माझा प्रवास
माझा प्रवास
*मी,माझी बहिण व माझे आईवडील आम्ही एका खेडेगावात रहात होतो.* *आई प्राथमिक शिक्षिका तर वडील इलेक्ट्रिशियन होते* *आमच्या गावापासून ६ किमी अंतरावर असलेल्या कारंजा (लाड) या तालुक्याच्या ठिकाणी जातांना रस्त्याच्या कडेला एक शनिदेवाचे मंदिर.* *आमच्या गावातून कारंज्याला गेलेले सर्व लोकं अंधार पडायच्या आत गरी यायचे कारण त्या मंदिर परिसराविषयी अनेक आख्यायिका सर्वत्र चर्चिल्या जात होत्या.*
*मंदिराच्या आजूबाजूला रात्री दिवा फिरतो अशी चर्चा होती.*
*मला अचानक कारंजा येथील मामांकडे सायकलने जावे लागले.*
*मी जेमतेम बारा वर्षाचा होतो.* *मामाकडचे काम आटोपून परत निघणार तेव्हा मामामामींनी सायंकाळी जेवणाचा आग्रह केल्यामुळे निघतांना सात वाजले.*
*मनात अत्यंत भिती तरीही सायकलने परत निघालो.* *मनात विचारांचे काहूर माजलेले होते.* *अंगावर शहारे येत होते.* *नित्यशनियमाने सकाळ संध्याकाळी व्यायाम,कसरत करून शरीर कमावले होते पण मनाला नियंत्रित करणे अतिशय अवघड व महान कार्य होते.* *मंदिराच्या जवळ येईपर्यंत अंग घामाने चिंब झाले होते.* *ऐकलेल्या गोष्टींची वारंवार आठवण होत होती व जीव मुठीत घेऊन मी परतीचा प्रवास करीत होतो.*
*देवाचे नाव घेत सायकलवरून मंदिराकडे तिरपी नजर टाकली तर दिवा फिरतांना दिसला.*
*हिंमत करून थांबले व देवाचे नामस्मरण करीत जवळ गेलो तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला* *मंदिरपरिसरातील शेतातील उंदिर कणकीचे दिवे ओढून नेत होते.*
*हे दृश्य पाहून मनातील भिती पूर्ण दूर झाली व त्यानंतर त्या परिसरातून जातांना मला काहीही गैर वाटले नाही.*
*मनुष्य स्वतः मनात भिती घालून घेत जीवन जगत असतो.* *म्हणून प्रत्येक गोष्टींची शहानिशा केलीच पाहिजे* *तसेच आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेऊन प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव व दडलेले सत्य जाणून घेतलेच पाहिजे*