प्रेम काव्य
प्रेम काव्य
आठवणीतलं प्रेम
किती आठवू,आठवू,
ओलावल्या पापणीत
किती गोठवू,गोठवू....
रम्य क्षण सारे कसे
भुर्रकन मागे गेले,
स्मृती तुषार अंतरी
सैरभैर मन झाले.....
प्रेम पहिलं -वहिलं
तन-मन सुगंधित,
पावसाची सर जशी
करी अवनी गंधित....
श्वास क्षणभर थांबे
स्पर्शभास होता तुझा,
अंगी रोमांच पिसारा
स्वर्ग जणू एक माझा....
गाठी-भेटी स्मरतात
किती क्षितिज सुखाचे,
तुझे-माझे प्रेम मनी
दुःख गळून फुकाचे....