हरी काय बोलतोय हे तू".... आई
"काय बोलतोय, काय बोलतोय, निर्लज कुठला,पिऊन आला आहेस का, थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असल्या फालतू पणा करतोय".... बाबा
"अहो ऐकून तर घ्या के म्हणतोय तो".... आई
"बाबा मी खरं बोलतोय, माझ्या मर्जी च्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार".... हरी
"तुझ्या मर्जी च्या विरुद्ध.... ??? तू स्वतः हा बोललास, तू मुलीला ला पाहिलं सगळं तुझ्या मर्जी ने केलं तरी".... बाबा
"हरी, आपलं सोड त्यांच्या विचार कर लोकांना ते काय जवाब देतील, हे जर त्यामुलीला कळलं तर, बाळा थंड डोक्याने विचार कर"... आई
"काही विचार करायची गरज नाहीये... तुझी मर्जी असो नसो, तुला लग्न करावे लागतील"..... बाबा
"बाबा मी लग्न नाही करणार".... हरी
"मग निघ माझ्या घरातून निघ".... बाबा
"अहो थांबा,कायकरताय तुम्ही".... आई
बाबांनी मला धक्के मारून बाहेर हाकलून दिलं.... दोन दिवस मी घर बाहेर होतो, मला खूप guilt वाटतं होतं, माझी चूक मला कळली होती, त्या दिवशी मी विचार कंटाळून विचार केला की एकच उपाय आहे, आत्महत्या... पण ते ही नशिबात नव्हतं तू मला वाचवलंस....
हरीचे डोळे भरून आले....
"रडतोय कश्याला आयुष्य अजून संपला थोडी आहे.... तुझ्या कडे अजून पण वेळ आहे,तू तुझ्या चूक सुधरवू शकतोस".... ती मुलगी
"कसं पण".... हरी
"मी आहे ना.... जा तू घरी , आणि बघ उद्या पर्यंत तुझे सगळे problems solve होऊन जाईल"...... ती मुलगी
"पण कसं"... हरी
"माझ्यावर विश्वास ठेव".... ति मूलगी
"ऐक मला परत भेटायला येशील ना".... ती मुलगी
"हो नक्कीच येईन मी"....
"चल माझ्या ट्रेन चा time झालाय..... असं म्हणत ती मुलगी पट्टरीच्या मधोमत चालत होती आणि चालता चालता ती अद्रीश्य झाली".... ती मुलगी
हरी एकदम झोपेतून उठला....
"आज दिवस चांगलं जाऊ दे देवा'....
हरी ने असं म्हणत मोबाईल हातात घेतला आणि मोबाईल मध्ये बघताच आनंदाने नाचू लागला...
ईशा चा मेसेज आला होता,
"दुपारी भेट मला"....
हरी ला तेव्हा आठवलं, ती मुलगी बोलली होती.... "तुझे सगळे problems solve होऊन जातील"....
हरी गालातल्या गालात हसला आणि लगेच ईशाला भेटण्यासाठी निघाला....
हरी ईशा च्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता, तीन तास झाले पण ईशा आलीच नाही, तिचा फोन ही लागत नव्हता, हरी सारखा इकडून तिकडे चकरा मारत बसला होता, तेव्हाच त्याची नजर ईशा वर पडली....
ईशा हरी च्या जवळ येऊन थांबली, दोघेही शांत उभे होते.... कोणचं एक मेका सोबत बोलत नव्हतं
"कशी आहेस"... हरी हळूच बोलला
"अअअअअअ.... किती वेळ झाला तुला येऊन, बराच वेळ झाला असेल ना, actually ते एक meeting होती आणि मी सांगायला विसरली तुला वरून range पण नव्हती सेल मध्ये सो"... ईशा
हरी फक्त ईशा कडे बघत होता तो एका शब्दाने काहीच बोलला नाही...
"कसा आहेस".... ईशा
"ठीक आहे म, तू बोल तू काशी आहेस".... हरी
"मी पण ठीक"... ईशा
"बस्स ठीक"... हरी
"हो ठीक" ... ईशा
"ईशा sorry खरच sorry पण आपण normal आधी सारखं नाही का वागू शकत, म्हणजे गेल्या किती महिन्यापासून आपली
भेट नाही झाली वरून, ते सगळं लग्नाचा प्रकरण, ईशा मला काहीही करून तू हवी आहेस, I just love uhh yaar"....
हरी ने एका स्वाशात मनात जे आलं ते ईशा ला बेधडक सांगून टाकलं आणि मग लांब स्वाश घेत तो ईशा कड पाहत होता....
ईशा शांत उभी होती, हरी कड एक टक बघत होती....
"चुकी तर माझी आहे हरी मी समजू नाही शकली तुला, पण तू गेल्या नंतर मला कळलं की".... ईशा
"ईशा सोड ना जाऊदे सगळं".... हरी
"शोना sorry... sorry शोना".... ईशा ने हरी ला तिच्या मिठीत घेतलं
"Love uuhh so much शोना"... ईशा प्रेमाने बोलली
.........................................................
सकाळ ची संध्याकाळ झाली, वेळ कसा निघून गेला त्यांना कळलच नाही....
"आता पुढे काय हरी".... ईशा
"पुढे काय, चांगला मूर्त बघून लग्न करूया... काय म्हणतेस करशील ना लग्न".... हरी
"हा पण घरी".... ????? ईशा
"बघूया जे होतं ते चांगल्यासाठी होतं"... हरी
हरी शांत झाला, मग एकदम बोलला... "ईशा चल"
"कुठे"....
"चल सांगतो"....
हरी ईशाला त्याचा घरी घेऊन आला, घरात जायचा आधी इशाने हरी ला विचारलं
"हरी are sure"....
"Yess damn sure".... हरी
हरीने बेल वाजवली व आईने दार उघडला.….
"हरी ... अअअ... या या आत या"... आई
हरी ईशा ला घेऊन आत आला....
"नमस्कार आई"... ईशा
"नमस्कार"... बाळा
"तुम्ही एकत्र काम करता का"... ??? आई
"नाही मी.. अअअ" .... ईशा
"आई बाबा कुठे आहे"..... हरी
"आहेत आत मध्ये, अहो ऐकता का जरा बाहेर या"....
"काय झालं".... बाबा बाहेर आले
ईशा ला बघताच बाबा बोलले.... "अच्छामैत्रीण आली आहे का... हरी ची बर बर बसा बसा"....
"ईशाने बाबांना नमस्कार केला"....
"बाबा मला तुम्हाला काय तरी सांगायचं आहे"... हरी
"बोल ना राजा"... बाबा
"बाबा ही ईशा, माझं हिच्यावर प्रेम आहे, बाबा मला माहित आहे मी खूप चुका केले पण मी या वेळेस माझ्या चुका सुधरवतोय मला एक chance घ्या please बाबा"....
बाबा शांत झाले व आई पण शांत झाली, दोघे एक मेकांकडे पाहू लागले....
"पोरी तुझ्या घरी माहीत आहे का.... हे सगळं"
"हो बाबा माहीत आहे".... ईशा हळूच बोलली
"ठीक आहे मग जशी तुमची ईच्छा".... बाबा
"बाबा thank you so much"..... हरी हे ऐकून खूप खुश झाला....
"बाळा तू खुश आहेस ते चांगलं आहे, तुला असं बघून आज मी पण खुश आहे, बस्स हीच हिम्मत जर तू आधी केली असती तर जे सगळं घडलं ते घडलं नसतं"....
"अहो जाउद्याना... देवा च्या कृपाने आता सगळं नीट होतंय".... आई
"बाबा जे सगळं घडलं त्यात माझी ही चूक आहे, खरं तर सगळं माझ्यामुळेच झालं".... ईशा
"असो... जे होतं ते चागल्यासाठी होतं, हरी जा तिला घरी सोडून ये".... बाबा
"हो बाबा".... हरी
ईशा आई बाबांना भेटून हरी सोबत घरी जाण्यासाठी निघाली.... हरी ने ईशाला घरी ड्रॉप केलं आणि हसत हसत घरी येण्यासाठी फिरला....
येताना हरी फाटक जवळ थांबला... आणि soulmate बद्दल विचार करत तो हळू हळू चालता चालता पट्टरीवर आला तो soulmate बद्दल विचार करतच होता तितक्यात...
"अरे आलास... मला वाटलं आता काय तू येणार नाही".... ती मुलगी
हरी त्या मुलीला बघताच खुश झाला....
"हो मग काय आलो मी, आणि का नाही येनार मी, यार आज मी खूप खुश आहे, तुला माहितीये ईशा आणि माझं लग्न होणार आहे, just imagine यार.... आज मी तिला घरी घेऊन गेलो होतो, ईशा बाबांना आईला भेटली आणि बाबांनी लग्ना साठी मंजुरी पण दिली... yess yesss"....
"वाह ! मस्तच, म्हणजे सगळे problems solve झाले तुझे"... ती मुलगी
"हो सगळे problem solve झाले आणि हे सगळं तुझ्यामुळे झाला.... तू जसं सांगितलं होतं ना सगळं तसच झालं, thank you, thank you so much यार"... हरी
"अरे बस्स बस्स"... ती मुलगी
"नाही यार तुझं जितकं आभार मानू तितकं कमी आहे".... हरी
"अच्छा.. बरं, चल जाऊदे ते सगळं ये बस्स थोडं वेळ दमला आहेस खूप"... ती मुलगी
"हरी त्या मुली सोबत पट्टरीवर जाऊन बसला"...
आज त्या मुलीचा चेहरा काय जास्तच उजडून दिसत होता....
"एक सांगू".... हरी
"बोल ना".... ती मुलगी
"आज तू रोज पेक्षा खूप सुंदर दिसते".... हरी
"अच्छा असं व्हय".... ती मुलगी
"मला एक खरं सांगशील".... हरी
"हा बोल ना".... ती मुलगी
"तू कोण आहेस, माझी येवडी help का केलीस तू".... हरी
"मी पण एक साधारण मुलगी होती, माझी पण फॅमिली आहे बाबा आई बहीण.... सगळं मस्त चालू होतं, एक दिवस रोजच्या गाडीने घरी जात होती, त्या दिवशी खूप गर्दी होती गाडी मध्ये, माझा पाय सरकला आणि मी चालत्या गाडीतून पडली.... आई बाबा खूप रडले होते त्या दिवशी मी बघत होती त्यांना रडताना, म्हटलं पण मी त्यांना की रडू नका पण.... सोड जाऊदे".....
ती मुलगी बोलता बोलता शांत झाली....
"आज जर मी इथं जिवंत उभा आहे तर फक्त तुझ्यामुळे.... आणि मला ही तुझ्यासाठी काय तरी करायचं आहे, मला सांग असं काय करू जेच्याने तुला मुक्ती मिळेन"... हरी
"सांगितलं तरी ते आता शक्य नाही हरी, असो माझ्या गाडी चा वेळ झालाय येते मी"..... ती मुलगी
ती मुलगी उठून जाऊ लागली तेव्हाच अचानक मागे फिरली आणि बोलली....
"जर तुला माझ्यासाठी काय करायचं आहे तर माझं एक काम करशील".... ती मुलगी
हे ऐकून हरी झटकन उठला... "हो मग काय करेन ना, तू सांग फक्त काय ते".... हरी
"पण आधी मला promise कर की ते काम झाल्या नंतर तू मला शोधत इथं परत येणार नाही"..... ती मुलगी
"का असं, म्हणजे तू".... हरी
"हो बघ जर करू शकतो तर".... ती मुलगी
हरी ने थोडा विचार केला आणि मग बोलला.... "ठीक आहे नाही येणार मी, पण तुला कधी विसरणार नाही मी, माझ्या ह्रिड्यात नेहमी तुझी वेगडी जागा रहाणार".... हरी
त्या मुलीने हरी च्या डोळ्यात अगदी प्रेमाने बघितलं आणि मग बोलली
"तू insurance office मध्ये काम करतो ना"....
"हो".....
"मी माझ्या नावावर insurance policy काढली होती पण ती अजून बाबांना भेटली नाहीये, बस्स तेवडी एक मदत कर, बाबा माझे खूप अडचनीत आहेत".... ती मुलगी
"बस्स येवडच, जितकं होईल तितकं लवकर घरी चेक पटवून देणार मी.... काळजी करू नकोस, बर या निमित्ताने तुझं नाव तरी कळेल आज मला"....
"संध्या"..... ती मुलगी
"म्हणजे ही आपली शेवट ची भेट आहे"..... हरी
"हो, पण घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत".... संध्या
"संध्या असं का झालं"..... हरी
संध्या हरी कडे बघून हसली आणि बोलली "उतर लवकर भेटेल".....
इतकं सांगताच संध्या पुढे चालू लागली आणि चालता चालता ती अद्रीश्य झाली....
हरी ला काहीच कळलं नाही की संध्या असं का बोलली... हरी हळू स्वरात प्रेमाने बोलला "संध्या"..........
सकाळी हरी ठरवल्या प्रमाणे लवकर ऑफिस ला गेला, आणि संध्या ची फाईल त्याने मागून घेतली आणि त्या वर कामाची सुरवात केली... सगळं करता करता दुपार झाली तेव्हाच हरी च्या मोबाईल ची रिंग वाजली, ईशा चा फोन होता
"Hello.... बोल"
"Busy आहेस का"....??? ईशा
"हो थोडं काय झालं बोल ना"....
"काही नाही तुझ्या ऑफिस च्या खाली उभी होती.... फ्री असलास तर कॉफी प्याला जाऊया"..... ईशा
"बरं ठीक आहे, येतो मी १० मिनिट्स".... हरी
ईशा हरी ला कॉफी house मध्ये घेऊन आली, दोघे पण बसले होते तेव्हाच ईशा ने विचारलं.......
"हरी काय झालं, तू इतका शांत का आहेस"....
हरी बोलला..... "काही नाही शांत कुठे मी"
"अच्छा बरं"...
"ईशा एक विचारू अचानक मध्ये काल खूप काय घडलं ना, अच्छा बरं आठवलं, काल तू बोलीस की तुझ्या घरी माहीत आहे, हे कधी झालं"....
ईशा थोडी लाजली आणि बोलली...
"पर्वा जेव्हा तुझा कॉल मी कट केला, आई मागे उभी होती, आईने आपलं बोलणं फोनवरचं ऐकलं, मग जेव्हा आईने मला विचारलं तेव्हा मी सगळं आईला सांगितलं.... infact तुला माहीत आहे आई सगळं ऐकून खूप impress झाली, आईने शेवटी आईच्या बोलण्यावर मी तुला हिम्मत करून मेसेज केला आणि भेटली"... ईशा
"संध्या"... हरी मधेच बोलला, ईशा काय बोलते त्यावर हरी चा लक्ष नव्हतं
"काय बोललास संध्या.... ही कोण आहे संध्या"..... ईशा
"काही नाही ईशा, ऐक मला एक urgent काम आहे मी निघतो संध्याकाळी भेटूया".... हरी तिथून उठून निघून गेला
हरी फटाफट ऑफिस मध्ये आला संध्या ची file घेऊन तो सरांचा केबिन मध्ये गेला...
"Sir may i come in"... हरी
"हां yaa come in".... सर
"Sure sir"... हरी
"आज सकाळ पासून ह्या एका फील वरच काम करत होते तुम्ही, काय झालं anything personal or what"....???
"Yess sir, माझी जवळची मैत्रीण होती ती file सर दोन महिन्यांपासून अडकली आहे file so"..... हरी
"Oook let me check"..... सर
हरी file ठेऊन निघून गेला, आणि संध्याकाळ पर्यंत चेक रेडी झाला.... जास्तच चेक हातात आला हरी खूप खुश झाला
"आता अजून उशीर नको करायला, मीच जाऊन चेक देऊन येतो स्वता".... हरी ने मनातच ठरवलं
आणि हरी संध्या च्या घराचा पत्ता घेऊन निघाला....
४.३0 झाले होते हरी संध्या च्या घरा बाहेर थांबला होता... घराच्या इथं पोचताच त्याचे हात पाय थंड पडले, हरी जसा तसा घरा च्या दारावर येऊन थांबला...
दार उघडाच होता, हरी ने हाक मारली.... "कोणी आहे का".... हरी
सांध्याची छोटी बहीण तितक्यात आली... "हां एक मिनटं"
पण तिने जसच हरी ला बघितलं, ती बोलली... "तुम्ही" आणि ओरडून
तिने बाबांना हाक मारली.... "बाबा"
हरी shock झाला की ही त्याला काशी ओळखते....
"तुम्ही मला कसं ओळखता".... हरी
तितक्यात संध्या चे बाबा तिथं आले.... संध्या च्या बाबांनी जसं हरी ला बघितलं बोलले
"तू इथं, तुझी हिंमत कशी झाली इथं यायची, निघ इथून"....
"अरे काका, तुम्ही काय बोलताय ऐका तर मी"....हरी
पण संध्या चे बाबा काहीच ऐकत नव्हते.... हरी ला त्यांनी धक्के मारून घराच्या बाहेर काढलं आणि दार बंद करून टाकलं
हरी ला काहीच समजत नव्हतं की काय करावं, जे काही घडत होतं त्याला काहीच कळत नव्हतं की काय आणि का होतय....
हरी ने पोलिसी ची चेक, दाराच्या खालून आत टाकली आणि खाली उतरला....
काय कशे लोक आहेत, हरी असं म्हणत जात होता तेव्हाच ईशा चा फ़ोन आला....
"कुठे आहेस तू कधीची वाट बघते मी".... ईशा
"ईशा ऐक घरी जा उद्या भेटूया, जरा कामात आहे मी".... हरी
"कामात म्हणजे कुठे आहेस".... ईशा बोलताच होती आणि हरी ने तिथून फोन ठेवून दिला हरी जे काय आता झालं त्याचा विचार करत होता... तेव्हाच त्याला बाबांचा फोन आला....
"Hello".... हां बाबा बोला
"हरी कुठे आहे तू , मूर्ख कुठला एवढं सगळं करून तुझं पॉट भरलं नाही का".....
"बाबा काय झालं"....
"तू संध्या च्या घरी का गेला होता"....
"हो बाबा मी ते, बाबा एक मिनटं तुम्हाला कसं माहीत मी संध्या च्या घरी गेलो होतो..... संध्या, संध्या ohhhhhhh shitttt".…..
हरी ने फोन ठेवला आणि एका क्षणा साठी शांत झाला, हरी ला घाम फुटू लागला, त्याचे हात पाय थंड पडले अचानक घसा पण सुखला.....
"No no no.... यार".... हरी पटकन फाटक जवळ पोचला आणि पट्टरीवर येऊन जोर जोराने ओरडू लागला.....
"संध्या, संध्या..... आआआ"....
तेव्हाच समोरून गाडी आली हरी स्वतःला वाचवण्यासाठी फिरला आणि पाय सरकून तो पट्टरीच्या दुसऱ्या बाजूला पडला....
गाडी वेगाने निघून गेली.... हरी रडू लागला जसं तसं उठून उभा रहायला आणि परत जोरात तो ओरडला.... "संध्या please यार संध्या"....
हरीला च्या डोक्यावरून रक्त येत होतं.... तो रडत रडत जोर जोरात संध्या ला हाक मारत होता, इथं एक बाजूने गाडी जाता होती....
पण संध्या काय आली नाही.....
हरी डोक्यावर हाथ ठेवून तितच बसला, घरून सारखा फोन येत होता, ईशा पण त्याला सारखं कॉल करत होती म्हणून त्यांनी मोबाईल ऑफ करून टाकला....
रात्र झाली पण हरी काय त्या जाग्यावरून हल्ला नाही, रात्र झाली २.३० वाजून गेले होते, आणि अचानक हरी बसल्या बसल्या खाली पडला....
पडल्या नंतर जेव्हा हरी ने मान वर करून पाहिलं, समोर त्याला एक वेगाचा प्रकाश दिसू लागलं, तो प्रकाश हळू हळू त्याचा जवळ येत होतं.... हरी ला स्पस्ट काही दिसत नव्हतं
त्याच प्रकाशातून संध्या हळू हळू चालत हरी च्या जवळ आली... तिने त्याला हाथ देऊन उभं केलं
"Promise केलं होतंस ना तू की नाही येणार परत, मग का आलास, आणि हे काय वेळेपणा आहे इथं का बसला आहेस रक्त येतंय कळत नाही तुला, घरचे वाट पाहताय, ईशा पण कॉल करतेय ना"...
हरी बस संध्याला एक टक बघत होता, त्याच्या त्याचे डोळे भरून आले आणि तो हळूच बोलला
"संध्या"...
"हां हरी"...
"माझ्यामुळे तुझा जीव गेला ना, माझ्यामुळे तू आज"....
"हरी तुझी काय चूक यात आता"....
"नाही संध्या सगळी चूक माझी आहे, ईशा सोबत break up नंतर मी खूप शांत रहायला लागलो, घरून काम आणि कामावरून घर बस्स हीच life होती माझी, पण अचानक एक दिवस"....
.......................................
"आलास, चल हात पाय धुऊन ये मी जेवण वाढते".... आई
"नको आई मी जेऊन आलोय आज".... हरी
"अच्छा बर ऐक तुझा रूम मध्ये बघ तो एक कव्हर ठेवला आहे बघून घे आणि काय उत्तर आहे ते सावकाश सांग मला".... बाबा
"ठीक आहे बाबा".... हरी
हरी त्याच्या रूम मध्ये गेला बेड वर समोरच तो कव्हर होता पण त्याने तो उघडून बघितलेच नाही, त्यात संध्या चा फोटो होता.... हरी ने कव्हर उचला, आणि रंगात तो कव्हर dust bin मध्ये फेकून तसाच झोपला....
सकाळ झाली, हरी जसा बेडरूम मधून बाहेर आला....
"काय मग हो म्हणायचं की नाही".... बाबा
"कसलं बाबा काय"...??? हरी
"अरे तू फोटो बघितलं नाही त्या मुलीचं".... बाबा
"हां बघितलं ना बाबा".... हरी
"मग काय हो म्हणू ना".... बाबा
हरी शांत झाला, आणि मग रागात त्याने हो म्हटलं, त्याने विचार केला की ईशाला आता माझी value कळेल
"बरं मग.... मुलीला बघून घे तसं पुढच्या महिन्याला आपण साकारपुढा करून टाकूया... काय बरोबर" ना बाबांनी आईला विचारलं...
"हो मग काय अगदी बरोबर"... आई
"बाबा मला ऑफिस च खूप काम आहे, मी जरा मी नंतर भेटेन पोरीला हवं तर, आता नको".... हरी
"अच्छा ठीक आहे पण लवकर बघून घे हो बाबा, तसं मुलीच्या कडून हो आहे, बरं का.... तसं मला माहीतच होतं की तू पण हो म्हणशील, म्हणून मी पण आधीच सगळं नक्की करून आलोय कालच, तास संध्याला नंबर दिला आहे तुझा बघ फोन येईलच तुला"...
"बाबा नंबर का दिला तुम्ही".... हरी
"अरे हो चालतं की आज काल"... बाबा
हरी जेव्हा ऑफिस ला आला, तो शांत बसून विचार करत होता तेव्हाच... त्याचा फोन वाजला
अनोळखी नंबर बघून त्याला खात्री झाली की ते त्या मुलीचा फोन असणार तरी हरी ने फोन उचला
"Hello.... कोण"
"हॅलो... हरी"..... संध्या हळूच बोलली तिच्या बोलण्यावरून तिची भीती स्पस्ट कळत होती हरी ला
"हां बोला"...
"मी संध्या बोलते"...
"हां बोला."...
"काय नाय ते काल काका मांगनं घेऊन आले होते घरी"....
"हां"...
"तुम्ही busy आहात का.. ?? हवं तर नंतर बोलूया"....
"नाही तसं काही नाहीये"...
"अच्छा ठीक आहे"....
"संध्याकाळी फ्री आहेस तू... हां"
"ठीक आहे भेटूया मग"...
"हो चालेल"...
हरी ने फोन ठेवला आणि तो विचार करतच होता की त्याला ईशा चा कॉल आला
"Hello"....
"हरी please भेट ना एकदा संध्याकाळी ऑफिस नंतर"....
"ठीक आहे"... हरी ने एवढं सांगून फोन ठेवला....
संध्याकाळ झाली इथं संध्या हरी ची वाट पाहत होती, तिथं हरी ईशाला भेटायला गेला....
हरी येऊन शांत बसला होता , ईशा सारखं हरी कडे बघत होती
"बस्स ना आता, किती तो राग.... sorry ना शोना".....ईशा
"माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं".... हरी
ईशा हे ऐकून shock झाली, पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतंच नव्हतं, हरी उठून निघून गेला, आणि ईशा तिथंच बसून रडू लागली....
हरी तिथून घरी जाण्यासाठी निघाला, तो विसरूनच गेला की संध्या त्याची वाट पाहत होती तेव्हाच संध्या चा फोन आला हरी ला....
हरी फोन उचलताच बोलला.... "सो sorry ते कामात लक्षात नाही रहायलं"
"Ooook"... संध्या
"एक तुला एक सांगायचं होतं"...
"काय सांग ना"...
हरी ने संध्याला तिच्या आणि ईशा बद्दल सगळं काही सांगितलं आणि मग शेवटी बोलला...... "बघ मला थोडं वेळ हवं आहे मी थोडं relax झालो की आपण भेटूया".... हरी
"ठीक आहे, काही हरकत नाही, तुला वाटेल तेव्हा भेटूया".... संध्या
संध्या घरी आली....
"मग काय हरी ला भेटलीस".... बाबा
"हो बाबा"...
"बरं आहे आज कालचं मुलगा मुलगीच सगळं ठरवून घेतात".... बाबा
संध्या लाजून बेडरूम मध्ये गेली....
"ताई कसा आहे मुलगा,काय बोलला भेटल्यावर फोटो मध्ये तर हिरो दिसतो पण असं समोरा समोर कसा दिसतो"...
"माहीत नाही भेटली नाही मी त्याला"... संध्या
"पण आता तर तू बोललीस ताई की भेटून आलीस"......
"हो तसं तो माझ्यासोबत फोनवर बोलला पण मला असं वाटलं की तो माझ्यासमोर उभा राहवून बोलतोय, खूप काय सांगितलं त्याने , त्याच्या life बदल लपवू पण शकला असता पण नाही आणि तेच मला खूप आवडलं".... संध्या
दिवस असेच जात होते.... त्यात संध्या ने भेटण्याचा विषय काळला की हरी सारखं टाळायचा....
हरी एक दिवस जेव्हा संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला बाबांनी पत्रिका दाखवली, पत्रिका बघूनच हरीचे होश उडाले,पुढे काय बोलावं त्याला कळत नव्हतं....
"बाबा पण अचानक"...
"अचानक कुठे, आता काय तू तुमचं चांगलं जुडलं पण आहे, आता बघ पुढच्या महिन्या नंतर पुढचे ६ महिनेकुठलाच चांगलं मुर्हत नाहीये.... १० दिवस नंतर सकरपुढा आणि मग लग्न".....
"बाबा पण तिच्या घरच्याने तर मला बघितलं पण नाहीये"....
"तर काय झालं त्यांनी मला बघितलं आहे, संध्या जे बाबा आणि मी लहान पणासपासून चे मित्र आहेत, हे सगळं तर तुमच्या साठी बाकी आम्ही तर आधीच ठरवलं होतं की तुझं आणि संध्याचं जुळवायचं"....
हरी या पुढे काहीच बोलला नाही... आणि बेडरूम मध्ये जाऊन बसला, हरी ला स्वतः वर खूप राग येत होतं, त्याची चूक त्याला कळली होती पण नेमकं करायचं काय आता...
दुसऱ्या दिवशी हरी ने ईशा ला फोन केलं पण ती सारखं त्याचं कॉल कट करत होती....
"पण शेवटी मी ठरवलं, मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्या आधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो, लग्न ची वेळ जवळ आली होती, त्या दिवशी घरी पावणे आले होते, आणि मी दुपारी घरी पोचलो"....
"अरे हरी आलास तू".... आई
"बघा बघा नवरदेव आला".... घरात पाहुणे आले होते त्यातून काही बायका हसत म्हणाले
"बाळा आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्न ची वेळ जवळ आलीय".… पाहुण्यातून एक बाई बोलली
"कुठे होतास चल पटकन"... आई
"आई बाबा कुठेय".... हरी
"बाबा आत बसले आहेत, हे बघ हे तुझे बाबा ची आत्या आहे पाया पळ".... आई
"आई बाबा कुठेय, मला भेटायचं आहे त्यांना"....हरी
"काय झालं असं का वागतोय तू"..... आई
"इथं आहे मी काय झालं".... बाबा आतून बाहेर आले
बाबांना बघून मी थोडं घाबरलो पण, मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं...
"बाबा मला लग्न नाही करायचं".... हरी
"काय बोलतोय पाहुणे आले आहे, चल मस्करी करू नकोस,भेट सगळ्यांना".... बाबा
"बाबा मी मस्करी करत नाहीये खरच बोलतोय मला लग्न नाही करायचे".…. हरी ओरडून बोलला
बाबांनी पाटी पुढे काही विचार न करता जोरात मला काना खाली वाजवली....
घरात एकदम शांतता झाली सगळे माझ्या आणि बाबांन समोर बघत होते.....
"हरी काय बोलतोय हे तू".... आई
"काय बोलतोय, काय बोलतोय, निर्लज कुठला,पिऊन आला आहेस का, थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असल्या फालतू पणा करतोय".... बाबा
"अहो ऐकून तर घ्या के म्हणतोय तो".... आई
"बाबा मी खरं बोलतोय, माझ्या मर्जी च्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार".... हरी
"तुझ्या मर्जी च्या विरुद्ध.... ??? तू स्वतः हा बोललास, तू मुलीला ला पाहिलं सगळं तुझ्या मर्जी ने केलं तरी".... बाबा
"हरी, आपलं सोड त्यांच्या विचार कर लोकांना ते काय जवाब देतील, हे जर त्यामुलीला कळलं तर, बाळा थंड डोक्याने विचार कर"... आई
"काही विचार करायची गरज नाहीये... तुझी मर्जी असो नसो, तुला लग्न करावे लागेल"..... बाबा
"बाबा मी लग्न नाही करणार".... हरी
"मग निघ माझ्या घरातून निघ".... बाबा
"अहो थांबा,कायकरताय तुम्ही".... आई
बाबांनी मला धक्के मारून बाहेर काढलं दोन दिवस मी घरा बाहेर होतो....
.........................................
"आणि या दोन दिवसात घडलं ते तुला माहीत नव्हतं हरी".... संध्या
"मी खूप खुश होती सगळं खूप लवकर लवकर झालं तुझं अस भेटणं, मग लग्न.... पण कोणाला ठाऊक होती की सगळं Temporary होतं....
त्या दिवशी मी कामावरून घरी जात होती, तेव्हाच बहिणीचा कॉल आला"...
"आणि मग मग मला कळलं की तू लग्नाला नकार दिलंस..... खूप वाईट वाटलं पण तू आधी पण कधी लग्न साठू होकार दिला नव्हतं, पण मला खूप धक्का बसला हे ऐकून"....
"मी हेच विचार करत त्या दिवशी गाडीत चढली सारखा डोक्यात हेच चालू होतं मी दारावर थांबली होती, विचारा मुले डोकं खूप भारी झाला होता तेव्हाच परत बहिनीचा फोन आला की आईला हॉस्पिटल ला घेऊन गेले आहेत, पाहुणे सगळे निघून गेले बाबा पण खूप टेन्शन मध्ये आहेत ताई तू लवकर ये"...
"तेव्हाच अचानक माझा पाय सरकला आणि मी गाडीतुन पडली, इथंच जिथं तू पडलास"....
"मला पण तितच लागला जिथं तुला लागलाय, तुला वाचवण्यासाठी मी होती, पण मला वाचवण्यासाठी कोण नव्हतं"....
"संध्या माफ कर मला"... हरी असं म्हणत तिच्या पायात पडला हाथ जोडून रडू लागला
"चुकी जितकी तुझी आहे तितकीच माझी पण आहे मी पण विचार करायला हवं होतं, थांबायला हवं होतं पण सोड".......
"आता काय फायदा विचार करून हे मला आधी करायला हवं होतं"....
संध्या ने हरीचा हाथ धरलं आणि त्याला पट्टरीवर खाली बसवलं आणि येऊन त्याचा बाजूला बसली.....
"हरी काही वस्तू आपल्या हातात नसतात, ते फक्त होऊन जातात"....
"तू विचारत होतास ना की माझी काय ईच्छा आहे"....
हे ऐकताच हरी संध्याकळे पाहू लागला....
"मला जागे पर्यंत तुझ्यासोबत रहायचं होतं, तुझ्या मिठीत, कारण ज्या दिवशी तू माझ्यासोबत पहिल्यांदा बोललास तेव्हाच मला तुझ्यासोबत प्रेम झालं"....
आणि मी तुझा जीव नाही माझ्या प्रेमाला वाचवलं मी अपूर्ण आहे हरी पण माझं प्रेम पूर्ण आहे.......
"हरी.... बस आता पुढे काय विचार करू नकोस आणि काही बोलू
नकोस, बस जे काय आज झालं ते सगळं इथंच सोडून घरी जा"....
संध्याने प्रेमाने हरीच्या चेहऱ्यावर हाथ फिरवला.... आणि दुसऱ्याच क्षणी ती अद्रीश्या झाली
हरी घरी आला.....
"अरे हे काय झालं फोन पण बंद आहे तुझं, अरे हे रक्त कसं, काय झालं.... अहो ऐकता का" आईने बाबांना हाक मारली
"हरी हे काय झालं"...... बाबा
"काही नाही बाबा बस्स ते accident झालं, बस थोडंचलागला आहे जास्त काही नाही"..... हरी
"काय जास्त नाही लागलं.... रक्त बघ तू".... आई
आई बाबा बोलत होते आईने घाव पुसून त्यावर पट्टी बांधली.... पण हरी नुसतं सांध्याच्या विचारात होता त्याला दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं....
हरी उठून बेडरूम मध्ये येऊन झोपला.....
गाडीच्या हॉर्न चा आवाज ऐकू येत होता, तो पट्टरीवर धावत होता आणि गाडी त्याचा मागे वेगाने धावत होती.... हरी घामाघूम झाला होता, अचानक तो खाली पडला आणि गाडी त्याचा वरून निघून गेली...
हरी घाबरून उठला..... स्वप्नं होतं
"हरी... बघ ईशा आली आहे".... आई
"हो आलो आई"....
"हरी बाहेर आला..... हरी काय झालं अचानक कसं सगळं, सकाळी कॉल केला होता मी तू झोपलेला आईने फोन उचलला आणि कळलं की असंझालाय, आता सांगशील नक्की झालं काय".... ईशा
"काय नाय ग ते काल येतांना एक गाडी सोबत टक्कर झाली म्हणून थोडंलागलं बस.... सोड तू बस मी फ्रेश होऊन येतो".….. हरी
दुपार झाली.... "आई मी निघते"... ईशा
"थांब मी येतो सोडायला".... हरी
"काही नको... मी जाते तू आराम कर".... ईशा
"अग ऐक येतो मी"....
"नको म्हंटल ना बस मग"... ईशा
"ईशा घरी निघून आली"....
दिवस असेच जात होते, त्या दिवस नंतर हरी खूप शांत झाला, सारखं तो संध्या च्या विचारात असायचा, रात्र दिवस फक्त हेच विचार करत बसायचं की संध्या साठी काय केलं पाहिजे, पण त्याला काहीच सुचत नव्हतं....
एक दिवस हरी ईशा सोबत बसला होता.... ईशा कधीची बडबड करत होती, मधीच हरी बोलला
"संध्या"....
"हरी काय बोललास तू"....... ईशा, हरी काय बोलेन त्या आधीच ईशा बोलली
"बघ हरी काय आहे ते स्पष्ट सांग गेल्या काही दिवसाने मी बघते की तूझ बोलणं वागणं आधी बदललं आहे, नेहमी तू कसलं तरी विचारत करत असतो.... सांग ना मला काय झालं आहे"....
हरी ईशा ला बघत होता, आणि बघता बघता रडू लागला....
ईशा हरी ला अस रडताना बघून बोलली... "ऐ हरी अरे काय झालं रडतोय का तू , हरी शांत हो".....
हरी ईशाला मिठीत घेऊन खूप रडला.....
"ईशा.... मला काहीच सुचत नाहीये की काय करू"
"हरी सांगशील के झालं आहे".....
"ईशा मला ना अशे वाईट विचार येत असतात, सारखे अशे स्वप्न येतात की मी रेल राडीच्या पुढे धावतोय आणि गाडी ने मला उडवलं"....
"हरी, बघ काय नाय होणार तसं मी आहे ना सोबत.... असं काहीच होणार नाही शांत हो शांत.... शहहहह"
त्या दिवस नंतर हरी ने कधीच तो विषय कोना समोर काढला नाही, पण त्याच्या मनातून ते सुटलं पण नाही....
बघता बघता लग्नाची वेळ आली, आज हरी आणि ईशा चा लगीन होतं, अगदी थाटापाटने लग्न झालं, आणि ईशा हरीच्या घरी आली, रात्री चे २.३० वाजले होते, ईशा झोपली होती हरी ला सारख संध्या च्या विचार येत होता
हरी उठला आणि ईशा च्या कपाळावर चुंबन देऊन तो घरा बाहेर निघून आला.....
हरी संध्याला भेटण्यासाठी पट्टरीजवळ आला.....
संध्या तितच बसली होती....
"आलास, मला वाटलंच होतं की आज येशील तू congratulations हरी, happy married life "......
"संध्या मी तुला घ्याला आलोय, चल माझ्यासोबत"... हरी झटकन बोलला
"हरी, हे शक्य नाही"....
"तर मग काय तू अशीच भटकत राहशील, तुला मुक्ती कशी मिळेल....
"कधी न कधी भेटेन हरी"...
"मग जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल, पण तू चल सोबत"....
"हरी, मला नाही माहीत मला मुक्ती काशी मिळणार पण एक क्षण मात्र एक क्षण, एक अशी वस्तू एक अस काम ही पुरेल ज्याचने मला मुक्ती मिळेल"....
"बस्स मग तो एक क्षण आपण सोबत शोधू, पण सध्या तू चल....हरी"...
"बघ संध्या, तुझ्या प्रेमाला मी अपूर्ण नाही सोडणार आणि तुला आज माझ्यासोबत यावच लागणार".....
"हरी तू खूप मोठी चुकी करतोय"....
"संध्या आयुष्यात मी चूकाच जास्त केल्या आहेत, अजून एक मग पण चल"....
"हरी ऐक"...
हरी ने काही ऐकलं नाही आणि पुढे जाऊन संध्याला उचलून घेतलं आणि खांद्यावर टाकून संध्याला सोबत घेऊन आला.....
हरी संध्या ला घरी घेऊन आला.... सकाळ झाली ,हरी झोपलेला....
"हरी उठ अजून किती झोपणार आहेस, सकाळ झाली"..... ईशा
"उममम झोपूदेना... तू का एवढं लवकर उठली आहेस ये झोप".... हरी ने ईशा चा हाथ पकडून तिला ओढून घेतलं
"हरी चल आता उठ"....
"ईशा, बाळा इथं ये जरा".... आई
"हां आई आली".... ईशा
ईशा बाहेर गेली.... "हां आई"
"अरे हरी कुठे झोपला आहे की काय, उठवा त्याला.... बाबा
"हां बाबा"... ईशा
तितक्यात हरी आला......
"हरी चल निघतोय आम्ही ईशा ची काजळी घे"... बाबा
"हो बाबा संभाळूनजा आणि पोचल्यास फोन करा".... हरी
"आई लगेच कशाला तुम्ही पण गावी जाताय".... ईशा
"हो बाळा पण गावी पण सगळं बघायचं आहे ना, तुम्ही या मग नंतर".....
"हो आई नक्कीच".... ईशा
हरीचे आई बाबा गावी निघून गेले....
संध्याकाळ झाली हरी आणि ईशा बाहेर फिरून रात्री परत घरी आले...
"हरी मूवी मस्त होती ना, काय भारी होररोर होता यार, मला तर खूप आवडली मूवी".... ईशा
"हो चला मग झोपुया आता"....
"अच्छा लगेच झोपायचं आहे".... ????
हरी ईशाच्या जवळ गेला.... "तसं तू बोलशील तर जागरण पण करू शकतो आपण, तसही आता घरी फक्त आपणच आहोत"....
"अच्छा"... म्हणत ईशा ने हरी ला गालावर चुंबन दिलं....
हरी आणि ईशा दोघे ही खूप गार झोपले होते, तेव्हाच ईशा ला काहीतरी विचित्र आवाज ऐकू आलं आणि ती झोपेतून उठली, ईशाने बाजूला बघितलं हरी गार झोपला होता, ती बेडच्या दुसरा बाजूने उतरली आणि किचनमध्ये गेली, ईशा ने फ्रिज चा दार उघडला आणि पाण्याची बाटली काढली आणि पिउन बाटली परत ठेवली....
ईशा तितच थांबली होती, खिडकीतून किचनच्या बाहेर बघत होती आणि संध्या बरोबर ईशाच्या मागे थांबलि होटी....
अचानक ईशा चे हाथ पाय गारठले, अचानक ईशा ला वाटलं की तिच्या मागे कोण तरी आहे, ती हळूच मागे वळली, पण मागे कोण नव्हतं....
ईशा परत बेडरूम मध्ये आली, पण बेडरूम मध्ये तिला काय तरी विचित्र वाटत होतं, जस की तिला कोण सारखं बघत आहे...
ईशाने काही क्षणा आधीच पाणी पिलं होतं, पण तरी तिचा घास सुखला... ईशा ला परत तहान लागली, पण ईशा पाणी प्याला गेली नाही, ईशा हळू हळू चला बेडजवळ आली....
बेडच्या एकाबाजूला हरी झोपलाहोता, ईशा हळूच येऊन झोपली....हरी आणि ईशा च्या मध्ये भरपूर जागा होती, ईशा ला अस वाटतं होतं की त्यांच्या दोघांच्या मधी कोण तरी आहे, आणि ते खरं होतं संध्या ईशा आणि हरीच्या मधी झोपली होती....
संध्या हरीच्या केसांमध्ये हळूच बोटं फिरवत होती आणि प्रेमाने गाणं म्हणत होती....
"पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले".....
ईशा डोळे मिटून बेडच्या दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली होती, कानात तिला सारखं हा गाणं ऐकू येत होतं....
ईशा ला झोपच लागत नव्हती, तिला खूप भीती वाटतं होती, अचानक गाणं बंद झालं, ईशा ने फिरून पाहिलं हरी तिच्या बाजूला तोंड करून झोपला होता, ईशा पटकन हरी च्या जवळ गेली आणि त्याला मिठी मारून झोपली.....
सकाळ झाली.... हरी ऑफिस साठी निघत होता...
"हरी, मी काय बोलते आज घरी थांब ना".... ईशा
"का, काय झालं, तसही तुला माहीत आहे ना, लग्नानंतर ऑफिस चा आज पहिला दिवस आहे."..... हरी
"हरी मला खूप भीती वाटतेय"....
हरी हे ऐकून हसत म्हणाला.... "भीती कसली भीती"
"हरी मी काल रात्री पण झोपली नाही, मला खूप भीती वाटत होती"....
"अरे मग मला उठवलं का नाहीस"....
"मी म्हटलं जाऊदे परत तुला सकाळी ऑफिस ला जायचं होतं".....
"बघ तू अजून होररोर मूवी , चांगलं बोलत होतो, रोमँटिक मूवी बघूया पण नको"....
"हां आता त्यामुळे काही नाय झाला"....
"बरं निघू मी"...
"शोना लवकर ये हा"...
"हो शोना, चल येतो"...
हरी ऑफिस साठी निघाला....
दुपार ची वेळ होती ईशा सोफ्यावर बसून गाणे ऐकत होती टीव्ही वर, आणि अचानक वीज गेली...
"शीट यार... वीज ला पण आताच जायचं होतं" , ईशा उठून बाल्कनी जवळ गेली आणि बाल्कनीचा दार उघडून बाहेर जाऊन थांबली....
संध्या बरोबर समोर सोफ्यावर बसली होती, तिने टीव्ही चा रिमोट हातात घेतला आणि टीव्ही चालू झालं....
टीव्ही चा आवाज ऐकून ईशा मागे फिरली बघतेय तर काय टीव्ही चालू आहे, हे बघून ईशा घाबरली, तिचा घसा सुखला, ईशा जाशीच बालकोणीतून आत आली टीव्ही परत बंद झालं....
ईशा टीव्ही जवळ गेली व टीव्हीचा स्विच बंद करून तिने वायर काडून टाकलं आणि बेडरूममध्ये जाऊन झोपली...
संध्याकाळ झाली, हरी घरी आला, घंटी चा आवाज ऐकून ईशा पटकन उठून आली, दार उघडताच ईशा हरी ला चिपकली....
"अरे काय झालं, माझ्या ईशुला, खूप मिस केलं वाटतं मला"...
"हो खूपच"...
"बरं चल आत आधी"....
हरी ईशा ला आत घेऊन आला...
हरी ईशाला निरखून पाहत होता.... "ईशा काय झालं, तू जरा वेगी दिसतेस, घाबरलीस का परत"....
"हो हरी"..... ईशा ने हरी ला सगळं सांगितलं, हरी ने शांत पणे सगळं ऐकून घेतलं
संध्या तितच होती आणि सगळं ऐकत होती.....
सगळं ऐकल्यावर हरी ने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं... आणि हरी संध्याकडे बघायला लागला
संध्या ने लगेच स्वताचे कान पकडले आणि "सॉरी" बोलली...
हरी ने ईशा ला शांत केलं....
रात्र झाली.... ईशा झोपली होती आणि हरी संध्या सोबत बाल्कनी मध्ये थांबून बोलत होता....
"हरी सॉरी ना मी अशीच मस्करी करत होती".... संध्या
"संध्या काय मस्करी, अशी मस्करी असते का".... ??? हरी
"हो हरी, पण जाऊदे ना, ती खूप घाबरते म्हणून मी थोडी मज्जा घेत होती, बस्स छोटी सी गंमत हरी".... संध्या
"गंमत, गंमत आणि या गंमत मुले तिला काय झालं तर"....???
"हरी, असं कसं तिला काय होईल, मी काही नाही होऊ देणार तिला..... हरी मला माहित आहे, की तिच्यात तुझा जीव आहे, आणि माझा तुझ्यात"...
हे ऐकल्यावर हरी अगदी प्रेमाने संध्याकडे बघायला लागलं... हरी संध्या च्या जवळ गेला आणि तिला मिठीत घेत होता तितक्यात...
"हरी काय करतोय"...... ईशा
"ईशा तू , काय नाय".... हरी एकदम दचकला
"हरी कोणासोबत बोलतोय तू , मी ऐकलं आणि don't say की मला भास झाला असेल".... ईशा
"ईशु..… ईशु relax मी कोणासोबत बोलणार, झोप लागत नव्हती म्हणून इथं येऊन थांबलो, मग मी असा".... हरी
"मग काय असा.... ???? हरी मी तुला बोलताना ऐकलं खरं सांग मला".... ईशा
"हां तेच सांगतोय".... हरी ला अस बघून संध्या खूप हसत होती, अगदी तोंड दाबून दाबून हसत होती, आणि तिला हसताना बघून हरी एकदम बोलला....
"आधी तू हसणं बंद कर".... संध्या हे ऐकताच शांत झाली
"हसणं बंद करा म्हणजे.... मी कुठे हसली, कोणाला बोलतोय तू,कोण हस्तय इथं"......
"हसणं नाही ग राणी, मी ना, अच्छा तू विचारात होती ना मी कोणासोबत बोलत होतो, तर मी स्वता सोबत बोलत होतो"....
"स्वतासोबत, एवढा रात्री.... वाह, अप्रतिम"... ! ईशा
"हां, धन्यवाद"…. हरी
"धन्यवाद काय, इथं एवढा रात्री तू स्वतासोबत काय बोलत होतास".... ईशा
"अरे मी ना, मी.... हनिमून, हनिमून बदल बोलत होतो, बघ कसं आहे की नवीन लग्न झाले, आणि बघ अजून आपण कुठे फिरायला पण गेलो नाही, तर तेच प्लॅन करत होतो".... हरी
हे ऐकून ईशा खूप खुश झाली.... "हरी खरच... ohhh my baby"
ईशा ने पटकन हरीला मिठीत घेतलं.... आणि एक बाजूने संध्याने हरी ला ईशारा केला... "वाह" करून
"हरी तसं कुठे जायचं"..... ईशा
"तेना आपण सकाळी ठरवूया, आता मला खूप झोप आलीय"..... हरी
हरी ईशा ला बेडरूम मध्ये घेऊन गेला....
संध्या तितच बाल्कनी मध्ये बसली होती, वर चंद्रा ला पाहत होती....
चंद्रा ला बघत ती म्हणाली....
"खूप सुरेख आहे नातं तुझं चंद्र या आकाशासोबत
जसं आहे नातं माझं हरी सोबत
एकत्र असूनही सोबत नाही".....
..........................................
हरी आणि ईशा ने हनिमून साठी मनाली जायचं ठरवलं, व आज रात्री च्या गाडीने दोघेही मनाली जाण्यासाठी निघाले.....
ईशा हरी च्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि संध्या हरी च्या समोर बसली होती.....
संध्या हरीला खूप निरखून पाहत होती, हरीने संध्याला विचारलं.... "काय झालं".....
"काय नाही".... संध्या
"तुला झोप नाही का आली"....संध्या ने हरी ला विचारलं
"हो अली आहे ना"... हरी
संध्या उठून हरी च्या बाजूला जाऊन बसली आणि हरी ला बोलली....
"चल माझ्या खांद्यावर डोकं ठेव आणि झोप तू पण".….
हरी संध्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला....
सकाळी ते लोक मनालीला पोचले, हॉटेल ला जाऊन त्यांनी रेस्ट घेतला व संध्याकाळी सगळ्यात आधी तितल्या प्रसिद्ध मंदिरात दर्शना गेले.... "हदींमबादेवी मंदिरात"....
दर्शन करून हरी बाहेर निघाला, तेच ईशाला तितल्या पूजारीने थांबवलं
"बेटा, आप काहासे हो".... पुजारी
"जी मै मुंबई से हू, अपने पती के साथ आई हुन, एक मिनिट मैं अपने पती को बुलाती हू"......
"बेटा उसे मत बुलाव, मैने तुमहारे पती को देखा, तुम मेरी बात सुनो, तुमहारे पती पर किसी आत्मा का साया हे, ये धागा अपने पास रखो, इसे उसकी कलई पे बांध देना उससे वो उसके पास नही आपाएगी".............. पुजारी
ईशा हे सगळं ऐकून विचारात पडली, की काय करावं, पुजारी जे सांगतोय ते खरं असेल का, मग तिला तिच्या सोबत घडलेलं सगळं आठवलं व हरीचं त्यादिवशी वागणं आठवलं जेव्हा तो बाल्कनी मध्ये रात्री थांबला होता....
ईशा हे सगळं विचार करतच होती, तेव्हाच....
"ईशु चल"... हरी
"हां आली"... ईशा ने पटकन तो दोरा घेतला व त्या पुजारीचे पाय पडून, "धन्यवाद"..... बोलून ती निघून आली....
"किती वेळ ईशु , आणि तो पुजारी काय म्हणत होता".... हरी
"काय नाही असंच, हे बघ त्यांनी हा दोरा दिलाय, आपले नवीन लग्न झाले आहेत ना म्हणून तुझ्यासाठी".... ईशा
"अच्छा, असं.... काय तु पण ना ईशु".... हरी
"हरी बांधून घे ना".... ईशा अगदी प्रमाणे हरी ला म्हणाली
"बरं बाबा हे घे बांध"....
हरी ने त्याचा हाथ पुढे केला आणि ईशा ने तो दोरा हरीच्या हातावर बांधला.....
"बस खुश"...... हरी
"हो... खुश " ईशा
मंदिरातून बाहेर पडताच संध्या हरी च्या जवळ आली, पण जवळ येताच तिच्या अंगात आग व्हायला लागली, तिला असं वाटतं होतं की जणू तिला कोणी भट्टीत टाकून दिलं....
तेव्हाच सांध्याची नजर हरीच्या हातावर पडली, त्याचा हातावर तो दोरा बघून तिला समजलं की हे त्या धाग्यामुळे होतंय.....
संध्या पटकन तिथून निघून गेली............
हरी ईशा ला घेऊन हॉटेलला आला, तो सारखा संध्याला शोधत होता, मनातल्या मनात तिला आवाज देत होता पण संध्या नाही आली....
रात्र झाली, ईशा झोपली होती पण हरी जागा होता त्याला काय झोप लागत नव्हती, हरी ला करमत नव्हतं तो सारखं संध्याला आठवत होता, कसं तरीच होत होतं त्याला....
हरी बेडवरून उठून खिडकी जवळ गेला, त्याने खिडकी उघडली, खिडकी उघडताच त्याने पाहिलं की समोर रेल ची पट्टरी आहे व गाडी थांबली आहे, आणि समोर त्या पट्टरीवर संध्या बसली होती, संध्याच्या आजीबाजूला निळ्यारंगाची एक चमक होती....
हरीला काहीच कळत नव्हतं की हे काय आहे, असं का होतंय.....
हरी पटकन खाली गेला हॉटेल च्या बाहेर येताच त्यांनी पाहिलं की खाली सगळं नॉर्मल होतं, आधी सारखं, समोर त्याला न रेल दिसली ना संध्या....
हरी ला काहीच सुचत नव्हतं, असल्या थंड वातावरण मध्ये पण तो घामाघूम झाला होता....
हरी ने हाताने त्याचा घाम पुसला आणि तो मागे फिरला मागे फिरताच त्याने पाहिलं की त्याच्या आजूबाजूला निळ्यारंगाची रक वेगिच चमक इथून तिथून जात आहे....
ती चमक हरी च्या जवळ येत नव्हती, हरी ने हळूच त्या चमक ला हाथ लावला, हाथ लागताच ती चमक अद्रीष्य झाली.....
हरी ला काहीच कळत नव्हतं, तेव्हाच त्याने पाहिलं की संध्या समोर थांबली आहे, ती हरी पासून खूप लांब थांबली होती, हरी संध्याला बघून खुश झालं, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तो सांध्याच्या जवळ जायला लागला पण हरी जसा जवळ येत होता संध्या मागे जात होती.…..
संध्या सारखं हरीला इशारा करत होती हाथ दाखवून पण हरी ला काहीच कळत नव्हतं, हरी असाच पुढे पुढे जात होता आणि संध्या मागे...
तेव्हाच अचानक मागून आवाज आला..... " हरी "
हरी मागे फिरला... बघतोय तर ईशा समोर उभी होती
हरी ने परत मागे बघितलं तर तिथं संध्या नव्हती.... तेवड्यात ईशाने लगेच येऊन हरी ला मिठीत घेतलं...
"हरी तू इथं काय करतोय आणि खाली का आलास एवढ्या रात्री"....
हरी काहीच बोलण्याच्या शुद्धीत नव्हतं
ईशा हरी ला रूम मध्ये घेऊन गेली, हरी ने ईशाचा हाथ घट पकडून ठेवला होता आणि हरी तसाच झोपी गेलो....
ईशा हरीच्या जवळ बसून होती, ईशा ला सारखा हा प्रश्न मनात येत होता की, हरी खाली का गेला असेल, तो एवढा घाबरला का आहे????....
सकाळ झाली, ईशा तिथंच बसल्या बसल्या बेडच्या एका बाजूला टेकून झोपली होती, हरी उठला....
ईशा अजून झोपली होती, रात्री जे काय झालं, हरी ला ते थोडं थोडं आठवत होतं.....
हरी बेडवरून उठत होता, तेव्हाच ईशाची झोप मोडली...
"हरी उठलास.... कसं वाटतंय आता"....
"ठीक आहे मी".... हरी
हरी असं बोलून बाथरूम मध्ये गेला, ईशा ने तो वर चहा मागवून घेतलं, हरी जसा फ्रेश होऊन आला ईशा बोलली...
"हरी ये मस्त गरमागरम चहा रेडी आहे"......
हरी येऊन बसला आणि चहा पिताना त्याने ईशा ला विचारलं....
"ईशा काल रात्री काय झालं होतं नेमकं, मी खाली आहे ते तुला कसं कळलं"....
"हरी काल मी जेव्हा वॉशरूमला जाण्यासाठी उठली तेव्हा मी पाहिलं की तू बेडवर नव्हता, मी तेव्हा खिडकीतून पाहिलं की तू खाली थांबला आहेस, मी तुला वरतून दोन वेळा हाक मारली पण तू काय ऐकलं नाही,म्हणून मी खाली आली"......
"जेव्हा खाली आली तर बघितलं की तुझा लक्ष भलतीकडेच होता, घाबरलेला दिसत होतास तू खूप आणि म्हणून मी तुला रात्री काही विचारलं नाही"....
"हरी काय झालं, असं काही आहे का....??? जे तू मला सांगितलं नाहीयेस किंवा लापावतोय"....
हरी ने एकदम संशय भरलेल्या नजरेने ईशा कडे बघितलं आणि बोलला.... " नाही "
"बरं सोड जाऊदेत आज संध्याकाळी निघायचं आहे, लक्षात आहे की विसरलास"....
"हो".....
सांध्याच्या विचारात हरी जणू हसणं विसरून गेला, तो एकदम शांत झाला...
संध्याकाळी ते दोघं मुबई ला परत येण्यासाठी निघाले, हरी सारखं ईशा काही बोलली की मोजकं उत्तर देऊन गप बसत होता, ईशा पण हरी च्या अश्या वागण्यामुळे चिडली होती व तीही शांत झाली....
दोघे पण गाडीत बसले होते..... हरी झोपला होता
गाडी मधीच थांबली सिग्नल मुळे आणि ईशा ची झोप उडाली, ईशा ने गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं तर खूप काळोख होता, अमावस्या ची रात्र होती.... चंद्र ही जणू कुठे लपला होता
तेव्हाच ईशा ला सगळी कडे निळ्यारंगाची चमक दिसू लागली.... ईशा तिच्या जागेवरून उठली आणि गाडीच्या दारावर येऊन थांबली, ती चमक हळू हळू ईशाच्या जवळ येत होती.... ईशा त्या चमक ला बघून मोहित झाली, आणि गाडीच्या खाली उतरली आणि त्या चमक च्या जवळ गेली....
जवळ जाताच ती निळ्यारंगाची चमक अद्रीष्य झाली.... आणि तेव्हाच गाडी चा हॉर्न वाजला, ईशा पटकन गाडीत चडायला जातच होती, तेव्हा वरतून तिच्या अंगावर मंदिरातू दिलेला जो डोरा तिने हरीच्या हातात बांधला होता, तशे दोरे पडायला लागले....
ईशा जशी तशी धावत गाडी जवळ आली पण गाडी चालू झाली, ईशा धावत होती गाडीच्या मागे तेव्हाच तिच्या पायात त्या दोऱ्याची गाठ बसली आणि ईशा खाली पडली....
हरी घाबरून उठला, अगदी घामात भिजला होता तो, ईशा समोरच्या सीट वर झोपली होती, गाडी चालू होती.... नशीब स्वप्न होतं, हरी ईशा च्या जवळ गेला आणि आणि त्याने तिच्या डोक्यावर हाथ ठेवला, तेव्हाच त्याच्या लक्ष त्या दोऱ्यावर गेलं.....
तेव्हा हरीला आठवलं, की काल रात्री पण जेव्हा त्याला संध्या दिसली ती इशारा करत होती सारखं हात दाखवत होती, आता पण त्याच्या स्वप्नयात त्याने पाहिलं की ईशाच्या अंगावर ते दोरे पडत होते, व त्याच दोऱ्याने तिच्या पायात गाठ बसली.....
हरी मनातल्या मनात बोलला.... "जेव्हापासून ईशा ने माझ्या हातात दोरा बांधला आहे, तेव्हापासून संध्या दिसली नाही, भौतेक ती मला हेच सांगायचं प्रयत्न करते"....
हरी पटकन उठला आणि गाडीच्या दारावर गेला, त्याने जशी तशी त्या दोऱ्याची गाठ खोलली, गाडी तेव्हा एका पुलावरून जात होती, खाली नदी होती.... हरीने पुढचा विचार न करता तो दोरा खाली फेकून दिला आणि डोळे मिटून तसाच तिथं थांबून रहायला.....
तेव्हाच संध्या बरोबर त्याच्या मागे येऊन थांबली........
संध्या हरीच्या मागे थांबली होती, हरी हळूच मागे फिरला, पण संध्या हरीच्या समोर आली नाही, हरी त्याच्या सीट वर जाऊन बसला, ईशा झोपली होती....
सकाळ झाली, हरी आणि ईशा घरी पोचले....
"Finally home sweet home.... बर वाटलं आता".... ईशा
हरी ने काहीच उत्तर दिलं नाही तो शांतच उभा होता.....
संध्याकाळ झाली हरी बाल्कनी मध्ये थांबला होता, ईशाला काहीच कळत नव्हतं की हरी असा का वागतोय, ईशा हरी सोबत बोलण्यासाठी बाल्कनी मध्ये आली, पण तेव्हाच तिचं लक्ष हरीच्या हातावर गेला....
"हरी तुझ्या हातावरचा दोरा"... ???
हरी ने ईशा कडं पाहिलं आणि बोलला.... "माहीत नाही पडला असेल"
"असं कसं पडला"...
"ईशा stop it यार, बोललो ना माहीत नाही".... हरी अगदी रागात बोलला
"हरी तुला झालाय काय, तू का एवढा चिडतोय, कधी पासून बघतेय मी, एकटा एकटा बसून रहातो, ना नीट बोलतोय ना नीट वागतोय, काय झालंय का"....????
"ईशा just leave it यार, i am not in a mood of any conversation, please just leave it"..... हरीचा राग त्याच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होता
"Oook... ठीक आहे जाते मी".... ईशा बेडरूम मध्ये जाऊन बसली, ईशा रडत होती, तिला काहीच कळत नव्हतं, हरीचं हे वागणं तिला अजिबात पटत नव्हतं
रात्र झाली.... हरी बेडच्या एक कोपऱ्यात तोंड करून झोपला होता तेच ईशा दुसऱ्या बाजूला, दोघे ही जागे होते पण एक मेकांसोबत बोलत नव्हते....
हरी ला माहीत होतं की चूक त्याची आहे, पण तो सध्या फक्त संध्या चा विचार करत होता की ती कुठे गेली....
दिवस असेच जात होते, संध्या परत हरी ला कधी दिसली नाही ना स्वप्नयात ना प्रत्यक्षात....
हरीने त्याची चूक स्वीकारली, त्याने ईशा सोबत भरपूर वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण ईशा च्या मनातून राग जात नव्हता......
सगळं एकदम विस्कटलं, हरी आणि ईशा च्या मध्ये वाद वाढायला लागले संध्या पण परत हरी ला दिसली नाही.......
..............................
एक दिवस हरी ऑफिस मध्ये डोळे मिटून खुडचिवर मान वर करून बसला होता....
तेव्हाच त्याला अचानक एक वेगाच ड्रीष्य दिसला, हरी ला त्याच्या केबिन मध्ये त्याच्या टेबल च्या समोर ईशा सोफा वर बसलेली दिसत होती....
हरी ला काहीच कळत नव्हतं की हे काय होतंय, हरी त्याच्या जागेवरून उठला आणि ईशा च्या जवळ गेला तेव्हाच ईशा सोफा वरून उठली आणि हरीच्या आर पार निघून गेली....
हरी हे बघतच रहायलं, त्याला काहीच कळत नव्हतं.... हरी मागे फिरला ईशा तितच थांबली होती, ईशा ने अचानक तिच्या डोक्यावर हाथ ठेवला, ईशा ला चक्कर येत होते, हरी तिला पकडायला तिच्या जवळ गेला आणि तिच्या कमरे वर हाथ ठेवून हरी ईशाला धरायला गेला, पण ईशा खाली पडली, हरी खाली बसून ईशा ईशा ओरडत होता, तिला उठवत होता पण ईशा बेशुद्ध झाली होती, हरी ईशा ला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करत होता पण ते शक्य नव्हतं....
तेव्हाच हरीच्या केबिन मध्ये त्याची Assitant आली..... "सर काय झालं तुम्ही खाली काय करताय".....
हरी एकदम शुद्धीत आला, बघतोय तर तो त्याच्या ऑफिस मध्ये होता, त्याने खाली बघितलं तर ईशा तिथं नव्हती, हरी ने त्याच्या डोक्यावरचा घाम पुसला आणि उभा झाला....
"सर its everything oook".....
पण हरीने काहीच उत्तर दिलं नाही, हरी काही न बोलता पटकन ऑफिस वरून घरी जाण्यासाठी निघाला....
हरी सारखं ईशा ला फोन लावत होता पण ईशा फोन उचलत नव्हती, हरीला खूप टेन्शन येत होतं, फटाफट तो घरी पोचला, हरीने पटकन खिशातून घराची चावी काढली आणि दार उघडला, दार उघडताच त्याची नजर ईशा वर पडली, ईशा बेशुद्ध होऊन खाली पडली होती....
हरीने पटकन ईशा ला उठवायचा प्रयत्न केला पण ईशा उठत नव्हती, हरी धावत किचन मध्ये गेला आणि पाणी घेऊन आला, हरीने ईशा च्या चेहऱ्यावर पाणी शिंकडलं आणि ईशा शुद्धीत आली, हरी ला समोर बघताच ईशाने हरी चा हाथ धरला, हरीच्या पण जीवात जीव आला, त्याने ईशा ला त्याच्या ओंजळीत घेतलं....
हरी ईशा ला दवाखान्यात घेऊन आला....
"घाबरायची काय गरज नाहीये, अश्या situation मध्ये हे normal आहे पण, काळजी घ्या".... डॉक्टर
"सर म्हणजे"...... हरी
"Means तुमची wife pregnant आहे, soon you gonna have a baby"......डॉक्टर
हरी आणि ईशा हे ऐकून खूप खुश झाले.... हरी ईशा ला घेऊन घरी आला…..
घरी येताच ईशा बोलली..... "हरी what you think काय होईल, baby girl or boy"..... ईशा
"माहीत नाही पण i am damn excited dear".... हरी
"तुला माहीत आहे मी तर नाव पण ठरवून ठेवले आहेत"....ईशा
" अच्छा ".... हरी
"हो, हरी एकदम वेगाचा वाटाय आज"...
हरीने ईशा कडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसला....
" हरी "..... ईशा एक दम हळूच बोलली
" हां ईशु बोलना ".... हरी ने अगदी प्रमाणे उत्तर दिला
"हरी सॉरी यार, please सॉरी".....
हे ऐकताच हरी पटकन ईशाच्या जवळ गेला.... "अरे काय झालं अचानक, आता तर एवढ्या चांगल्या मूड मध्ये होतीस.... अरे ईशु रडतोस का तू पागल झाली आहेस का".... हरी
"हरी खूप त्रास दिला ना मी तुला एवढ्या दिवस, तुझ्यासोबत नीट वागली नाही मी, आज जर तू धावत आला नसता तर".... ईशा
"तर काय.... ??? गप काही पण बोलू नकोस आणि चुकी तर माझी आहे ईशु, मीच येड्या सारखं वागत होतो.... am sorry" हरी
"नाही मी आधी बोलली ना sorry मग माझी चुकी आहे".... ईशा
" ईशु ".... हरी
"बस्स आता जाऊदेत तुझी चुकी आहे ".... ईशा
" अच्छा चापटर आहेस ".... हरी
" आता ना मला उचल आणि बेडरूम मध्ये घेऊन जा आठवतं ना डॉक्टर नि काय सांगितलं आहे, i need rest"..... ईशा
"अच्छा फक्त उचलून घेऊन जाऊ".... हरी प्रेमाने बोलला
"नको तसं, काही दुसरं विचार असेल तर काय हरकत नाही, manage करून घेईन मी"..... ईशा
अच्छा.... हरी ने पटकन ईशा ला उचललं आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला....
रात्र झाली, जेवल्यानंतर दोघे ही बेडवर झोपले होते, हरी ईशाच्या केसांमध्ये हाथ फिरवत होता....
"हरी पण तुला कसं कळलं की मी बेशुद्ध होऊन पडली आहे घरी, तू तर ऑफिस मध्ये होता ना"..... ईशा
"ते काय ना त्याला प्रेम म्हणतात, मला पटकन कळतं की तू कुठे आहेस काय करतेय, काय विचार करतेय"....... हरी
"चल काहीही पकवू नकोस"..... ईशा
"अग बघ तुला खोटं वाटाय"..... हरी
"हो वाटाय, अच्छा येवडच आहे ना तर सांग आता मी काय विचार करतेय".... ईशा
"अच्छा सांगू... उममम आता ना तुझ्या मनात विचार चालू आहे की मी तुला असं जवळ घ्यावं".... हरी
हरी ने बोलता बोलता पटकन ईशा ला जवळ घेतलं....
"अच्छा, पण मी तर काय असला विचार केलाच नाही".....
"असं का.... ! तर मग आता कर"..... हरीने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं
.....................................
ईशा झोपली होती, पण हरीला झोप लागत नव्हती, तो सारखं आज जे घडलं, त्याला ऑफिस मध्ये जे सगळं दिसलं त्याच्या विचार करत होता, हरी ला खात्री होतो की जे काय झालं त्याच्या मागे संध्याच आहे, तिने ईशा चा जीव वाचवलं आणि मला ही येऊन सांगितलं पण संध्या आहे कुठे....
हरी मनातल्या मनात संध्याचं खूप आभार मानत होता, पण ती त्याला दिसत नव्हती.....
पण संध्या तितच होती..... संध्या बेडवर हरी आणि ईशाच्या मधेच झोपली होती, ती एकटक ईशाच्या पोटाकडे बघत होती आणि मग तिने हळूच तिचा हात ईशा च्या पोटावर ठेवलं आणि बोलली....
"वाट पाहतेय मी तुझी, बस लवकर ये"...... संध्या
संध्या हरी आणि ईशाच्या आसपासच होती, जेव्हा हरी ने दोरा गाडीच्या बाहेर फेकलं तेव्हापासून संध्या हरी आणि ईशा च्या जवळच होती, पण त्या दिवस नंतर संध्या कधी हरी ला दिसली नाही.....
हरीचे घरचे व ईशा चे घरचे सगळेच खूप आनंदात होते....
सगळं चांगलं चालू होतं तेव्हाच एक दिवस हरी ईशाला त्यांच्या गुरुजी कडे आश्रम मध्ये घेऊन गेला, नुसतंच आईने त्याला सांगितलं होतं की जाऊन पाया पडून या करून....
हरी आणि ईशा आश्रम मध्ये आले... पाया पडून झाल्यावर गुरुजींनी ईशा ला आश्रम ची परिक्रमा करायला सांगितली आणि हरी ला त्यांनी त्यांच्या जवळच बसवलं.....
हरी ला समजलं नाही, पण ईशा ला खात्री झाली की बहुतेक गुरुजींना काहीतरी हरीला सांगायचं आहे.....
ईशा उठून परिक्रमा करायला गेली.... तेव्हाच गुरुजींनी हरीला सांगितलं....
"बाळा, तू काही तरी चूक केली आहेस ज्याच्या परिणाम तुला भोगावा लागणार आहे"..... गुरुजी
"गुरुजी कोणती चूक"..... हरी
"बाळा कर्म ह्याचं अर्थ काय माहित आहे तुला, जे कर्म इथं तू केले आहेस ना ते तुला इथंच फेडावे लागणार, कर्माच्या पुस्तकात माफी नसते, सगळ्यांचे हिशोब कर्म वेळेनुसार करतो"..... गुरुजी
"तुझ्या बाळाला जीवाचा धक्का आहे, बायकोची नीट काळजी घे बाकी जशी देवाची मर्जी"... गुरुजी
"गुरुजी काय सांगताय तुम्ही, ह्याचा काही तरी उपाय असेल ना.... माझं बाळ"..... हरी
"बाळा तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुला वेळ देईल, हे घे प्रसाद आणि संभाडून जा"..… गुरुजी
हरी गुरुजींचे पाय पडून उठला आणि तिथून ईशाला घेऊन निघाला
जाताना कार मध्ये ईशा ने हरी ला विचारलं..... "हरी काय बोलले का गुरुजी, आश्रम मधून निघालास तेव्हा पासून खूप शांत आहे तू"....
"नाही ग तसं काही नाहीये.... फक्त डोकं जळ झालय"....
"घरी जाऊन मस्त चेपून देते तेल लावून बरं वाटेल मग थोडं"...
"हो चालतंय की"....
हरी अगदी विचारात गुंतला होता, नक्की काय आणि कुठली चूक आहे जेच्यामुळे त्याच्या बाळाला जीवाचा धक्का आहे ते हरी ला काहीच कळत नव्हतं....
दोघे पण घरी पोचले, हरी ईशा च्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता आणि ईशा त्याच्या केसांमध्ये तेल लावून मालिश करत होती.....
"ईशु मला न कळत नाही, की नेहमी मीच का अडकतो प्रोब्लेम्स मध्ये"..... हरी
"काय झालं हरी कसलं प्रॉब्लेम"..... ईशा
"यार म्हणजे ना सोड आता काय सांगू तुला"..... हरी
"का काय झालं सांग ना, गुरुजींनी काय सांगितलं".... ईशा
हरी हे ऐकून आश्चर्यात पडला, त्याला ईशा च्या आवाज वेगळा ऐकू आला, हरी पटकन ईशा च्या मांडिवरून उठला....
"अरे काय झालं हरी उठलास का, अजून मालिश बाकी आहे ये"..... ईशा
ईशा चा आवाज वेगाचा होता ती खाली मान टाकून बोलत होती, हरीला आता भीती वाटायला लागली, त्याला खात्री झाली की हे नक्की वेगळच आहे काय तरी.......
तेव्हाच ईशा परत अगदी प्रेमाने बोलली...... "हरी काय विचार करतोय ओळखलं नाहीस तू मला, थांब आता तुला आठवले"....
इशाने असं बोलून गाणं म्हणू लागली.....
"पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले".....
गाणं ऐकताच हरी बोलला..... " संध्या ! "
हे ऐकताच ईशा ने मानवर करून हरी कडे बघितलं.... "खूप वेळ लावलंस हरी , विसरलास तू मला".….
"संध्या तू हे काय करतेय, तू ईशा च्या अंगात"..…
"हो हरी..... पण त्यात काय चुकीचं आहे, मी पण तर बायको आहे ना तुझी, लग्न नाही झालं आपलं पण तरी मी तर तुला माझं नवरा म्हणून कधीच स्वीकारलं आहे"....
"संध्या हे तू काय बोलतेस, मस्करी करतेय ना तू, संध्या please नको करुस मस्करी, भीती वाटते आता मला".... हरी
"मस्करी, मी कुठे मस्करी करते, बघ मी हसतेय का बघ"..... ईशा हरीच्या
अगदी जवळ येऊन त्याच्या तोंडाला तोंड लावत म्हणत होती...
"संध्या मी तुला चांगल्या साठी आणलं होतं घरी, तुला मुक्ती मिळावी म्हणून"...... हरी
"आणि मी तेच करतेय हरी, अरे तू रडतोय का मी कुठे काय केलं आहे ईशाला किती दिवसापासून मी राहतेय बघ पण कधी काय केलं का मी तिला, शेवटी माझी लाडकी सवत आहे , आणि तिच्या मुले तर मला मुक्ती मिळणार आहे"....
"संध्या जे काय झालं ते माझ्यामुळे झालं, त्यात ईशा ला काहीच माहीत नव्हतं संध्या तुला तर माहीत आहे please संध्या ईशाला सोडून टाक"..... हरी
"नाही हरी अजून ती वेळ आली नाहीये..... इतके दिवस मला तू आठवत होतास, तेव्हा तुझ्या बोलण्यात प्रेम दिसत होतं पण आज तुझ्या बोलण्यात भीती का दिसतेय, मला कधीपासून घाबरायला लागला तू".....
"एवढे दिवस तर नाही घाबरला जेव्हा, मी रोज तुझ्यासोबत हातात हात घालून फिरत होती, तुला जेवण बनवून भरवत होती, तुझ्यासोबत रोज मी झोपत होती"....
"पण ईशा च्या प्रेमात आंधळा झाला आहेस तू , तुला कळलच नाही की ईशा च्या जागेवर मी आहे तुझ्यासोबत".....
"त्या दिवशी जेव्हा तू तो दोरा फेकलास ना पाण्यात तेव्हा मी तुझ्या मागेच उभी होती, तुझं माझ्यावर प्रेम बघून मन तर करत होत की तुला मिठीत घेऊ, पण माझी पण मजबुरी आहे ना".....
"त्या दिवसापासून मी ईशा च्या अंगात आहे आणि अजून थोडे दिवस रहाणार मी, जे पर्यंत माझं काम होत नाही हरी"....
आणि हां घाबरू नकोस मी माझ्या लाडक्या सवत ला काही होऊ देणार नाही"..... ईशा
ईशा हरी च्या जवळ आली आणि आणि हरीच्या गालावर तिने चुंबन दिलं आणि तशी ती खाली पडली.....
हरीने पटकन तिला उचलं आणि तिला बेडवर झोपवलं.....
हरी ईशाला सारखं उठवत होता, तिच्या गालावर सारखा हाथ फिरवत होता....
"ईशा उठणा ग काय झालं तुला ईशा, उठणा".... हरी
तेव्हाच ईशाने एकदम डोळे उघडले आणि बोलली..... "Thanks हरी मला उचलून बेडवर झोपण्यासाठी".....
हरी एकदम दचकला, ईशा चा हाथ सोडून तो मागे गेला.....
अरे हे काय हाथ सोडला तू ईशा चा, आता....??? तुला माहितीय का इतक्या दिवसा नंतर मी आज का आली तुझ्यासमोर.... कारण तुला गुरुजींनी सगळं सांगितलं आणि तुझ्या डोक्यात काय चालाय आई ला तू इथं बोलवशील, पूजा घालायला लावशील, पण नाही हरी जर तू अस काय केलस ना तर लक्षात ठेव ईशा माझी लाडकी आहे पण शेवटी सवत आहे"..….
"आता आपल्या दोघांकडे एकच रास्ता आहे.... ईशाला बाळ होई पर्यंत दिवस मोजायचे तू पण आणि मी पण".....
हरी खूप घाबरला होता.... ईशा झोपली पण हरी ला झोप लागत नव्हती, संध्या ईशाच्या शरीरात आहे ह्याची भनक पण नव्हती हरीला....
हरी बेडच्या समोर बसला होता आणि एकटक ईशा ला बघत होता....
हरी च्या डोक्यात सध्या एकच विचार होता की ईशाला संध्या पासून लांब कसं करावं....
हरी रात्र भर तितच बसून होता व तिथंच बसल्या बसल्या झोपला,
सकाळ झाली ......
"हरी तू इथं का झोपलाय, काय झालं".... ईशा ने हरी ला झोपेतून उठवलं
"काय नाय असच, ईशु तुझी तबेत कशी आहे आता"....
"मला काय झालं, मी तर एक दम fit and fine आहे, आधी हे सांग की तू इथं का झोपला होता असा"....
"काय न ग, ते बसून इथं जरा मी ऑफिसचं काम करत होतो, आणि झोप लागली"....
"काय हरी तू पण अशी कशी झोप लागली"....
ईशा बोलत बोलत किचन मध्ये गेली, हरी तिच्या मागे मागे किचन मध्ये गेला, तिथून ईशा हॉल मध्ये आली आणि हरी पण तिच्या मागे आला....
"हरी माझ्या सोनू काय लावलं आहेस हे तू सकाळी सकाळी.... नुसतं मागे मागे फिरतोय अंघोळ करून ये जा, ऑफिस ला नाही जायचं का"....???
"ईशु ऐक ना मी काय म्हणतोय"....
"हां साहेब बोला"...
"थोडे दिवस आपण आई कडे जाऊया का तुझ्या....??? बघना किती दिवस झाले तू आईला भेटली पण नाही, मग काय म्हणतेस जायचं"....
"हां पण असं अचानक का"....?? ईशा हळूच बोलली
"अचानक कुठे ईशु , बघ आता तूझी Pregnancy ची बातमी ऐकून आई बाबा किती आनंदात आहे आणि त्यात जर आपण त्यांना भेटायला जाऊ तर त्यांना किती आनंद होईल"....
"हो पण तरी.... असं अचानक जायचं"....
"हो मग काय suprise देऊया ना जाऊन त्यांना".....
"अच्छा suprises द्याच आहे".... ईशाचा आवाज अचानक बदलला, हरी हे ऐकून दचकला....
"मी काल तुला इतका मोठा suprise दिलं तरी अजून तुला suprise द्याचा आहे हरी".....
"ठीक आहे दे किती ही करशील ना तरी मी जाणार नाही हरी…. कर तू, तुला हवं ते कर ईशा ला माझ्यापासून जितकं लांब ठेवण्याच्या प्रयत्न करायचं आहे कर, पण पुढे काय होणार ह्याचा विचार पण कर नंतर सांगू नको की मी बोलली नाही तुला".... ईशा असं सांगून लगेच नॉर्मल झाली,
हरी काय बोलेन त्या आधीच ईशा बोलली.....
"चालतंय की हरी, मी फटाफट आवरून घेते, मग आपण निघुया लगेच"....
हरी काहीच बोलला नाही..... पण संध्या ने दिल्या धमकी मुळे हरी नुसताच घाबरला होता
दुपारी दोघे पण कार ने ईशा च्या घरी जायला निघाले रस्त्यात अचानक गाडी बंद पडली....
"हरी काय झालं गाडी काशी काय बंद पडली"....
"थांब बघतो काय झालं आहे".... हरी खाली उतरला व त्याने बोनेट उघडून पाहिलं
"काय नाही गाडीतच बस ईशु उतरू नको, झाला"..... हरी ने असं म्हणत बोनेट बंद केला पण बोनेट बंद करताच त्याने पाहिलं की ईशा गाडीत नव्हती.….
"ईशा, ईशा कुठे आहेस तू.... ईशा" .....
हरी ने सगळी कडे पाहिलं पण ईशा कुठेच नव्हती, हरी चे हाथ पाय अचानक गारठले एक दम शांतता होती, इतकी शांतता की हरी ला त्याच्या घडल्यालाचा पण आवाज ऐकू येत होता....
"टिक टिक टिक"....
तेव्हाच हरी ला रेलगाडी चा आवाज आला, हरी रस्त्याच्या खाली उतरला आणि थोडं पुढे चालत गेला... बघतोय तर काय पूढे रेल च्या पट्टरीवर ईशा चालत जात होती आणि समोरून वेगाने गाडी येत होती.....
हरी "ईशा, ईशा"..… ओरडत धावत सुटला ईशाला वाचवण्यासाठी, पण तो पोचेल त्या आधीच गाडी ने ईशाला उडवलं....
हे बघताच हरी जागेवर त्याच्या गूढघ्यानवर पडला, हरी जोर जोरात रडू लागला.....
गाडी निघून गेली, हरी पटकन उठला आणि पट्टरीवर गेला, पण तिथं काहीच नव्हतं, रक्ता ची एक थेंब पण नाही.....
हरी खुप रडत होता तेव्हाच त्याच्या फोन ची रिंग वाजली....
हरी ने खिशातून फोन काढून बघितलं तर, भीतीने त्याच्या अंगावर काटे उठले अचानक.…...
तो फोन ईशाचा होता, हरी ने फोन उचलला.....
"हरी ऐक ना येताना आज जरा, बाजारातून ना गुलाब जामुन चा पॅकेट घेऊन ये हां.... आणि हा शोनू लवकर ये, I am waiting for uhhhh"....
हरी हे ऐकताच त्याने ईशाला विचारलं.... "ईशा तू कुठे आहेस"
"मी घरी आहे हरी, आणि काय झालं तुझा आवाज का असा येतोय,कुठे आहे तू,ऑफिस ला गेला नाहीस का"....???
"नाही काय नाय, ईशा तू ठीक आहेस ना"....
"हो हरी मी ठीक आहे, मला काय होणार, पण तू ठीक आहेस ना".....
"मी घरी येतोय ईशा, तू जाऊ नकोस कुठे, मी येतोय लगेच".....
"हां हरी ठीक आहे ये तू मी कुठे जात नाहीये".....
हरीच्या जीवात जीव आला, "हे नकीच संध्याने केलं असणार.... संध्या खूप चुकीचं करतेय तू"...... हरी मनातच बोलला
हरी ने फोन ठेवला आणि तो धावत जाऊन गाडीत बसला, हरीने लगेच गाडी फिरवली आणि तो घरी पोचला, घरात शिरताच त्याने ईशाला आधी त्याच्या मिठीत घेतलं....
"हरी, हरी ठीक आहेस ना तू काय झालं, एवढा घाबरलेला का दिसतोय तू"....
"ईशा तू ठीक आहेस ना, तुला काय झालं नाही ना"....
"अरे हो मी ठीक आहे, सकाळीच तर बोलली तुला मी.... पण तुला काय झालं".....
"काय नाही ईशु, बस तुझापासून लांब जावसं वाटत नाहीये, त्या दिवशी नशीब म्हणा मी आलो वेळेवर, पण तेव्हा पासून मला खूप भीती वाटते तुला एकटीला सोडून जायला"....
हरी ने गोस्ट फिरवून टाकली जेच्याने ईशाला काही कळलं नाही पाहिजे.....
"अरे माझ्या शोनू, तू पण ना किती ते काळजी".....
ईशा ने हरी ला एकदम tight hug केला.... आणि थोडा वेळ अशीच थांबली
दिवस असेच जायला लागले, हरी ने ऑफिस ला जाणं बंद करून टाकलं, कधी गेला तरी त्याच्या जीव घरातच असायचा ईशा मध्ये.... हरी नुसतं ईशाच्या मागे मागे रहाऊ लागला,मधीच कुठे कुठे संध्या ईशा च्या शरीरात यायची, पण हरी त्याच्या पूर्ण प्रेमाने ईशा ला मिठीत घेऊन थांबून रहायचं जे पर्यंत संध्या जात नाही आणि संध्या निघून जात असे....
पण हे प्रकरण दिवसांदिवस वाढत चालला होता, आणि हरी ची भीती पण, त्यात हरीने भुरपूर वेळा प्रयत्न केला की ईशाला देवळात घेऊन जाण्याच्या पण ते शक्य झालं नाही तेवढच नव्हे पण त्याने कितेक तरी, पुजारी जाणकार ब्राह्मण आधी ना घरी आणायचा प्रयत्न केला पण ,नेहमी काय ना काय होत असे....
हरी ने खूप प्रयत्न केलं पण शेवटी काहीच परिणाम त्याला भेटलं नाही, त्यातच एक दिवस असा आला…...
ईशा बाल्कनी मध्ये बसली होती, तिला आता सातवा महिना चालू होता....
ईशा बसल्या बसल्या रडायला लागली..... तेव्हाच मागून हरी आला, हरी ने तिला रडताना बघून पटकन विचारलं
"अरे ईशु काय झालं, रडतोस का"....
तेव्हा ईशा ने हरी चा हाथ धरला आणि रडत म्हणाली....
"हरी मला खूप भीती वाटते, माहीत नाही का पण ना मला मधीच सगळं विसरायला होतं, मी काय करतेय मला काहीच लक्षात रहात नाही".....
"ईशा, ईशा आधी तू शांत हो... बघ pregnancy मध्ये असं होतं असतं ग बाई.... तू घाबरतेस का मी आहे ना".....
"हरी तुला एक सांगू, कधी कधी ना मला असं वाटतं की आपलं बाळ ना जिवंत नाहीये, मला त्याचे heart beats feel नाही होतं"....
हे ऐकताच हरी ने ईशाला त्याच्या मिठीत घेतलं आणि तिला शांत करत म्हणाला.....
"बस ईशु काहीच बोलू नको पुढं, शांत हो आपल्या बाळा ला काहीच होणार नाही"....
हे ऐकताच ईशा ने ही तिचे दोनी हाताने हरीला मिठीत घेतलं आणि हळूच बोलली....
"हो हरी बाळाला काही होणार नाही मी आहे ना".....
हे ऐकताच हरीने ईशाला सोडला हा आवाज संध्याचा होता.... हरी ईशाला बघत होता
"हरी मोजतोय ना दिवस बस थोडे दिवस अजून..... मग सगळं तुझ्या मनासारखं होईल"....
"संध्या कुठ पर्यंत असं भीतीत जगू मी, ह्याच्या पेक्षा बर होईल की मारून ताक मला, घेऊन ताक बदला, मग तुला शांतता भेटेन ना"....
हे ऐकून संध्या हसायला लागली.... "हरी असलं काही होणार नाहीये पण एक होणार तू जगे पर्यंत मी सोबत असनार तुझ्या मग तुझी ईच्छा असेल की नसेल".....
"आणताना मला तू खूप प्रेमाने आणलं, पण ते तेवढ्या प्रेमाने झपु नाही शकला".....
"प्रेम, तुला काय माहीत की जेव्हा तू मला दिसत नव्हती तेव्हा माझी काय अवस्था झाली होती, पण मला कुठे माहीत होतं की प्रेमाचा खरा अर्थ तुला माहीतच नाहीये".... हरी
"शेवटी तू तेच केलं जे एक आत्मा करतेय, पण लक्षात ठेव संध्या मारणारा पेक्षा वाचणारा मोठा असतो, माझ्या बाळाला की ईशाला काही झालं न तर मी"..... हरी त्याचे शब्द पूर्ण नाही करू शकला, पण त्याचा डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब मध्ये ईशा आणि त्याच्या होणाऱ्या बाळाची काळजी होती....
"खूप जास्त emotional झालास हरी, पण का ईशा साठी, तुझा बाळा साठी की माझ्यासाठी".....????
"बर चल मी तुझं थोडं टेन्शन कमी करून टाकते, पुढच्या तीन आठवडा नंतर तू याच condition मध्ये रडत आशील, कारण की तू तेव्हा काय तरी गमावणार आहेस"....
हे ऐकून हरी जागेवरून उठला आणि ईशा समोर रागाने बघू लागला.....
"फक्त ३ आठवडे हरी आणि वाचणार फक्त दोन लोक".....
हरी ला खूप टेन्शन येत होतं की आता पूढे के होईल, पण त्या दिवसा नंतर सगळं नॉर्मल झालं, अगदी नॉर्मल संध्याने जणू ईशा ला सोडलंच, सांध्याच्या असण्याचा भासही हरी ला परत झाला नाही कधी.....
पण तरी हरी आधी पेक्षा जास्त लक्ष ठेवत होता ईशा वर..... बघता बघता तीन आठवडे संपत आले, उद्या शेवटचा दिवस होता....
त्या दिवशी रात्री ईशाला हरी ने झोपवलं आणि स्वता तिच्या बाजूला बसून बस एक टक तिला बघत होता, खरं तर हरी ला खूप भीती वाटत होती,कुठल्या ही क्षणी काही ही होऊ शकतं, ह्याची त्याला खात्री होती.....
हरी नजर न चुकवता ईशा ला बघत होता, तेव्हाच अचानक त्याला खूप थंडी वाजायला लागली, एक दम गार वारा सुटला, हॉल मधून खूप गार वारा येत होता, हरी ने ईशा कडे पाहिलं आणि मग उठून हॉल मध्ये गेला, बघितलं तर बाल्कनी ची खिडकी उघडी होती हरी ने खिडकी बंद केली....
मागे वळताच त्याने पाहिलं की हॉल मध्ये सगळी एक निळ्या रंगाची चमक वाहत होती, ते ड्रिष्य खूप विस्मयकारक होता, हरी ला कळलं की नक्की काही तरी होणार आहे, तो घाबरला आणि धावत बेडरूम मध्ये आला, ईशा गार झोपेत होती.....
तेव्हाच पातून त्याला आवाज ऐकू आलं..... " हरी "
हरी मागे वळला आणि हळूच चालत परत हॉल मध्ये आला, हरी ला त्याच्या समोर जे काही त्याच्या सोबत घडलं होता ते सगळं दिसत होतं, जणू त्याच्या समोर theatre चा मोठा परदा आहे ज्यावर त्याला सगळं स्पष्ट दिसत होतं, सुरवाती पासून जेव्हा तो संध्याला भेटला तेव्हापासून.....
तेव्हाच संध्याने त्याचा हाथ धरला, हरी घाबरला बघतोय तर काय बाजूला संध्या उभी होती, संध्या हरी ला पुढे घेऊन आली..... पुढे येता येता अचानक सगळं बदललं.....
हरी रेल गाडीत दारावर उभा होता, गाडी पुला वरून जात होती संध्या हरीच्या मागे थांबली होती, हा तोच दिवस होता ज्या दिवशी हरीने मनाली वरून येताना तो दोरा पाण्यात टाकून दिला होता.....
हरी ने त्याच्या हातातून दोरा काढला, तो दोरा तो फेकणारच होता पाण्यात तेव्हाच अचानक त्याने तो दोरा खाली न फेकता त्याच्या खिश्यात ठेवला आणि डोळे मिटून तितच थांबला....
संध्या हरीच्या मागेच उभी होती, हे पाहून संध्याला कसं तरी वाटायला लागलं आणि जसाच हरी मागे फिरला ती अद्रीष्य झाली....
सगळं अचानक नॉर्मल झालं, संध्या हरी च्या समोर उभी होती, हरीने त्याचे डोळे मिटून घेतले, आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं....
हरी ने त्याच्या खिश्यात हाथ टाकला आणि तो दोरा काढला आणि वर मान करून संध्याला ला बघितलं, संध्याचा शरीर अगदी चमकत होता, जसे आकाशातले तारे....
"का हरी.....??? माझ्या मनात तुझ्याबद्ल कधीच वाईट विचार नाही आला, मग तू का असं केलस, त्या दिवशी तू तो दोरा फेकलाच नाही, हे बघून मला खूप वाईट वाटलं, मन केलं की तुला सोडून जाऊ पण माझाकडून ते नाही झालं हरी"....
"बस एकदा मला बोलला असता हरी मी निघून गेली असती, पण तू असं का केलं आणि जर हेच करायचं होतं तर मग आणलं का मला सोबत".....
"हरी मी ईशाचा किंवा तुझा बाळाचा जीव घेऊन काय करू, काय मिळणार मला.... नकोय मला काहीच इतके दिवस मी बस्स ईशाच्या शरीरात रहाऊन हे मान्य करत होती की ते बाळ फक्त ईशा आणि तुझा नाही माझा पण आहे"....
"का केलस अस हरी"..... ?????
हरी थोडं वेळ असंच थांबला,त्याने तो दोरा बाजूला फेकला आणि शेवटी त्याने संध्याला तिच्या प्रश्नांचा उतर दिलं....
"संध्या मी तुला चांगल्या मनाने घरी घेऊन आलो होतो, तेच नवे पण माझ्यामनात कधीच अस आलं नाही की तुला"....???
"पण लोकं मला वेळा समजत होते, माझ्याबद्ल काहीही बोलत होते, इतकंच नाही पण माझ्यासोबत लोकांनी बोलणं बंद करून टाकलं, माझे सगळे जवळचे मित्र मैत्रिणी, ऑफिसचा स्टाफ सगळ्यांना वाटत होतं की मी वेळा झालोय, ऑफिस मध्ये सारखी माझी complaint जायची की हरी एकटाच बडबड करत असतो, काय माहीत कोणासोबत बोलतो.... चालताना येताना जाताना त्याची बडबडत चालू असते, पागल झाला आहे तो"....
"लहान पोरं, चिडवायला लागले मला, वेळा वेळा करून..... मला काहीच सुचत नव्हतं संध्या की काय करू लोकांना कसं समजवू, तू नेहमी माझ्यासोबत असायची, ऑफिस मध्ये घरी बाहेर सगळी कळे, मी तुला स्वता आणला होतं आणि माझी हिम्मत होत नव्हती तुला सांगायची की".....
"जेव्हा ईशा ने तो दोरा माझ्या हातात बांधला तेव्हापासून तू माझ्या कडून दुरावलीस, आधी मला खूप वाईट वाटत होतं मी सारखं तुझी आठवण काडत होतो, माझ्या मनात आलपन की तो दोरा फेकला की तू येशील माझ्याजवळ आणि मी तेच करायला गेलो होतो पण तेव्हाच, माहीत नाही काय झालं मला, कुटून हे सगळे विचार यायला लागले मनात आणि मग मी ठरवलं की जे करावं लागेल ते मी तुझ्या मुक्ती साठी करेन, मंदिर दरघा चर्च कुठेही जावं लागलं ना चालेल पण तुझ्यामुक्ती चा मार्ग शोधून काढेन आणि तीच माझी चूक झाली, मी ते विचार करून तो दोरा खिश्यात ठेवला आणि विचार केला की ह्याच्याने तू माझ्या जवळ येणार नाहीस आणि मग परत कोणाला वाटणार नाही की मी".... ???
"आणि तेच मी काहीही करून तुला मुक्ती मिळावी त्यासाठी हवं ते करेन आणि"..... हरी
"पण तसं झालं नाही ना.... खूप फिरलास ना तू ईशा ला खोटं बोलून बोलून, पण झालं नाही ना काही, बरीच पूजा केलीस तू, दान धर्म केलं.... पण जे करायचं होतं ते नाही केलस हरी".... संध्या
"तुला आठवतं मी काय बोलली होती हरी...... हरी, मला नाही माहीत मला मुक्ती काशी मिळणार पण एक क्षण मात्र एक क्षण, एक अशी वस्तू एक अस काम ही पुरेल ज्याचने मला मुक्ती मिळेल"....
"आणि तो क्षण होता तू हरी, तुझा माझ्यासोबत एक क्षण प्रेमाचा बस"....
"जर मनापासून हे केलं असतं तर हे कधीच झालं असतं, मी हे तुला आधीही सांगू शकली असती, पण मला तुझं खरं प्रेम हवं होतं हरी"....
संध्या बोलता बोलता रडायला लागली..... "हरी मला माहित आहे मला घेऊन तू कधीच वाईट विचार नाही केलास, तू आश्रम मध्ये पण हाच्याचा साठीच गेला होता, तिथं तुला गुरुजींनी सांगितलं पण".....
"बाळा, तू काही तरी चूक केली आहेस ज्याच्या परिणाम तुला भोगावा लागणार आहे"..... हरीला गुरुजींनी म्हटलेलं आठवलं
"मला वाटलं की तू आता तरी माझ्याशी बोलशील पण नाही"..... संध्या
"संध्या मी खूप वेळा प्रयत्न केला तुला सांगण्याचा पण, मला स्वतःची खूप लाज वाटायला लागली, अस वाटत होतं की काय करू कुठे जाऊन जीव देऊ, काय करू"......
"हरी जाऊदे तसही आता मी जातेय, परत नाही येणार आता मी आणि हा आज थांबवू नकोस हरी मला बस शेवटची एक इच्छा पूर्ण करशील माझी"....
हरी ने काहीच उत्तर दिलं नाही बस तो संध्याला नजर भरून पाहत होता....
"डोळे बंद कर"..... संध्या हळूच बोलली
हरीने डोळे बंद केले आणि संध्याने जवळ जाऊन हरी ला होटांवर चुंबन दिलं आणि परत मागे सरकली"..... हाच तो एक क्षण होता, सांध्याच्या जाण्याच्या वेळ आला होता संध्याचं शरीर चमकत होता, जणू आकाशातले तारे स्वता तिला घायला आले आहेत....
संध्या जात होती तेव्हाच मागे वळून बोलली....
"हरी फक्त ब्रेक वर पाय ठेवायला विसरू नकोस".... संध्या असं बोलून अद्रीष्य झाली
हरीला आता खूप पसच्याताप होत होता, पण त्याच्या आता काहीच फायदा नव्हता संध्या निघून गेली आणि सगळं जसं होतं तसं आधी सारखं झालं.....
सकाळ झाली..... ईशा उठली, हाल मध्ये येऊन पाहिलं तर हरी सोफ्यावर झोपला होता....
"हरी चल उठ लवकर, हरी.... बाबा उठ चल उशीर होईल परत".... ईशा
"हरी उठला काय, कुठे उशीर होईल"..... हरी
"विसरलास तू, अरे आरतीच्या लग्नाला जायचं आहे ना"..... ईशा
"अरे हां"..... हरी
"मग जा पटापट अंघोळ करून घे, मला पण फ्रेश व्हायचं आहे".....
...................................................
दोघे ही लग्नाला जाण्यासाठी निघाले.....
ईशा ने कार मध्ये गाणे लावले, हरी पण शांत गाणे ऐकत ऐकत गाडी चालवत होतं, तेव्हाच अचानक रेडिओ वर हा गाणं आलं....
" पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले "
आणि हरी ला एकदमच संध्याची आठवण आली, हरी रात्री चे काय झालं त्या विचारात गुंतला पण तेव्हाच ईशाला पोटात दुखायला लागलं, ईशा हरी ला हाथ करत होती, सांगत होती पण हरीचं लक्ष नव्हतं, तो गाडीच्या दुसऱ्या बाजूच्या खिडकीतून बाहेर बघत होता....
पुढं highway होतं गाडी फिरवून सरळ highway च्या मार्गाने त्यांना जायचा होतं, पण हरीचं लक्ष नव्हतं, समोरून एक ट्रक जात होता.... ईशा जोरात ओरडली " हरी ".....
हरी ने एकदमच समोर पाहिलं आणि अचानक त्याला संध्याने सांगितलेलं आठवलं....
"हरी फक्त ब्रेक वर पाय ठेवायला विसरू नकोस".... आणि हरी ने पटकन ब्रेक मारला आणि गाडी थांबली, तो ट्रक समोरून निघून गेला.... नुसतंच सीट बेल्ट लावल्या मुळे कोणालाच काही झालं नाही.....
"ईशा तू ठीक आहेस ना".... हरी
"हरी मला खूप दुखतंय पोटात, लवकर दवाखान्यात घेऊन चल....आहहहह" ईशाला ते दुखणं सहन होतं नव्हतं, ती ओरडत होती....
हरी ने पटकन गाडी फिरवली आणि तिला दवाखान्यात घेऊन आला....
ईशाला पटकन operation theatre मध्ये घेऊन गेले....
थोड्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि हरीला म्हटले.... " बघा मी त्यांना बघितलं, तुमच्या बायकोची डिलिव्हरी ची तारिक अजून पुढे आहे, पण त्यांना वेळेच्या आधीच लेबर पैन होतंय, अश्या sitution मध्ये its difficult to say but बाळाला वाचवणं काठीन आहे".....
हे ऐकताच हरी चे हाथ पाय थंड पडले.... डॉक्टरांनी पटकन operation ची तयारी केली....
हरी शांतच बसून होता, त्याला काहीच सुचत नव्हतं, तो सारखा बस्स प्रार्थना करत होता देवाला, तेव्हाच त्याला संध्याचे ते शब्द आठवले.... "हरी बाळा ला मी काहीच होऊ देणार नाही".....
आणि डॉक्टर बाहेर आले..... "It was quite difficult but let me say, you're blessed with a baby girl.... आई आणि बाळ दोघे ही स्वस्त आहेत, थोड्या वेळ नंतर त्यांना आय सी यू मध्ये शिफ्ट करू तेव्हा तुम्ही त्यांना भेटू शकता, ते पर्यंत please coperate".... डॉक्टर
"Thank you so much डॉक्टर".... हरी आनंदाने भरला
ईशा ला शिफ्ट केल्यानंतर, हरी तिला भेटायला गेला....
ईशा बाळाला जवळ घेऊन झोपली होती, हरीने ईशाला जसच चेहऱ्यावर हाथ लावला ती उठली....
हरीने तिच्या मुलीला हातात घेतलं... "ओए बघ डोळे उघड, बघ बाबा आले".... हरी
" संध्या ".... ईशा च्या तोंडातून हे नाव ऐकताच हरी ईशा कडे आश्चर्याने पाहू लागला....
"आपल्या मुलीचं नाव..... संध्या, छान आहे ना हरी"....
हरीचे डोळे भरून आले हे ऐकताच, आणि मग हरीने ईशाला सांगायची सुरवात केली, कसं त्याला संध्या भेटली आणि कसं हे सगळं घडलं.....
ईशाला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं, हे सगळं ऐकून ईशाला मोठा धक्का बसला, पण तिने स्वतःला सांभाळलं....
"हरी रडू नकोस, जे होत असतं ते चांगल्या साठीच होतं असतं".….. ईशा
"हो ईशा पण संध्या"..... हरी
"काय हरी, तिने तुला सांगितलं होतं ना की ती नेहमी तुझ्यासोबत रहाणार मग तुझी इच्छा असेल की नसेल".... ईशा
"हो ईशा"... हरी
"मग हरी ती। अपल्यासोबतच आहे आणि आयुष्य भर रहाणार.... बघ हरी तुझी संध्या तुझ्या हातात आहे आपली लाडकी मुलगी"....
ईशाने तिच्या मुलीला हरी कडून घेतलं आणि प्रेमाने बोलली... संध्या माझी लाडकी"