लढ
लढ
आज वेळ खराब आहे,
पण येणारा काळ तुझाच असेल.
निंदकाच्या तोंडातही,
तुझीच किर्ती दिसेल.
भलेही आजचे युदध,
तु हारला असशील,
हारी बाजी जितनेवाला,
सिकंदरही तुच असशील -
आपण हरलो हे दुःख,
मनात कधीच ठेऊ नकोस.
शर्थीनं पुन्हा पुन्हा लढ 3
अन् जिंकल्याशिवाय राहू नकोस .
प्रत्येकाच्या जिवनात असा,
सुख-दुःखाचा चढ-उतार हा असतोच.
कितीही काळोखी रात्र असो,
मित्रा, तिचाही शेवट असतोच.
