Vrushali Thakur

Horror Thriller

3.6  

Vrushali Thakur

Horror Thriller

तृष्णा - अजूनही अतृप्त भाग १

तृष्णा - अजूनही अतृप्त भाग १

12 mins
1.3K


सकाळच्या कोवळ्या किरणाने तिची खोली उजळून गेली होती. रोज ह्या कोवळ्या किरणांचा आस्वाद घेणारी ती मात्र आज गायब होती. तिला शोधण्याच्या नादात उन्हाचा एक कोवळा चुकार कवडसा उगाचच तिच्या मॉडर्न बाथरूमच्या नाजूक काचेतून डोकावला आणि क्षणभर तिथेच स्तब्ध झाला. अस बावनकशी भिजलेलं सौंदर्य जणू तो प्रथमच पाहत होता. पाण्याचे थंडगार ओघळ तिच्या मऊशार नितळ गोऱ्या कायेवरून व घाटदार वळणावरून तिच्या सर्वांगाचा वेध घेण्यासाठी घाईने धावत होते. सर्वच लहान मोठ्या थेंबांची तिच्या सर्वांगाला स्पर्श करण्याची चढाओढ चालू होती. पाण्याच्या थंडगार स्पर्शाने तीच अंग अंग रोमांचित होत होत. ती शीतलता सहन न होऊन घटकेला तीच अंग शहारत होत. तिच्या ओलसर फेसाळल्या केसातून फिरणारी तिची लांबसडक बोट अचानक तिच्या निमुळत्या मानेपाशी थबकली. तिने बोटानेच मानेचा भाग चाचपडला. मानेतून एक सौम्यशी कळ उठली... त्यानेही तिच्या डोळ्यात पाणी आल आणि काल रात्रीचा तिच्या नवऱ्याचा प्रताप तिला आठवला. 


हे काल रात्रीपुरतच मर्यादित नव्हतं. सहा महिन्यापूर्वी तीच लग्न झालं तेव्हापासून तिच्या रात्री ह्या अशाच होत्या. आई वडिलांनी अगदी खूप श्रीमंत आणि चांगल्या घरातील मुलाशी तिचा विवाह करून दिला होता. तिच्या नवऱ्याची स्वतःची कंपनी होती. खूप मोठा बंगला, दिमतीला नोकर चाकर, दाराशी उंची गाड्या सर्वांच्या दृष्टीने सर्व सुख तिच्या पायाशी लोळण घेत होती. परंतु.... ती श्रीमंत नवऱ्याच्या शोकेस मधली बाहुली होती हे कोणाच्या लक्षातच नाही आल कधी. त्याच्या व्यस्त जीवनातील जे काही दोन तास हिच्या वाट्याला येत ते ही त्याला तिच्यासोबत घालवावेसे वाटत नसत. कधी पहावं तेव्हा तो तिच्यापासून अंतर ठेवूनच राहत असे. ती किती आशाभरल्या डोळ्यांनी त्याची प्रतीक्षा करत असे.... तो कधीतरी येऊन जवळ घेईल.. आपल्यावर प्रेम करेल.. पण कसच काय... सगळ स्वप्नच बनून राहील. त्याला वाटेल तेव्हा त्याच्या कामापुरता तो जवळ घेई. त्यानंतर काय घडायचं ते कधीच तिला आठवायच नाही आणि तिला आठवण्याचा प्रयत्नही करायचा नसे. कालही असच काहीस घडल होत. त्याच्याच खुणा आता जखम बनून ठसठसत होत्या. नुसत्या आठवणीनेच तिच्या तोंडून हलका उसासा निघाला. 


आपल्या ओलेत्या अंगाभोवती मऊ टॉवेल लपेटत ती आरशासमोर उभी राहिली. बऱ्याच दिवसांनी आज ती स्वतःला अस न्याहाळत होती. तिची गोरीपान सोनेरी चमक असणारी कांती मागच्या काही महिन्यांत बऱ्यापैकी निस्तेज पडली होती. तिच्या चेहऱ्यावर सदैव विलासणार टवटवीत हास्य कुठल्या कुठे गायब झालय. तिच्या टपोऱ्या तांबूस झक असणाऱ्या डोळ्यातील स्वप्न चक्काचूर झाली होती. तिचे मऊ गुलाबी ओठ सततच्या चाव्याने काळपट पडलेत.... शी.... तिने आपला चेहरा तळव्यांमध्ये झाकला. तिला कधीच स्वतःला अस बघायची इच्छा नव्हती. निदान नव्या नवरीचे नवलाईचे दिवस असताना दिवसेंदिवस उमलायच सोडून तिच्या तारुण्याची पानगळ चालू होती... आरश्याकडे पाठ फिरवत तिने तसच स्वतःला कालच्याच चोळामोळा झालेल्या बेडवर झोकून दिलं... हेच आयुष्य पाहिजे होत का..?.. लग्नानंतर केवळ वासनापूर्तीच साधन तेवढीच एका बाईची ओळख उरते का..?.. आणि भले तेवढीच ओळख असुदे पण निदान माणुसकी तरी अपेक्षित असतेच ना... बऱ्याच उलटसुलट विचारांत ती गुरफटून गेली... अचानक तिला आठवण झाली त्याची.... तिच्या नजरेसमोर तीच पूर्वायुष्य येताच ती थबकली... तिच्या आठवणीच्या ठेवीतल्या सर्वात मधुर आठवणी होत्या त्या... एखाद्या तरुणीने तारुण्यात प्रवेशताच ज्या गोष्टी केवळ स्वप्नात पाहत समाधान मानावे ते अविट गोडीचे सुख तर तिने आधीच चाखले होते.. तो हलकासा शहारे आणणारा स्पर्श.. ते श्वासात गुंफत जाणारे श्वास.. ती अंगातून लहरणारी बिजली... डोळ्यांना न दिसणाऱ्या त्या शक्तीने तिला सर्व काही दिलं होत... तिच्या तारुण्याचे क्षण न क्षण फुलवले होते. तिच्या शरीराच्या गंधातून ते क्षण दरवळले होते.परंतु तिला सुखावणारी ती शक्ती अमानवी होती म्हणून गुरुजींच्या तंत्रमंत्रच्या शक्तीने तिच्यावर विजय मिळवला होता... तिने ओठ कोपऱ्यात वाकडे केले... म्हणे अमानवी शक्ती वाईट असतात... तिला गुरुजींचा रागच आला होता. हा माणूस येऊन बघा जरा ज्याच्यासोबत लग्नाच्या दावणीला बांधलंय... अस पशूसारखं वागवतो.. त्यापेक्षा ती अदृश्य शक्तीच चांगली होती...


आज ती खूपच रागात होती. तिला स्वतःच्या अश्या आयुष्याचा राग येत होता. अस तीळ तीळ तुटत जाण्यापेक्षा मरून गेलेल्या चांगलं. तिने आपला डावा हात चाचपडला. मनगटावर तीन वेढ्याचा लाल रंगाचा दोरा होता. त्या पूजेनंतर काही काळासाठी संरक्षण म्हणून गुरुजींनी मंतरलेला धागा तिच्या हातात बांधला होता. परंतु त्या धाग्याकडे पाहून तिच्या जुन्या आठवणी रोजच ताज्या होत.. त्या शक्तीला विसरण्याऐवजी तिच्या आठवणीत ती बऱ्याचदा स्वतःलाच विसरून जाई.. आता अजुन नाही... स्वतःच्या शरीराचा असा छळ तिला अमान्य होता.. तीच घाटदार, सोनेरी झळाळी असलेलं शरीर, ज्याची कोणालाही भुरळ पडावी.... परंतु ते ज्याला लाभलं त्याने धसमुसळेपणाने केवळ वापरावं.. त्या शरीराच्या काही इच्छा असतीलच ना.. त्या तर कित्येक महिने अपूर्णच आहेत... हव्याहव्याशा स्पर्शासाठी ते कधीपासून तडफडतय... तिने पुन्हा उसासा सोडला. तिच्या गरम श्वासाला जोर चढला. काहीतरी ठरवून तिने हातातील दोऱ्याची गाठ खेचली.. अचानक खिडकीची काच वाजल्यासारखी वाटली... तिची खोली थोडीशी अंधारली गेली... एक थंडगार वाऱ्याची झुळूक हळूच तिच्या गालाला स्पर्शून गेली... हे बदल तिच्या ओळखीचे होते.. मिटलेल्या तिच्या ओठांवर किंचित हास्य पसरल.. ती एकेक वेढा सोडवत होती.. आणि तिच्याभोवती थंडगार धुक जमत होत.... तेवढ्याशा थंडीने छोट्याश्या टॉवेलमध्ये कसबस गुंडाळलेला तिचा देह थरथरला... सुटलेला धागा एव्हाना काळा पडला होता... जळल्यासारखा.... तिने तसाच त्याला कोपऱ्यात फेकून दिला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू अजुनच रुंदावल.. एक जुना परिचित गंध पुन्हा दरवळला... ती सुखावली. तिच्या आतील जाणीवा पुन्हा एकदा बधीर झाल्या. थंडीने गारठून थरथरणाऱ्या तिच्या शरीराला प्रेमाची ऊब हवी होती. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले... तिला ते सगळे क्षण पुन्हा अनुभवायचे होते... त्याच्या स्पर्शाला तिच्या तहानलेल्या शरीराने साद दिली.... त्यांच्यातील टॉवेलचा अडसर कधीच गळून पडला होता. हलक्या मोरपिसासारखा एक स्पर्श तिला अंगभर जाणवत होता. त्याच्या स्पर्शाने तीच यौवन सुखावत होत. अंगभर सुखाचे झरे पाझरू लागले होते. आपल्या अनावृत्त देहाला गोंजारत ती पुन्हा पुन्हा तीच धुंदी अनुभवू लागली.


------------------------------------------------------------------------


" हे भगवन..." त्याने खाडकन डोळे उघडले. पद्मासनात असलेलं त्याच बळकट शरीर थरथरू लागल. अचानक समाधी भंग झाल्याने त्याला किंचितशी भोवळ आली. एका हाताने आधार घेत तो मृगजिनावर लवंडला. आता त्याने जे पाहिले होते ते त्याच्या कल्पनेपलीकडे होते. आताच्या काळात अस काही घडेल ह्याची त्याला अपेक्षाच नव्हती... आजकाल माणसचं जास्त भयानक असतात ना.. 


ओम त्याच नाव.. कला शाखेचा विद्यार्थी आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक चित्रे रेखाटण्याचा असलेला छंद म्हणून बराच भारत त्याने पिंजून काढला होता.... मागे अशाच कोणत्यातरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एखाद्या नवीन विषयाच्या शोधात त्याने कोण्या नव्या गावाची वाट पकडली होती. सोसायटीतील एका आजोबांनी आपल्या बालपणीच्या आजोळच्या गप्पा सांगताना एका गावाच्या संस्कृतीचा उल्लेख केला आणि बाजूनेच घरी जायच्या धांदलीत धावणाऱ्या ओमचे कान टवकारले गेले. गावाचं नाव समजायचा अवकाश... ओमच तर जायचं प्लॅनिंग तयार असत. आई वडिलांच्या हो-नाचा प्रश्नच नव्हता. त्यांना तो प्रश्न विचारण्याएवढा वेळही कधी दिला नाही त्याने. प्रवास चालू झाल्यावर अमुक ठिकाणी जातोय एवढीच सांगायची काय ती तसदी घ्यायचा.. बास्स... तेव्हाही तेच केलं होत त्याने. फरक इतकाच होता की तो अशा एका गावात येऊन पोचला होता की ज्याचं नावसुद्धा गुगल मॅप वर नव्हत. खूप धाडसाने केलेल्या ह्या प्रवासात त्याला नुसती त्या गावाची संस्कृतीच नाही समजली तर त्यावर आधारित चित्राने त्याला कलेच्या दुनियेत वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्या प्रवासादरम्यान एक अशी चमत्कारिक गोष्ट घडली की कोणा भल्या पुरुषाच्या हातून दैवी उपासनेची दीक्षाही मिळाली. हे सगळं इतकं वेगात घडल की त्याला त्यावर विचार करायची साधी उसंतही मिळाली नव्हती. दीक्षादानाच्या नियमाप्रमाणे त्याला रोज काही वेळ ध्यान करणं आवश्यक होत. दैवी शक्ती बाळगण्यासाठी शरीरासोबत मनही मजबूत लागत. मोह, माया आणि सगळ्या विकारांपासून दूर राहण्यासाठी मनावर संतुलन ठेवण तर अत्यावश्यक असत. आणि मनाची चंचलता केवळ एकाग्र ध्यान दूर करू शकत. त्याच्या साधनेला पूरक ह्या उद्देशाने त्याला हे खास मृगजिन आशीर्वाद म्हणून देण्यात आल होत. काहीतरी वेगळं करून बघुया म्हणून त्यानेही मजेतच दीक्षा घेतली होती. हे ध्यान साधना केवळ मनशांती पलीकडे अजुन काही उपयोगाची नाही अस त्याच ठाम मत होत. पण तरीही योगा म्हणून आपल्या दिवसातील एक तास तो ह्या साधनेला देई. 


परंतु आज त्याला काहीतरी जाणवलं. नजरेआड काहीतरी भयानक घडतंय व ते सत्य असू शकत ह्या विचारानेच त्याचा थरकाप उडाला. दीक्षा देतेवेळी गुरुजींचे शब्द त्यावेळी नीटसे लक्षात आले नव्हते. पण त्याचे मनपटलावर उमटलेले ठसे त्याला आठवण करू द्यायला पुरेसे होते. काहीतरी विचित्र शब्दांची गुंफण करून एक बिजमंत्र उच्चारला होता जे शब्द त्याने कदाचित कधीच ऐकले नव्हते. दीक्षादानानंतर त्याच्या मनात बऱ्याच प्रश्नांनी गोंधळ माजवला होता. त्याला सगळ्याची उत्तरं हवी होती परंतु ' योग्य वेळी सगळ ज्ञात होईल ' बोलून गुरुजी कुठे गायब झाले त्याला समजलच नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो नित्यनियमाने साधना करत होता. दर दिवशी साधनेनंतर त्याला काही ना काही आवर्तने जाणवत. कसल्याशा अलौकिक शक्तीची अनुभूती होई आणि त्याच मन प्रसन्नतेने भरून जाई. 


आजच्या साधनेनंतर झालेल्या जाणीवा मात्र अशुभाची चाहूल देत होत्या. त्याला कोणाचीतरी चाहूल लागली होती. धुक्यामध्ये अस्पष्ट वेडावाकडा दिसणारा आकार... जो पसरत पसरत सगळीकडे कब्जा करू पाहत होता... त्याच्या छायेखाली आलेलं सगळच क्षणार्धात उद्ध्वस्त होऊन जात होत... त्या आकाराला ना चेहरा होता ना शरीर... होता तो केवळ धुक्याचा आभास... 


---------------------------------------------------------------------

" अरे जावईबापू कसं काय येणं केलत... ते ही सकाळी.." घाईने सोफ्यावरील पसारा आवरत तिच्या बाबांनी त्यांच्या जावयासाठी बसायला जागा केली. तो... तिचा नवरा... अनय... सहा महिन्यांआधी तीच आणि अनयच लग्न झालं होत. नेहमी येताना अनय आणि ती एकत्रच यायचे. आज मात्र इतक्या सकाळी आणि घाईने आपल्या जावयाचं एकटच येणं त्यांना अपेक्षित नव्हतं. 


" बाबा.. बसा जरा बोलायचं होत.." त्याने बाबांचा हात पकडत त्यांना बळजबरी खाली बसवलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहून बाबाही काळजीत पडले. 


" काय झालं.. सगळ ठीक तर आहे ना.." बाबांनी काळजीने विचारलं. मात्र त्यातही त्यांना आपल्या स्वरातील व्याकुळता लपवता आली नाही. 


" नाही... " अनय थोड्या शांतपणे उद्गारला.


" काय झालंय.. ती काही चुकीचं वागतेय का...?" बाबा एव्हाना घाबरून गेले होते. आधीच ते जरा घाबरट त्यात नेमकी आई कालच बाहेर गेली होती त्यामुळे बाबांना आधार म्हणून कोणीच नव्हतं आता घरात.


" चुकीचं नाही विचित्र..." अनयलाही कोणत्या शब्दात बोलावं ते कळेना. 


" म्हणजे.." बाबांच्या मनात भूतकाळाने मान वर काढायला सुरुवात केली. मनोमन ते तस काही नसू दे म्हणून देवाला विनवणी करत होते.


" माहित नाही मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं योग्य आहे की नाही...आमच्या पर्सनल गोष्टी... म्हणजे.." तो अडखळला.


" जे काही असेल ते तुम्ही सगळ नीट सांगा..." बाबांनी एव्हाना स्वतःच्या मनाची ऐकायची तयारी केली. अनयची अवस्था बघता त्यालाच धीराची जास्त गरज होती.


" बाबा माफ करा.. हे सगळं सांगतोय पण नाईलाज आहे माझा.." त्याचा स्वर हळवा झाला होता. नकळत त्याच्या डोळ्यात आसू दाटले.


" तू बोल.." बाबांनी खांद्यावर थोपटत त्याला आश्र्वस्त केलं.


" लग्न झाल्या दिवसापासून बघतोय.. म्हणजे.. आमच्यात तसे नवरा बायकोसारखे संबंध बनतच नाहीत.. ती खूप चांगली आहे.. एक पत्नी म्हणून सगळी कर्तव्य अचूक बजावते मात्र...." आपण कोणासमोर बोलतोय हे उमजून शरमेने त्याने मान खाली घातली.


" मात्र काय..? " बाबांनीही त्याच्या बोलण्याचा उद्देश समजून दुसरीकडे मान फिरवत प्रश्न विचारला.


" मात्र जेव्हाही मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होतो तेव्हा तीच वागणच बदलून जात होत. अरेंज मॅरेज आहे आणि ती लाजत असेल म्हणून मी ही मनावर घेतल नव्हतं. परंतु नंतर नंतर ती खूपच आक्रमक बनत गेली. कधी वाटायचं ती मला प्रेमाने जवळ बोलावतेय परंतु जवळ गेल्यावर कित्येक वेळा तिने माझ्यावर जबरदस्ती केलीय. आमच्या प्रणयात केवळ प्रचंड शारीरिक सुखाची भूक असते. अगदी आपल्या मानवी शरीराला सोसणार नाही इतकी. त्यात तिच्या अपेक्षाच अश्या काही असतात की... म्हणजे कालचाच प्रसंग आहे तिने इतक्या जोराने चावा घ्यायला लावला... तिच्या अश्या विचित्र वागण्यावरून अस वाटायचं की तिच्या शरीरात कोणी अमानवी शक्ती घुसून हे सगळं करवून घेतेय. खर सांगतोय... दोन तीन वेळेस प्रणयाच्या मधात मी बेशुद्ध पडलोय इतका आवेग असायचा. आजकाल तर घाबरून मी तिला रिस्पॉन्स देणं बंद केलय. पण काल... " भयाने त्याचे डोळे विस्फारले. त्या रात्री जे काही घडल असेल त्याची झलक त्याच्या डोळ्यात दिसून येत होती. 


" असं काय घडलं काय...?" बाबांनी घाबरून गळ्यातील रुद्राक्षांची माळ घट्ट पकडली. त्याचे श्वास क्षणासाठी थांबून गेले. कपाळावर आठ्यांची गर्दी झाली.


" काल रात्री तिला पाहिल्यावर माझी खात्री पटली... तिचे ते लालभडक डोळे, चेहऱ्यावरचं विचकटलेल हास्य, निर्वस्त्र चमकणार अंग आणि तिच्या नजरेतील माझ्यासाठीचे अनोळखी भाव. " त्याच्या डोळ्यांसमोर कालच्या रात्रीच तीच रूप उभ राहील. भीतीने त्याच्या माथ्यावर घामाचे थेंब जमले. " आणि इतक्या दिवसात जे समाधान मी तिला देऊ शकलो नव्हतो ते समाधान तिच्या अंगभर पसरलं होत.. अगदी तृप्त होऊन तिच्याच विश्वात मग्न होती. आणि आजकाल माझ्यावर झडप घालणारी ती चक्क माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हती.."


" म्हणजे...?" बाबांनी किंचित जोराने विचारलं.


" नेहमीपेक्षा वेगळी होती ती... तीच बोलणं वागणं सगळच बदललं होत... तीच्यालेखी मी तिथे नव्हतोच... कसल्याशा आठवणीत हरवून ती हसत होती, गिरक्या घेत होती, कित्येकदा आरशात न्याहाळत होती... जणू नुकतीच प्रेमात पडली होती..." बोलता बोलता तो थरथरत होता. 


" तिच्या हातात दोरा होता का...?" बाबांनी साशंकतेने विचारलं.


" दोरा.." प्रश्नाचा रोख त्याच्या लक्षात आला नव्हता. 


" तिच्या डाव्या मनगटात लाल दोरा आहे.." बाबांनी खूण सांगितली.


" डाव्या मनगटात..." आपल्या मेंदूवर जोर देत, काहीतरी विचार करत त्याने स्वतःचे दोन्ही हात न्याहाळले आणि तो जोराने ओरडला.. " नाही... दोरा नव्हता..." 


" घात झाला... परमेश्वरा..." बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. " आम्ही तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती आणि नेमकी...... वाटलं होत संकट टळलय पण..." पश्चात्तापाने त्यांनी आपला चेहरा तळव्यांमध्ये लपवला.


" बाबा.... तिने सांगितले सर्व मला.. म्हणूनच तर तिच्या काळजीपोटी इथे आलोय मी. मला तिच्या प्रेमावर संशय नाहीये.. परंतु जे तिच्यावर गारूड घालून आहे त्याच्यापासून मला तिचा वाचवायचय. मला नाही माहित त्या शक्तीशी कसं लढायच... मागच्या वेळेस ज्यांनी ह्या सगळ्यातून वाचवलेल त्या गुरुजींना भेटूया आपण. ते वाचवतील आपल्याला.. " अनयच्या डोळ्यात तिच्याबद्दलच प्रेम स्पष्ट दिसून येत होत. तिला वाचवण्याची कळकळ त्याच्या चेहऱ्यावर वाचता येत होती. 


" हे काय वाढून ठेवलंय समोर...." बाबांनी गडबडीने कोणाला तरी फोन केला. पलीकडून ' डायल केलेला क्रमांक अस्तित्वात नाही ' ची टोन वाजत होती. हताश होऊन त्यांनी फोन सोफ्यावर फेकला. 


" काय झालं बाबा... कोणाला कॉल करताय...?" अनयने उत्सुकतेने विचारलं. 


" गुरुजींना.... पण काही उपयोग नाही त्याचा.." बाबांच्या थकल्या स्वरांवरून अनय समजून गेला.


" का..." त्याच्या मनात अजूनही आशा होती.


" त्या शक्तीसोबतच्या लढ्यात बाबांनी आपली इतक्या वर्षांची तपश्चर्या पणाला लावली होती. सर्वांचा जीव वाचवण्याच्या धडपडीत त्यांनी आपली सारी शक्ती खर्च केली. शेवटचे काही बीज मंत्र उच्चारून त्यांनी आपले शक्तिकवच तिच्याभोवती बांधून ते पुन्हा साधनेसाठी कायमचे निघून गेले. पण...." बाबांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जसा च्या तसा उभा राहिला. 


" पण...." अनयच्या मनातील आशा मावळत चालली होती.


" जाताना ते मला एकट्यात बोलावून बोलले होते की माझं शक्तीकवच त्या शक्तीपुढे किती काळ तग धरून राहू शकेल माहित नाही. तिने स्वतःहून आवाहन करून आपल्या सर्वस्वाला त्याच्यापुढे वाहून घेतलं होत. त्यामुळे ती शक्ती आणि तिच्यामध्ये एक प्रकारचे न तुटणारे बंध तयार झाले आहेत. ज्याला कोणीच नष्ट नाही करू शकत. माझ्या बीजमंत्राची शक्ती तिला शारीरिक हानी होण्यापासून वाचवेल. परंतु त्या जर तिच्या मनात अजूनही त्या शक्तिविषयी काही सकारात्मक भावना निर्माण झाल्या तर ती शक्ती पुन्हा कार्यान्वित होऊ शकते. अशा वेळी माझे मंत्र काहीच करू नाही शकत. ती पुन्हा त्या आठवणींत जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला सांगितलं. चुकूनही त्या आठवणी उगाळू नये म्हणून त्या आठवणींना मनाच्या तळाशी गाडून टाकल. "


" .... आणि नेमक मला सत्य सांगण्याच्या नादात ती पुन्हा त्याच आठवणींच्या गर्तेत गेली.... शिट..." अचानक झालेल्या खुलाश्याने अनयने कपाळावर हात मारून घेतला. " अप्रत्यक्षपणे का होईना मीच कारणीभूत आहे तिला पुन्हा त्याच आठवणीत न्यायला.... आपण गुरुजींना भेटूया ना...प्लीज.. ते वाचावतील ना तिला.." त्याला रडू कोसळलं. त्याच्या डोळ्यात हजारो सश्यांची व्याकुळता भरून आली होती. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्या त्रासाला आपणच कारणीभूत आहोत हा गिल्ट त्याच्या मनाला टोचत होता.


" जावईबापू... पण आता तिला वाचवायला गुरुजी नाहीत.." बाबांनी त्याला सत्याची जाणीव करून दिली.


" आता काय करायचं.. ?" अनयने आशेने बाबांकडे पाहिलं.


" मी तरी काय करू पोरा.... हताश बाप आहे मी... आपल्या पोटच्या गोळ्यावरच संकट जाणवूनही त्याच निवारण नाही करू शकत... माझ्यापेक्षा दुर्दैवी दुसरा कोणी बाप नसावा...." इतका वेळ कणखर असल्याचा मुखवटा बाबांनी आपल्या चेहऱ्यावर चढवला होता तो गळून पडला. दोन्ही दुर्दैवी जीव आपल्या हताशपणावर आसू ढाळण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते. 


------------------------------------------------------------------------


आताही नेहमीप्रमाणे कोणाला काही न सांगता आपली प्रवासी बॅग पाठीवर मारून रात्रीच्या अंधारात ओम बाहेर पडला. अंगात नेहमीची त्याच्या आवडीची ब्लॅक हुडी, ब्लॅक जीन्स आणि त्याने खूप जपलेली ट्रावेलींग ब्लॅक बॅग अशा अवतारात त्याच्या गळ्यातील लॉकेट तेवढं प्रकाशमान होऊन चमकत होत. त्याच्या चालण्याचा वेग इतका होता की बरच अंतर त्याने बघता बघता पार केलं. आतापासून प्रवास चालू केला तर साधारण दोन दिवसांत पोचण्याची शक्यता होती. शहरातून बाहेर पडायला भरपूर गाड्या मिळतील पण त्या गावी पोचण्यासाठी...... खूप प्रवास बाकी होता.....

------------------------------------------------------------------------


" ओ पाव्हण... हा शेवटचा स्टॉप आहे.. याच्यापुढे तर काही गाडी जात नाही..." कंडक्टर ओमला जागं करत होता.


" धन्यवाद साहेब उठवल्याबद्दल " कंडक्टरशी हात मिळवत तो खाली उतरला. आपली बॅग सावरत त्याने मनगटावरील घड्याळ तपासल. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. इश्चीत स्थळी पोचायला बराच वेळ लागणार होता... झपाझप चालायला हवं... मनाशी विचार करत त्याने कुच केली.


" हे येड नक्की कुठं चाललंय...त्या बाजूला रस्ता संपतो..." कंडक्टरने जरा ओरडतच ड्रायव्हरला विचारलं. शेवटच्या स्टॉपवरून यू टर्न मारून गाडी आल्या दिशेने गेलीच होती तेवढ्यात कंडक्टरने मागे वळून बघितलं. ओम आपल्याच तंद्रीत आणि बऱ्याच वेगात पुढे जात होता. 


" नवीन तर नसेल ना हा... पण.... जाऊदे आपण आधी पळूया.." ड्रायव्हरला तिथून निघायची घाई होती. 


" पण त्याला सांगायला तर पाहिजे ना... तो भुताटकीचा भाग आहे..." कंडक्टरने काळजीने विचारलं.


" तिथे गेल्यावर जिवंत राहिलो तर सांगू ना... " पुढे काही न बोलता त्याने वेगाने गाडी दामटवली. 


तिथल्या गावकऱ्यांच म्हणणं होत की तो भाग अमानवी शक्तींच्या नियंत्रणाखाली आहे. बरेचसे विचित्र प्रकारही तिथे घडून गेले असल्याने त्या भागात कोणी फिरकायच नाही. एवढंच नाही तर गावात येणाऱ्या बसेसही शेवटच्या स्टॉपवर यायच्या नाहीत. आज ओममुळे त्यांना पुढे यावं लागलं. परंतु अंधार पडायच्या आत घाईने तिथून निघून जाणं भाग होत. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror