भाऊ
भाऊ
दोघे भाऊ एकमेकांचा जीव की प्राण. नेहमी सोबत राहात असत. सारी कामे एकत्र करीत असत. दोहोंचा वेगवेगळा संसार झाला. घरात नवीन सदस्य आले. मने दुखावू लागली. भावांत वैमनस्य निर्माण झाले. समोरासमोर बोलायची हिंमत नाही. एकमेकांवर रागावले आणि अबोला.
हा अबोला संपला खरा पण तेव्हा त्यातला एक भाऊ कायमचा शांत झाला होता आणि दुसरा भाऊ आतून खचला होता.