STORYMIRROR

संजय रोंघे

Tragedy

4  

संजय रोंघे

Tragedy

एक थेंब पाणी

एक थेंब पाणी

1 min
212

दिवसा मागून दिवस जातात

मनाला मनाचे कळत नाही ।

जाग येते सूर्याला आणि

तेव्हाच सुरुवात होते काही ।

आठवणींचा मोठ्ठा पसारा

सहजच येतो मग पुढ्यात ।

एकच थेंब पाणी कसे

वसते डोळ्याच्या घड्यात ।

अंतरातली जखम खोल

सहजच दुखावते कधी ।

वाहू लागते भळभळून

बांध मनाचा फुटतो आधी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy