अंत कलियुगाचा
अंत कलियुगाचा
घोर कलियुग
कोपला निसर्ग
अतिवृष्टीमुळे
पाण्याचा विसर्ग ||१||
वादळ पाऊस
नाही भरवसा
पिकांची दुर्दशा
करतो तो असा ||२ ||
गोरगरिबांचा
वाली नाही कुणी
पारध्याच्या हाती
सुत्रे दिली कुणी ||३||
राक्षस जन्मले
या भुतलावरी
पोरीबाळींचे ते
शील भंग करी ||४||
महागाई तर
गगनाला भिडे
सर्वसामान्यांच्या
संसाराला तडे ||५||
घोर कलियुग
संपताचा काळ
भरले ते घडे
पातकी सुकाळ ||६||
देवा कृपा दृष्टी
व्हावी या संसारी
येता सतयुग
संकट निवारी ||७||
