Meena Kilawat

Inspirational Classics

2  

Meena Kilawat

Inspirational Classics

स्त्री स्वतंत्र विश्व

स्त्री स्वतंत्र विश्व

3 mins
3.1K


आजच्या युगात स्त्रिया स्वतंत्र विचाराचे समर्थन

करणाऱ्या आहेत. "सावित्री आजची" ही कर्तुत्व दाखविण्यासाठी नेहमी सज्ज असते. सावित्रीबाईंची निस्वार्थी भावना, स्त्रीजाती विषयी प्रेम,व कर्तव्य समजून अथक प्रवास करून स्त्रियांचे भविष्य घडविण्याचा अट्टाहास करून नवी शैक्षणीक दिशा देवुन आजच्या सावित्रीला दृढ केले. आणि सावित्रीची प्रेरणा प्रत्येक स्त्रीत रूढ आहे. सर्वांच्या मनात सावित्रीची ठाम छबी स्थापित आहे. अशी एकमेव महिला आपल्या भारतात नावलौकीक मिळवून अजरामर होवून गेली.तिच्या पुण्याईने आजच्या स्त्रीसुद्धा कुठल्याही क्षेत्रात मागे नाही,योग्यतेनुसार आपल्या कार्यात समरस होताना दिसतात . भारतीय स्त्रीची अवस्था ही पायातल्या चप्पलेपेक्षा जास्त नव्हती. आता त्या चंद्रावरसुद्धा जावून पोहचलेल्या आहेत. आणि समाजात आपल्या स्थानासाठी झटत आहेत.

    या प्रयत्नात आजची स्त्री ही कितपत मोकळी झाली आहे ,हे मात्र आपण ठामपणे सांगु शकत नाही. कुठेकुठे अजुनही परस्वाधिनतेच्या कचाट्यात रूतून बसलेल्या आहेत.त्या कश्या बाहेर निघणार?त्या स्त्रीयांंना कोण बाहेर काढणार हा यक्ष प्रश्न आजही मला भेडसावतो आहे?काही स्त्रिया जिवंतपणी नरकयातना भोगत आहेत.

 त्या मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत. आज एकविसाव्या शतकात पदार्पण करतानाही कीव येण्यासारखे जीवन जगत आहेत. काही महिलांनी स्वत:वर पांघरूण घातलं आहे.आणि रूढी-परंपरेच्या बेड्यात अडकुन खितपत पडलेल्या आहेत .

    ग्रामीण भागात अजून स्त्री मुक्त नाही, पुरूषापेक्षा जास्त काम करूनसुद्धा तिला मान मिळत नसतो.स्वत:मजूरी करते पण एक रुपया खर्च ती करू शकत नाही कारण पुरुषी अहंकारी वृत्ती वरचढ ठरत असते.तेव्हा त्या स्त्रींने नेमक काय करायला पाहिजे.?तिच्याजवळ काही पर्यायच नसतो.ती एकतर घर सोडते किंवा आत्महत्या करते.! (जशी सिंधूताई सपकाळ यांची दुर्गती करण्यात आली होती.) अश्या समाजात अनेक घटना रोजनिशी ऐकायला मिळतात ) झुरून, रडून ,ऐकून कुंठत जगत असते. माझ्या माहिती नुसार ५० टक्के ही स्त्रियांना स्वातंत्र्य नाही . ज्या स्त्रिया पुढे गेल्यात त्या भाग्यवान आहेत किंवा त्या स्त्रियांमध्ये कर्तृत्व क्षमता जास्त आहे .पण ज्या स्त्रीत काही कर्तुत्व नसतं त्यांना काय जगण्याचा हक्क नसतो.? त्यांना ही मन,ह्रदय असतं. त्यांच ही स्वतंत्र विश्व असतं.!! . 

      क्षेत्र कोणतेही असो , काम करायला आजची स्त्री घाबरत नाही पण, त्यांना घरून आधार मिळत नाही, त्याच्या आशा,अभिलाषा चार भिंतीच्या आत कोंडून त्यांचे दमन केले जाते.वरून तिला काहीच कामे नाही ती घरातली राणी आहे ,कुठल्याच गोष्टींची कमी नाही.अस म्हणुन तिला अजून वेदनेच्या डोहात बुडवले जात असते. या सर्व गोंष्टींना जबाबदार कोण आहेत.?घरातील मंडळी ससमंजस असतील तर ठीक आहे नाहीतर स्त्रींला समर्पण करणे भाग आहे.!

     अनेक नामी स्त्री व्यक्तिमत्त्व रूपात आपणास दिसते आहे.पण त्या सहज मार्गाने क्षितीज गाठून नावलौकिकास आल्या असेल काय.? त्यामागे कित्येक आहुत्या देवून त्यांनी आपल स्थान बनविलेले असेल. तशीच आजची प्रत्येक सावित्री प्रयत्न करीत आहे.महत्वाकांक्षा,आत्मविश्वास त्यांच्याजवळ भरपूर आहेत.त्यांची यशस्वी वाटचाल सुर्यकिरणाप्रमाने चहूकडे विस्तारीत व्हावी. आजच्या सावित्रीला स्वबळावर आपली एक छबी निर्माण करण्यासाठी चाललेली तिची तळमळ, स्त्री-मुक्ती संघटनांनी स्त्रीवरील होणार्‍या अत्याचारांना आळा घालण्यासाठी हाती घेतलेले उपक्रम व,मोफत शिक्षण, समाजसुधारकांचे स्तुत्य नेतृत्व, वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन, लघुउद्योग, महिला सशक्तीकरण यांच्यासारख्या योजनांमधून स्त्रीमध्ये जागृती झालेली आहे. तिला पुढे नेण्यासाठी जीद्द आणि ध्येय ठेवणे अतिशय गरजेचे आहे.आजची सावित्री आपले स्थान उंच करुन नवनिर्मात्री होईल असा विश्वास करून सदिच्छा देते.!!!!.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational