Meena Kilawat

Inspirational

5.0  

Meena Kilawat

Inspirational

ऋतूराज वसंत

ऋतूराज वसंत

4 mins
16.8K


         या निसर्गाच्या किमया बघा मणुष्य,पशु,पक्षी मोठ्या आशेने ऋतुचक्राची सारखी वाट बघत असतात.. आणि हे ऋतुचक्र सारख फिरत असतय. ऋतुचे अनेक रंग प्रकृतित दडलेले आहेत.त्यात हा अमुल्य असा "ऋतूराज वसंत" वाखाणन्याजोगा व जीवन भरणारा आहे...

       वर्षभरातील बदलत्या ऋतुचक्राची अनेक कार्य आहेत. ती सर्व आपआपली कार्य चोखपणे करित असतात. मराठी नववर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होत असते म्हणजेच चैत्र महिण्यापासून तर पौष महिण्यापर्यंत असते.थोडक्यात चैत्र महिण्यापासून ऋतुचक्राची नोंद घ्याविशी वाटते. केवळ बदलत्या निसर्गाचे वर्णनच नाही तर या बदलत्या ऋतुचक्राचे मानवी मनावर उमटणारे भावतरंगही आश्चर्य करण्यासारखे असतात.म्हणजे हा निसर्ग मानवी सृष्टीला प्रफुल्लित,उत्कर्षित करत असतो.शिवाय मनाला आनंदाची पर्वणी ही अशी वेळोवेळी मिळत असते. सर्वात महत्वपूर्ण ऋतू म्हणजे

ऋतूराज वसंत सर्व सृष्टीत चैतन्य पसरवणारे मनाला भुरळ घालनाऱ्या या ऋतुचक्राचे जितके कौतूक केले तितके कमीच अाहे.

   कोकिळेचे मंजूळ स्वर मनाला कसे आल्हादित करतात.गुलाबी शितल वाऱ्यासवे कोकिळ,मैनेचे ही दर्शन होवून ती मंजूळ नाद कानावर पडला की समजावे ऋतूराज वसंत अाला रे आला तो आपल्या अलगद पाऊलाने येतो आणि सर्व जनामनाला आपल्या वलयात गुरफटतोय.. शिशिर ऋतूत पानगळती होवून नवपालवी फुटायला सुरवात होत असते.ती वृक्षांची कोमल पालवी नवीन उल्हास घेवूनच येत असतोय. मनोमनी भरत असतो.. सर्वत्र झाडाखाली पाला पाचोळ्याचा सडा पडतोय.आणि शिशिर संपताच चाहूल लागते ती ऋतूराज वसंताची. त्यास चैत्रपालवी पण म्हणतात. त्यावेळी आपल्या भारतिय मराठी संस्कृतीप्रमाने भरपूर सण उत्सवाची नांदी असते. नवविवाहिता, नवयौवना अगदी अतूलनिय आंनदात सोहळ्यांमध्ये भाग घेत असतात. वसंत ऋतूच्या प्रत्येक सोहळ्यात नाविन्यपूर्ण रसरसलेला आल्हाददायक धुंद करणारा सूगंध दडलेला असतोय. प्रत्येक वस्तू मोहक वाटते. आबाल वृद्ध ही सतेज दिसतात. म्हणुनच वसंतऋतूला ऋतूराज म्हणून संबोधण्यात येत असते.. कारण सहा ऋतूंच्या सोहळ्यांमध्ये वसंत ऋतूचा सोहळा काही निराळाच आभामई भसत असतो. वसंतऋतूची चाहूल लागताच सारी सृष्टी आनंद अनुभवत असते. जणू प्रत्येक वृक्ष आपल्या बालकांना प्रसवत असते..आणि प्रत्येक डहाळीरूपी अंगाखांद्यावर आपल्या बालकांना खेळवते.झोके देते .शहारून कुंजन करते..त्यात वाऱ्याचा शितल झोका झकझोर करून लपंडाव खेळत असतो.. गुडीपाडवा, वसंतपंचमी. चैत्रगौरी सप्तमीला, चैत्रनवरात्र ,रामनवमीला प्रत्येक सणाला आंम्रवूक्षाचा मोहोर वाहून पुजा करतात.व छोट्या कैऱ्याची चटनी किंवा पन्ह हमखास असतेच. 

    होळी उत्सवानंतर वातावरणात एक प्रकारची उष्णता जाणवू लागते. आणि अशावेळी वसंत ऋतूची चाहूल घेऊन येणारी आल्हाददायक वाऱ्याची मंद झुळूक प्रेमळ गारव्याने तनामनास हर्षित करून जात असते.होळीची रंगपंचमी वसंत उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा करून रंगा-रंगाचा मनसोक्त आनंद लुटतात. त्यासाठी पुर्वी अनेक प्रकारे तयारी करून लाल,केशरी पलाशफूले वनातून आणून ती भिजवून त्यापासून आयुर्वेदानुसार औषधीयुक्त बणविलेले रंगानेच रंग खेळत असे. आणि आमचे आमात्य आम्हास वेळोवेळी वृक्षसंवर्धण करण्यास सांगत असे ,व कोणत्या वृक्षाचा कसा फायदा होतो हे ही सांगुन नवनविन वृक्ष कसे तयार करायचे.हेही जातिने सांगायचे..

निसर्गाने सृष्टीवर असंख्य रंगाची उधळण केलेली आहे.त्या विविध रंगाच्या छायेत मणुष्यच नाही तर प्रत्येक जीव सुखावत असतो. तृप्त होत असतो..या वसंत ऋतूत असंख्य रंगाने धरती नटलेली असते.

कुठे लाल कुठे हिरवी, गुलाबी ,केशरी,आकाशी रंगाच्या फुलांचे ताटवे पृथ्विच्या सौदंर्यात भर घालत असतात .जीकडेतिकडे फुलांनी भरगच्च सजलेले ताटवे पाहून मन प्रसन्न व्हायचे, पण हल्ली तसे वातावरण दिसत नाही. आजच्या पिढीचे सौदंर्य म्हणजे मोठमोठी गगनचुंबी इमारती ,व सिमेंट क्रॉक्रीटच्या सडका व त्यावरील यातायात असून,नकली रंग,नकली मेकअप,टूव्हिलर,फोरव्हिलर इत्यादीचे प्रदूषण दिसते आहे...

      आरोग्यवर्धक वायुवलय निर्मान करून ही वृक्षे आपणास निसर्गाची देणी आहेत.कितीतरी वृक्षांची औषधी निर्मान मात्र होवून माणवाच्या कल्यानाला हातभार लावण्यास कारनीभूत आहेत.कडूनिंब बघा . कैरीने लादलेला आम्रवृक्ष बघा, मंदार, अशोक, ख्रिसमस , ताडवृक्ष, गुलमोहोर फणस,काजू, देवदार वृक्ष बघा कशी क्षितिजाला जावून टेकतात. जमिनिवर कलिंगड,खरबूज निरनिराळ्या लतावेली कश्या सरपटून सारे रान बहूरंगी करून वेल्हाळतात.तसेच

 पानाफुलांनी बहरलेले हे निसर्गिय वैभव मोहित करून निसर्गाचे महा विस्तिर्ण रूप डोळ्यात भरते तेंव्हा,हे वृक्ष,नदी,सागर,पाहून मनोमनी मयुर नाचायला लागतात.निरनिराळे रंगीबेंरगी पक्षी व त्यांचा मधुर कंठ पक्ष्यांची मधूर किलबिल नकळत मणुष्याला गुणगुणायला लावत असतात. नवलांकित गंधवलये सारेच कसे मन मोहवून टाकत असते. निसर्गाने रेखाटलेली अद्वितिय साक्षात जींवत चीत्र न्याहाळून अलगद टिपावेत ही निसर्गाची आलौकिक कला एकाग्र करून ह्रदयात ठासून भरावी आणि ही अद्भुत माया आपल्या दोन्ही बाहुत भरून आनंदाची अनुभूती भोगावी अस वाटायला लागतय.. 

     अश्या रमनिय दिव्य ऋतूराज वसंताचे वर्णन संत कलीदासाने शाकुंतलंमध्ये केलेल आहे.संत तुलसीदासाने रामायण ग्रंथात केलेले आहे. अनेक लेखक ,कविंनी युगानुयूग वसंतऋतूचे भरभरून कोड कौतूक केलेले आहे. वसंतऋतूचे अद्भूत विलोभनिय वर्णन करावयास शब्द ही अपुरे पडते आहे.. 

"वंसत येतोय घेवून रंगधारा     

फुटती मनात प्रकाश धारा                

नवसंजीवन देती नवआशा        

उमले उल्हासाचा नव घुमारा"..

अनेक संत,लेखक ,कवी यांनी आपल्या साहित्यातून वसंतऋतूवर रसपुर्ण लेखणीला सलाखून धार दिली आहे. सर्वांनाच हवाहवासा वाटणारा वसंतऋतू भावविभोर करतोय. आहे..व करतच राहाणार आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational