उर्मिला
उर्मिला
भाग - २
उर्मिला आणि मांडवी त्या पवित्र निर्बंधीत कक्षाजवळ पोहचून मोठ्या प्रयासाने दारं उघडली.संपूर्ण कक्षात सीता दिसली नाही.मांडवी म्हणाली,जीथे आपल्या दोघींना दार उघडण्यास प्रयास पडले,तिथे एकटी सीता दार कसं उघडू शकेल?चल!आपल्याला इथे कुणी बघण्याआधी निघून जाऊ या..नाही ती इथेच असायला हवी!उर्मिला आर्त स्वरात सीतेऽऽ हाक मारत म्हणाली,कुठे आहेस?समोर येना.. नको ना अंत पाहूस
कक्षाच्या टोकाला एका उंचवट्याव सिंहासन होते.आणि त्याच्या बाजूने एका ठेंगण्या चौरंगावर असलेल्या एका भव्य लोह संदुकीत डोकावणारी सीता दिसली. सीताऽऽ उर्मिला आनंदोशयाने तिला मिठी मारायला सरसावली,पण समोरचं दृष्य बघताच आवाक् होऊन जागीच थबकली.सीतेच्या नाजूक हातात मोठं शिवधनुष्य लिलया पकडून त्या संदुकीत कांहीतरी शोधत असतांना दिसली.
मी या पेटीत लपण्यासाठी उतरली असतां माझा चेंडु निसटून यांत पडला. त्या भव्य पेटीत एका कोपर्यात असले ला चेंडू दिसल्यावर चेंडु उचलून ते अवाढव्य धनुष्य तिने सहजतेने पेटीत ठेवलेले बघून दोघीही अतिशय आश्चर्य चकीत झाल्या.त्या बाहेर जाण्यासाठी वळल्यावर त्यांना तात,माता व काकाश्रीं ना बघीतल्यावर आतां आपली खैर नाही या भितीने त्या गर्भगळीत झाल्या.पण कांही क्षणापूर्वी जो आदर मांडवीच्या चेहर्यावर दिसला तोच त्या तिघांच्याही चेहर्यावर दिसला.तातांनी सीतेसमोर येऊन अत्यंत नम्रपणे मान झुकवली. त्यांचच अनुकरण माता व काकाश्रींनी केले.
सकाळचे आन्हिकं उरकवून उर्मिला चित्र काढण्यांत मग्न असतांनाच अति उत्साहाने मांडवीने येऊन सांगीतले विश्वामित्र ऋषींसह अयोध्येचे दोन युवक आलेले असून काकाश्रींनी त्यांची राहण्या ची व्यवस्था विशेष अतिथीगृहात केली आहे.चौघी बहिणींमधे कुठेही द्वेष, आकस नसे.मनातील सारे स्पष्टपणे ऐकमेकींशी बोलत असत.उर्मिला म्हणाली,त्यात काय विशेष?दरवर्षीच तातश्री मिथिलेत तत्वज्ञानाच्या चर्चा घडवून आणतात,आणि आतां तर सीतेचे स्वयंवर सप्ताहावर आले.सीतेचा विवाह समय जवळ आला होता.कोणतीही वधू उत्तेजीत होते पण सीता मात्र अपवाद होती.त्या चौघीही वेद,उपनिषद,संगीत, कला साहित्य,राजकारण यात पारंगत असल्या तरी राजप्रसादाबाहेर जात नव्हत्या.बंदिस्त राजकन्या!तातांसमवेत देशभरातील विविध चर्चासत्र आणि धार्मिक सत्रांना उपस्थित असत,पण तेवढ्याने उर्मिलेचे समाधान होत नसे. आजवर कानावर पडलेल्या विविध स्थळांना भेट देण्याची तिला तीव्र लालसा होती.सीतेनंंतर आपल्याही विवाहाचा विचार होईल.पण जीवनाचा सहचर शोधण्यापेक्षा अधिक ज्ञानप्राप्तीकडे तिचा कल होता.पण सामाजिक रीती नुसार तिला विवाह करावाच लागणार होता.
सीते तुला तुझ्या विवाहाचा आनंद नाही वाटत?नक्कीच आहे.पुढे काय आणि कसे घडणार हे माहित असल्यावर उत्तेजित कां व्हाव?जो व्यक्ती शिवधनुष्य भंग करेल त्याच्या गळ्यात माळ घालाय ची हे ठरलेल आहे ना?शिवधनुष्य भंग? वीस हात(साडे आठ फुट) लांबीचं ते धनुष्य उचलायला ३०० लोक व ज्या हातगाडीवर ठेवले ते ढकलायला तेवढेच लागतात.ते अवजड धनुष्य तूं लहानपणी सहजतया उचलस म्हणूनच एखादा अलौकिक पुरुषानेच ज्याला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे त्याला त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवावी लागेल.जे धनुष्य साधं सरकवलं जाईल की नाही ही शंका!म्हणजे सीतेशी विवाहबध्द होणारी व्यक्ती अलौकिकच असेल.सीता म्हणाली, उर्मिला तुझ्या प्रश्नाचे उत्तर तूंच दिलेस,म्हणूनच मी शांत आहे,शिवाय तातांश्रीवर माझा पूर्ण विश्वास आहे.
कोणतीही गोष्ट पटकन स्विकार करणे हा सीतेचा स्वभाव !उलट उर्मिला प्रत्येक गोष्ट चिकित्सेने बघत असे. तातश्री नेहमी म्हणत,सीता देवदूत आहे.
विदेही नगरीचा राजा शीरध्वज जनक आणि पत्नी सुनयना या निपुत्रीकांना यज्ञ विधी करण्यासाठी जमीन नांगरतांना सीता सांपडली होती.त्या दोघांनी तिचा प्रथम कन्या म्हणून स्विकार केला होता. तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक जनकाने तिचे नांव सीता ठेवले.धरणीमातेने दिलेला तो आशिर्वाद होता.सीता भूमी प्रमाणेच उमदी,खोलवर पाळंमुळं रुजले ली आणि जिवनदायिनी होती.त्यानंतर वर्षभराने उर्मिलेचा जन्म झाला.ती सीते पेक्षा पूर्णतः वेगळी होती तरी त्यांच्यात दृढ नातेसंबंध निर्माण झाले होते.त्यामुळे त्यांचे प्रेम टिकून होते.
क्रमशः
