काय ची मेहुणी..
काय ची मेहुणी..
"आम्ही शिकलो नाही तर नाही ,पण तुम्ही तरी शिका आपल्या सहीपूर्ती " असे सतत बालपणी प्रेरणा देणारे आई-वडील ....व मूर्तिकारासारखे ठोकात झोकात माणूस घडवणारे शिक्षक वर्ग आणि समाज ....म्हणून युक्ती शक्ती कळाले....
कदाचित मी नऊ दहा वर्षाच्या झालो होतो. तेव्हापासून मला हळू-हळू आपल्या गरिबी परिस्थितीचे जाणीव होऊ लागलं .संसार कसे चालत आहे, आपल्या घरी काय आहे मी काय नाही .
आमची आई ही ,बाबाची दुसरी लग्न केलेली बायको आहे .म्हणजे पहिली लग्नाची बायकोला काही वर्ष अगोदरच सोडून दिले होते .नेमका कारण काय असावा की पण कुणाचे बोलण्यावरून वाटते तिची विचार भावना फार वेगळीच असावी .काही गोष्टीमुळे वाद झाल्याने जिवंत बाबाचे नावाने ' 'कळसाड ' च्या गाणे गाऊ गाऊ नाचली होती .तसे बाबाही भांडणाच्या चंद जोपासणारा माणूस ,म्हणून तरी सोडले वाटते व काही दिवसानंतर गावाजवळच्या गावात जुडली तरी पण तिची स्वभाव सुधारली नाही असे गोष्ट कानी पडायचे. असेच होत असावं अनोळखी व्यक्तीशी जीवन जगताना जर दोघांचे विचार वेगवेगळ्या प्रकारचे असले की एक वाटेवर चालणे कठीणच ठरतो. त्रासदायक जीवन जगणं ठरू शकते म्हणून पूर्व विचार परीक्षण घेणे महत्त्वाचे असावे .
पण तो काळ वेगळा होता आणि आजही आहेच, आपण जर आपल्या मताने आवडी-निवडी करण्यात मागे सरकलो तर दुसरेच माणसासमोर होऊन निवड करून देतात. मग आपल्या लायकीची आहे की नाही हे त्यांच्या मताप्रमाणे आपल्या दृष्टिकोनाच्या चौकटीवर घट्ट बसून देतात .आणि आपण राजी झालो की ते पुढे होऊन नातं जोडतात . मग ते ज्यावेळी म्हटले ,त्यावेळी आपले दहा काम बाजूला सारून त्यांचे एक कामासाठी धावत जावा हे आहेच . तसे तर सर्वच नवीन असताना छानच असतात म्हणा ..नवीन माणसं आणि मेलेली माणसं कुणालाही आवडतात नाही का ..!!? आणि आपल्या विचारधाराप्रमाणे आपला लायकीची आवड निवड करण्याची लायसन्स मिळणे ही ,एक नशीबच आहे आपल्या घरातून......
अन् तिच्याकडं एक मुलगा होता ,पण त्याला बा नी आश्रम शाळांमध्ये भरत्या करून शिकवीत होते. व आम्ही पाच जणं मोठी ताई नंतर मी लहान भाऊ, पुन्हा दोन लहान बहिणी होतो .पण ताई मामाकडे दुसऱ्या टोला वर राहून शिकत होती. तसे मी पण पाच वर्षाच्या असताना तिकडेच राहायचं , आपल्या टोलीवर शाळा अंगणवाडी काहीच नव्हते म्हणून तिकडेच दोन-तीन वर्षे होतो . तिथूनच अंगणवाडीला जायच्या , ताई हात धरून न्यायची आणायची कधी कधी वाडी कडे खेळायचे तेव्हा टूब्बू टूब्बू चालायला शिकत असलेली ( सुमित्रा )नावाची मैत्रिणी मिळाली होती .नात्याने मेहुणीच लागायची , काही दिवसांनी तिला तिची आई दुसऱ्या गावी घेऊन गेली .अर्थात ; नवरा सोडून पळाली खूप वर्षे मनातून गेली नाही व ती बारा तेरा वर्षाची झाल्यावर गावात आणले तिला .तेव्हा पुन्हा भेट झाल्यावर पुन्हा मैत्रीण झाली . मी तिला बालपणाची किस्से सांगायच्या खेळण्याचे ठिकाण ,वाडीतले पपई खायचे ,तू त्या बोरीच्या झाडावरची सोनपाखरू साठी रडायची .मग आम्ही ताई सोबत काठीने पाडून द्यायचे वगैरे मग पुन्हा ती प्रतिसाद द्यायची ,पुन्हा आपल्यात घट्ट मैत्रीण जोडली खूप जीवळ्याची वाटायची .एकदा आमचे खास मामाच्या घरी देवकाम होता , तेव्हा रात झाल्यावर माझी काको बाई व तीची आजीबाईने मला म्हणाली. घरापर्यंत पोहोचवून दे...बे बाईला , झोपण्याची वेळ होत आहे .आठ वाजेच्या दरम्यान होत होता .तिच्या घर दूर होता म्हणून तसे मी तिला चल म्हणून गोष्ट सांगत घरापर्यंत पोहोचविला .तिच्या मोठा भाऊ अंगणात उभा होता , आम्ही दोघांनाही संकेत म्हणाला ' एवढा वेळ कुठे गेल्या होत्या ' आणि ती मुलगी काहीच न बोलता तुरुतुरु आत शिरली . मी म्हणालो काको बाई घरी सोडून ये म्हणाली , म्हणून आणून दिले आता माझ्याच गलती झाली ...व निघून आलो नंतर हळूहळू तिला प्रेमाने माझ्याशी मैत्री सोडायला भाग पाडला .

