STORYMIRROR

Kiran Tarlekar

Tragedy

4  

Kiran Tarlekar

Tragedy

*"जग एवढं का बदललंय... !!"*

*"जग एवढं का बदललंय... !!"*

1 min
403

भुक आता भाकरीची

लागतेय कुठे माणसाला..

बदललेल्या त्या नजरेची

हाव शोधतेय पैशाला...


कोठे जवळीक अन् आपलेपण

आता तुटलेय ते कधीच येथे

मतलबी स्वार्थीपणाचे नाते

मनामनात दडले जेथेतेथे


आता ती पैशाची भींत कशी

नात्यात फुट पाडुन राहीली..

तेच ते रेशीमबंध आजकाल

गळ्याचा फास बनायला लागली...


काल येथे जागे जागेवर

ते अंगण आप्तेष्टांनी भरलेले असायचे..

आज तेथेच त्या सर्व जागांवर

एक औदासीन्य दाटलेले राहते...


ही कसली भुक म्हणायची

लत लागलीय माणसांना या..

माया अन् स्नेहार्द नजरा

आज का बदलल्या इतक्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy