*विषय:- समृद्ध भारत*
*विषय:- समृद्ध भारत*
ती टरबूज,खरबूज खाल्ले की त्यातल्या घरभर सांडलेल्या बिया गोळा करी! आंब्याच्या कोयी व चिंचोके मोकळ्या माळरानावर मुद्दाम भिरकावून देई! तिला घरात सारी नावे ठेवत. कधी चुकून कुणी बीज कच-यात टाकले कि तिला फार वाईट वाटे. कारण तिच्या मनी ध्यास असे ते बीज स्वरूपात भूमीत गेलं की पुन्हा नवीन अंकुर फुटून पुन्हा भरभरून इतरांना मिळत रहावे याचे! तिच्या डोळ्यांत समृद्ध अन् हिरव्यागार भारताचे स्वप्न तरळत राही.