ध्येय
ध्येय
माझ्या मते माणसाच्या आयुष्यात ध्येय असावं. जगणं ही सामान्य गोष्ट. सगळेच जगतात पण आपण कसं जगतो ह्याला फार महत्व आहे.
मोठ्या नावाजलेल्या लोकांसारखे किंवा त्यांच अनुकरण नसावं तर मी स्वतः कुणी तरी काही तरी चांगलंं कार्य करावं. ज्या कार्याने मला स्वतःला समाधान व ते दुसऱ्यास उपयुक्त असावं. उदा: समाज सेवा धरली तर ती निर्मळ सेवा असावी. त्यात स्वार्थ, प्रसंशा, स्तुती,कौतुक लोकांनी करावी अशी अभिलाषा मुळीच नसावी. वेळ प्रसंगी पदरचे खर्च करावे लागले तरी स्वतःला जमेल तसे करावे.
दुसरं उदाहरण घेऊ : आईवडिल स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी मुलांना वेगवेगळ्या शाखेत घालतात. मुलांच्या मनाचा कुवतीचा विचार करत नाहीत. हे बरोबर नाही. मला नाही जमले ते तू करावे. अशी शक्ती बरोबर नव्हे तर त्यांना आपण फक्त मार्गदर्शन करावे. आपली ध्येयंसुद्धा साधीसुधी असावी. आपण ती पूरी करत असता आपल्या बरोबर असलेल्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. शेवटी ध्येय पुर्तिसाठी जिवाची पराकाष्टा करावी आणि ते साध्य करावे. समाजात एक चांगला माणूसकी असलेला माणूस म्हणून आपल्याला ओळखावं हेच ध्यानी ठेवावे.