लॉक डाऊन दिवस-११
लॉक डाऊन दिवस-११


लॉक डाऊन चालून सुमारे बराच कालावधी झाला होता. जसं जसं लॉक डाऊन चे दिवस वाढत होते तसे ,रुग्णांची संख्या वाढत चालले होती. आता भयंकर अशी परिस्थिती आपल्या देशावर येत होते. विशेषतः आता मुंबईची फार वाढली होती. कारण मुंबईमध्ये आता खूप साऱ्या ठिकाणी त्या न दिसणाऱ्या विषाणूने त्याचे अतिशय घट्ट असे घर निर्माण केले होते. तो त्या गोष्टींमध्ये केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे, शक्य होत होता. फक्त काही शिल्लक कारण असले, तरी लोक जशी जत्रा भरली आहे. अशी गर्दी भाजीपाला घेण्यासाठी करत होते. जसं त्यांना जर भाजीपाला भेटलाच नाही तर त्यांचा दिवस जाणार नाही. कधी लोकांना ना त्याचं गांभीर्य समजेल हे समजतच नव्हतं.
शेवटी तसंच झालं मुंबईमध्ये आता खूप सार्या छोट्या भागांमध्ये त्याने शिरकाव केला. तसं बघायचं झालं जागा जरी लहान असली पण तिथे लोकां
ची वस्ती लाखों मध्ये होते. आता ही खूपच त्रासदायक ठरणारी होती. सरकार तरी आपल्या परीने खूप सारे प्रयत्न उपाययोजना आखत होते. फक्त आपल्याला घरात राहून प्रशासनाला सहकार्य करायचं एवढच. किती वर्षानंतर आपल्याला या धावपळीच्या आयुष्यात एवढ्या निवांत वेळ भेटला आहे. त्याचा उपयोग आपल्या परिवारासोबत द्यायचं, तसेच आपल्याला जे जे करायचं राहिलं होतं ति स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेळ भेटला होता.
पुन्हा अशी वेळ आपल्याला कधीच भेटणार नाही. ही वेळच नाही तर एक संधी होती आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्यासाठी. या देशाने खूप सारे आपल्याला दिला आहे आता आपले कर्तव्य होते आपण त्याला काहीतरी देण्याचे. हा एक विचार जरी मनामध्ये बालग्, किंवा द्यायचं जतन जरी केलं तरी आपण खूप खूप मोठे योगदान दिल देश घडवण्यासाठी...............