Ajay Nannar

Inspirational

4.0  

Ajay Nannar

Inspirational

पर्यावरण दिवस

पर्यावरण दिवस

8 mins
147


5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धन याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिवस साजरा करण्यामागचा हेतू असतो. पर्यावरण हा शब्द, फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे.


त्याचा अर्थ सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा उल्लेख केला जातो. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अपघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवजातीला भेडसावू लागल्यामुळे 1960 मध्ये पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान विषय अभ्यासण्यासाठी स्वतंत्रपणे लागू करण्याचे ठरविण्यात आले.


मानव हा पर्यावरणाचा एक बुद्धिमान घटक आहे. पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवाचा हस्तक्षेप असतो म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण झाले आहे.

आज आपण पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करतो. ते म्हणजे पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान. पर्यावरण विज्ञान काय आहे हे आपण जाणून घेऊया. तर पर्यावरणामध्ये तत्त्व सिद्धांत व जैविक, अजैविक घटकांमधील आंतरक्रिया यांचा अभ्यास आपण करत असतो.


पर्यावरण शिक्षणात परिसंस्था, रचना, कार्य, संरक्षण व संवर्धनाचे विविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, मानवी व नैसर्गिक जैविक लोकसंख्या पर्यावरणाची धारणक्षमता निरंतर श्वासत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका या कार्याचा आपण यामध्ये अभ्यास करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व समबोधक आणि सिद्धांत याबरोबरच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण तत्त्वज्ञान यांचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारण यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.


मॅन अँड नेचर या पुस्तकात मानव व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्याचे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. 1899 मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आउटलुक टोक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य पर्यावरण शिक्षण सुधारणा असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव निर्माण करून तसेच जागृती निर्माण करणे पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी 1965 मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षण शास्त्रात समाविष्ट करण्यात आला.


तर 1970 मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. 1972 मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाची असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर, 1975 मध्ये बेलग्रेड येथील कृती सत्रात ठरविण्यात आली. पर्यावरण शिक्षण या पर्यावरण विषयी ज्ञान आकलन कौशल्य जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपले सकारात्मक मनोभूमिका निर्माण करावी.


तसेच पर्यावरण शिक्षण हे एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंघ आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येय ठरविण्यात आली. मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रिया मुळे पर्यावरण गुणवत्तेचा होणारा ऱ्हास नैसर्गिक प्रक्रिया यामुळे निसर्गातील परिसंस्थांमध्ये होऊन तसेच हवा अशा संसाधनाचा पर्यावरणाची गुणवत्ता घटते संयुक्त राष्ट्रसंघाची सामाजिक व परिस्थिती उद्दिष्टांची गरज यांची पूर्तता करण्याच्या पर्यावरण म्हणजे पर्यावरण ऱ्हास होय.


काही नैसर्गिक प्रक्रिया आणि मानवी कृती पर्यावरणाची आणि ती होण्यास कारणीभूत ठरतात. यामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे काही काळानंतर हे पर्यावरणवादी तिचे प्रमुख कारण आहे. मनुष्य आपल्या जीवनातील दैनंदिन वापरातील वस्तूंच्या निर्मितीसाठी विविध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कच्चामाल म्हणून करत असतो. वस्तूंच्या वाढत्या निर्मितीमध्ये नैसर्गिक संसाधनाचा अधिकाधिक त्रास झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. तसेच संसाधनाच्या अतिवापरामुळे अपशिष्ट निर्माण होते.


यामुळे वातावरणात राहणारे सजीव तसेच मानवी जातींचे मोठे नुकसान होते व त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये सामाजिक आर्थिक तसेच स्नायू व अपायकारक गोष्टींमुळे मृदा व भुमी यांचा सुद्धा ऱ्हास होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्पादनासाठी वाढलेला वापर हे सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण ठरू शकते.


पर्यावरणातील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे मोठ्या प्रमाणात निर्वणीकरण होत आहे. त्यामुळे शेतीचा विस्तार वाढतो, स्थलांतरित शेती, डोंगर उतार शेती यामुळे जमिनीचा ऱ्हास होतो. म्हणजेच पृथ्वीचा ऱ्हास झाल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. विविध प्रकारच्या विकास कामासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने देखील नैसर्गिक पर्यावरणात बदल होतांना आपल्याला दिसत आहे. मोठ्या धरणांच्या बांधकामामुळे जलाशय निर्मिती होते, परंतु खडकांची संतुलन बिघडते. तसेच जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते, वाढती लोकसंख्या पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत आहे.

 

वाढलेल्या लोकसंख्येमुळे संशोधनाची मागणी वाढते. मात्र संसाधने हे मर्यादित असल्यामुळे सर्व गरजांची पूर्तता करणे अशक्य आहे. हे लोकांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. तरी असेच चालत राहिले तर 2050 सालापर्यंत जगाची लोकसंख्या व जास्तीत जास्त वाढवून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊन जाईल. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.


प्रदूषणापासून पर्यावरणाचे रक्षण करता येते. पर्यावरण ऱ्हासामध्ये ही मानवी कृती आणि नैसर्गिक प्रक्रिया यामुळे पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. त्यामुळे परिस्थितीकीय असमतोल निर्माण होऊन परिसंस्था आणि जैवविविधता यावर विपरीत परिणाम होतांना आपल्याला दिसत आहेत. परिस्थितीकीय असमतोल हे पर्यावरण ऱ्हास तिचे एक मोठे लक्षण आहे. सजीवांच्या निरीक्षणातून ते सहज दिसून येते.


काही वेळा भूकंप व ज्वालामुखी भूमिपात, चक्रीवादळे व पूर, अवर्षण, उष्ण व शीत वादळ लहरी इत्यादी नैसर्गिक प्रक्रियांमुळे जलदगतीने पर्यावरनाचा ऱ्हास होते, त्यामुळे पर्यावरण उपयुक्ततेचे मूल्य कमी होते. पर्यावरणातील बिघाडामुळे मानवासह इतर काही सजीवांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. नैसर्गिक पर्यावरणाच्या स्वास्थ्यात आपत्तीजनक स्थिती निर्माण होते. जैवविविधता येथील लक्षणीय घट होते. पृथ्वीवरील जीवनामध्ये एक विलक्षण अशी आंतर विन असते त्यातील एखाद्या घटकातील गुणधर्मात बदल झाल्यास त्या घटकाशी निगडित असलेल्या इतर घटकांचा विविध गुणधर्मांवर परिणाम होतो. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास सुद्धा होतो.


नैसर्गिक परिसंस्थेत बदल झाल्यामुळे काही वेळा हे बदल खूप मोठ्या प्रमाणात भूप्रदेशावर घडून येतात. या बदलांचा भौतिक परिसंस्था वर मोठा परिणाम होतो. परिसंस्थेतील असणारे ओझोन, अवक्षय, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र इत्यादींमध्ये खूप मोठे बदल होतात. जागतिक तापमान हे व्यापक स्तरावरील परिसंस्था बिघडल्याचे व पर्यावरण ऱ्हासाचे ज्वलंत उदाहरण आहे. पर्यावरणाच्या आणि त्यामुळे असंख्य किनारी परिसंस्था धोक्यात आले आहे.


आशियातील एकूण 70 टक्के तर युरोपातील 80 टक्के किनारी प्रदेश पर्यावरण अवनतीग्रस्त आहेत. जर आपण वेळीच पर्यावरणाची काळजी घेतली तर होणारी जमिनीची धूप वातावरणातील वायूंचा थर याचे प्रमाण संतुलित राहील. पर्यावरणाची आपण निगा राखली तर पर्यावरण आपले निगा राखू शकेल. पृथ्वीवर असणारे जलचक्र देखील पर्यावरणामुळेच शक्य आहे. आपण पर्यावरण दूषित केले तर पर्यावरण आपल्याला दूषित करेल म्हणून झाडे लावा व पर्यावरण वाचवा हा संदेश यामधून घेणे महत्वाचा आहे.


पर्यावरण आणि मानव हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत, म्हणून पर्यावरणाला वाचवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावून पृथ्वीला सुजलाम-सुफलाम बनविले पाहिजे व घरे बांधण्यासाठी जंगलतोड कमी प्रमाणात करायला पाहिजे. तसेच मानव आणि सर्व सजीव प्राणी हे अन्नाशिवाय जगू शकत नाही आणि त्यांना पाण्याचीही गरज असते. त्यामुळे मानवाला जगण्यासाठी पाणी, हवा हे सर्वात उपयुक्त असते. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.


पर्यावरण म्हणजे एक असा विषय ज्यात आपल्याला जगवण्याची आणि मारण्याची दोन्ही क्षमता आहेत. ह्याने मानवाचा मूड कसा ठेवावा चांगला की वाईट, ताजा ठेवावा हीही क्षमता आहे.


5 जुन पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जाणारा दिवस म्हणजे एक सणच आहे. ह्या सृष्टीत असे मानले जाते की पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जो सर्व गुण संपन्न आहे कारण हा पर्यावरणाने आणि मानवी जीवनाने संपन्न आहे. पर्यावरणात खूप गोष्टींचा समावेश आहे जसे झाडे झुडपे, पर्वत, डोंगर, नदी, समुद्र, प्राणी, पक्षू, मानव, जल, वायू, अग्नी आणि इतर अनेक काही. पृथ्वीवर सर्वात जास्त बुद्धिमान असलेला प्राणी म्हणजे मानव आहे त्यामुळं आपण आपले पर्यावरण सुंदर बनवले पाहिजे. पर्यावरण जीव जीवांना प्रगती करण्यास मदत करतो आणि मानवांना देखील खूप मदत करतो त्यामुळे मानवाचा कार्य बनते की पर्यावरणाला सुरक्षित ठेवायला हवे.


मानवाच्या सुखी जीवनासाठी सभोवतालचे वातावरण, पर्यावरण सुंदर आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. आणि मानवी जीवनात पर्यावरणाची गोष्ट केली तर त्याचा मानवी जीवनात खूप महत्वाचा वाटा आहे. पर्यावरण आहे महणून आपण आहोत असे म्हटले तेही खोटे ठरणार नाही. आजकाल सर्वजण ऐकत असाल की जर आपण पर्यावरणाचा समतोल नाही ठेवला तर आपल्याला पुढे भारी नुकसान सोसावे लागू शकते. का झाले पर्यावरण दूषित तर वाढत्या प्रदूषणाने आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर जास्त केल्यामुळे. तंत्रज्ञानाच्या युगात मानव खूप पुढे गेला आहे परंतु पुढे जातांना तो मात्र हे विसरला की आपल्या काही चुकींमुळे निसर्गाला हानी होऊ शकते ज्याने नंतर जीव सृष्टीला त्रास होईल.


जगात सर्वात जास्त प्रदूषण हे वाहनांच्या मधून निघणारा धुरमुळे होतो. ह्या प्रदूषणाला वायू प्रदूषण असे म्हटले जाते. कारखाना मधून निघणारा धूर आणि सांडपाणी मधून सुद्धा प्रदूषण होते ज्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्याचबरोबर पाणी दूषित करणे जसे नदीत कपडे भांडी धुणे, नदी समुद्रात कचरा करणे. तर ह्या गोष्टी आपण रोखायला हव्या ज्याने पर्यावरण सुरक्षित राहील. त्यामुळे आपण पाणी वाचवा ही मोहीम आत्मसात करायला हवी.


गाड्यांचा धूर, कारखान्याचा धूर आणि सांडपाणी, मोठा प्रमाणात आवाज अश्या अजून काही गोष्टींमुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदुषण अधिक प्रमाणात वाढून पर्यावरणाला हानी पोचवतात.


पर्यावरण टिकवण्यासाठी झाडे खूप महत्वाची आहेत आणि आजकाल मनुष्य झाडांना नष्ट करत आहेत ज्यामुळे निसर्गाला मोठा धक्का बसला आहे. जर आपल्याला पर्यावरण टिकवायचे असेल तर झाडे नष्ट करणे आणि झाडे लावणे आत्मसात करायला हवे. निसर्गातील विविध सुंदर गोष्टींमधून झाडे हे एक निसर्गाची सुंदर देणं आहे जिला आपण मनापासून जपले पाहिजे. माणसांना जगण्यासाठी झाडांची गरज असते कारण झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन प्राप्त होते ज्यामुळे आपण जिवंत राहू शकतो.


झाडांना लावून काही होत नाही तर त्यांना जगवावे देखील महत्वाचे आहे. झाडे झुडपे निसर्गाची शान आहे ज्याने निसर्गाला सौदर्य प्राप्त होते.


मानवाने नवीन वस्तूचा शोध लावण्याआधी हे लक्षात घ्यायला हवे की याच्यामुळे पर्यावरणाला काही हानी तर नाही होत आहे ना. आणि जर होत असेल तर ते तिथेच थांबवायला हवे कारण जर ही सृष्टी राहील तेव्हाच ती वस्तू आपल्या कामात येईल नाहीतर आपल्याला बघायला देखील मिळणार नाही.


अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे मनुष्य सध्या पर्यावरणाच्या विरूद्ध जात आहे. जसे पर्यावरणाने मानवाला खाण्यासाठी खूप काही नैसर्गिक गोष्टी दिल्या आहेत जे फळांच्या रुपात आपल्याला मिळतात. परंतु मनुष्य मांसाहारी होऊन निसर्गातील जीवांना मारून त्यांचे मास खात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लोकं कृत्रिम पदार्थ खात आहेत जे एका निर्जीव स्वरूपात येतात. ह्या गोष्टींनी पर्यावरणाला, प्राण्यांना आणि मानवांना धोका निर्माण झाला आहे.


प्राण्यांची शिकार करून त्यांना मृत्यू देणे हे मनुष्याच्या हातात नाही आहे परंतु तरीही हे मनुष्याला समजत नाही. आजकाल तुम्ही ऐकलं असेल की काही प्राणी लुप्त होत आहेत आणि त्यांची पिढी देखील नष्ट झाली आहे तर त्या मानव मुळेच झाले आहे.


वाढती लोकसंख्या देखील पर्यावरणाला दूषित करते कारण जेवढी संख्या तेवढे जास्त प्रमाणात प्रदूषण होते. लोकं कुठे फिरायला गेले की लगेच कचरा करतात आणि प्लास्टिकचे वस्तू तर जागोजागी फेकलेली दिसतात ज्याने भूमी प्रदूषण निर्माण होते. नदी किनारी आणि समुद्र किनारी फिरायला गेल्यावर पर्यटक पाण्यात कचरा टाकतात आणि प्लास्टिकचे वस्तू, पिशव्या, बाटल्या अती फेकलेल्या असतात ज्याने जल प्रदूषण होते. तर हे रोखण्यासाठी आपण आपला कचरा आपल्या बॅगेत भरुन एका ठिकाणी कचरा कुंडीत टाकायला हवा ज्याने प्रदूषण नियंत्रित होईल.


निष्कर्ष


पर्यावरण आपल्याला मिळालेली एक अमूल्य भेट आहे जी आपली काळजी घेते परंतु निराशाजनक बाब आहे की मनुष्य त्याची काळजी घेत नाही. त्यामुळे आजकाल प्रदूषण वाढून पर्यावरणाला हानी करत आहे ज्याने सर्व जीव सृष्टीला त्रास भोगावा लागत आहे.


पर्यावरण हा आपला एक मित्र आहे ज्याची काळजी आपण प्रदूषण मुक्त करून घ्यायला हवी. गाड्यांचा धूर आणि कारखान्यातील धूर व सांडपाणी नियंत्रित करून निसर्गाला सुरक्षित ठेऊ शकतो.


निसर्गाने पृथ्वीवर मनुष्याला सर्वात हुशार आणि बुद्धिमान जीव बनवला आहे परंतु तो त्या बुद्धीचा दुरुपयोग करू लागला आहे असते दिसत येत आहे तर जे प्रयोग पर्यावरणाच्या विरूद्ध आहेत ते रोखून जे प्रयोग पर्यावरणासाठी योग्य आहेत तेच करायला हवे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational