Meena Kilawat

Others

5.0  

Meena Kilawat

Others

कविता कशी असावी

कविता कशी असावी

3 mins
2.0K


      कविता अशी असावी , आकाशी जीतके चांदने विखुरले आहेत.त्यापेक्षा ही जास्त कवितेच सामर्थ्य आहे. ब्रम्हांडात होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर कवितेच साम्राज्य आहे.. मानवाच्या अवती भवती फिरून वेध घेणारी बोध देणारी तिच खरी कविता असते.निसर्गाच्या सानिध्यात तीचे अस्तित्व फुलून अजूनच निखरत असते,तिचे सौदर्य अन् कुरूपता वाखानण्यासारखे असते.तिचे वर्चस्व मानी,अभिमानी कर्तबगार व्यक्तीनेही मानले आहे.पशूपक्ष्यांच्या जीवनातील त्यांच्या ह्रदयातील हालचाली हेरून जी कविता उजागर होत तिच खरी कविता असते.सूर्य,चंद्र तारे,आकाश ,ब्रम्हांडात ही कविता विलसत असते ,तिचे असंख्य रूपे असून भावविश्वात रमन करणारी कविता असते. ज्वंलत प्रश्नाला वाचा फोडणारी ,घूसखोरी करणारी, डोळ्यातील अश्रृला वाट मोकळी करून देणारी, दुुःखाला शमवणारी ,सूखाला बोलावणारी ,गरजूंना आनंद देणारी , तिच खरी कविता असते.विश्वाची गतीशिलतेचा प्रशस्त स्रोत छोट्या कवितेत सामावून वर्णित होते, तिच खरी कविता असते.दैंनदिनी समाजातील अडी अडचनी जाणून घेणारी,बुद्धीमत्तेला जागृत करून विद्वत्ता भूषविते तिच खरी कविता असते.मनातील प्रत्येक तरंगभाव चोफेर धूळ कणा सारखे पसरावेत तिच खरी कविता असते.

       कविता कविता असते.कुणाचीही तिच्यावर जबरदस्ती नसते. लेखणीचा चमत्कार शब्दांतुन व्यक्त भाव असते.अक्षरांनी परिपूर्ण सजलेली संपुर्णतहा तिचीचच सत्ता असते. तळागाळातील चिखल,माती अणु,रेणु पर्यंत कवितेची मजल असते.ती फक्त कागदावरची ओळच नसते!ती जीवंत अष्टपैलू धारण केलेली हिरकणी असते.कधी ती मृगजळाप्रमाणे पसरतच रहाते. कधी मोहळाला बिलगलेली मधमाशी असते.तर कधी ती गदारोळ करणारी सर्वकस आवाज असते.

कधी वाहवा मिळवते तर कधी दगडांचा मारा सहन करते.आयुष्याचे गमक असते. कधी सार्थक असते.

कधी पाखरांच्या पंखांवरती कविता झोके घेत असते कोकिळेच्या मधूर कंठाच्या मधुरम रसमय गीत होत असते.कधी पाखरांच्या चोचीतील दाणे टिपते.राजहंस ,मोर नीलकंठाची प्रणय लिला विलोभनिय दृष्य कवितेत साकार होत असते नखापासून केसांपर्यंत ही कविता पोहोचते.. अवघे कल्पना विश्व  कवितेत सामावते... 

 जशी प्रियकराची ती प्रीत तसाच सखीचा तो सजना असतो,प्रेम प्रणय किंत किल्लोर,प्रणयरम्य पहाट तर मधुचंद्राची रात्र असते.. मधाळ बोल तर कधी कठोर वार, एकवचणी कधी अनेकवचणी असते. आग्रह ,विद्रोह,कुसंस्कारी कधी सुसंस्कारी, अल्हड बाललिलेत रमनारी, कधी रसरसलेली तारूण्यातली लखलखणारे यौवन असते.कधी वासनाधीन शरीर गामिनी वेश्या ,वारांगणा अश्लीलतेच्या सीमा पार करणारी अशी असते.

    श्रीकृष्णाची गीता, बायबल,कुराण,वेदव्यासांचे महाभारत ,तर वाल्मीकांचे रामायण, कालीदासाचे महाकाव्य ,नानकांचे गुरूग्रंथ साहिब ,ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, मीराबाईची रचना,स्वामी समर्थ ,नामदेव, तुकारामाचेअंभग ,जनाबाई,सावतामाळी ,बहिणाबाई ,सुरेश भट अश्या अनेककांच्या कविता समृद्ध अाहेत.कबिराचे दोहे, रैदासाचे,सुरदासांचे,बेखुद देहलवी ,क़तील शिफाई,आमिर खुसरो अनेक संताना या कवितेने जीवनदान दिलेले आहे.अतुलनिय प्रभाव या कवितेेने विस्तारित साम्राज्य स्थापित केले आहे,आणि अप्रतिम कवितेचे भरभरून कौतूकही झाले आहेत.!!

     सूर्याची तेजस्वी विस्तारीत आभा ही कविताच असते.चंद्राचा शितल प्रकाश जसा चहूकडे शांती पसरविते,त्याचप्रमाणे कविता आपली आल्हादकता कणकणात मिसळवते.कविता जेंव्हा जन्माला येते तेंव्हा तनमन सहयोग देत असते. कोणी तत्वज्ञ म्हणतात की शब्दाला शब्द जोडून कविता करताय.! पण सत्य हेच असत की शब्दाला शब्द जुळते तेंव्हाच कविता प्रसवत असते.शब्दच तिची असंख्य लेकरे असून कवितेच्या अंगाखांद्यावर खेळत असते.व कुटूंबात वेल्हाळत असते.आणि भरगच्च शब्दांचा संसार फुलत असतो..व ती कविता अक्षरांनी परिपूर्ण सजलेली,नटलेली असते..सर्वच कविता श्रेष्ठता भूषवित नसते,अर्थातच ! पाचही बोट सारखी असतात अस नाही.सर्वच कवितेची लेकरे सद्गुणी असतात तर दुर्गुणी ही असतात.हा नियम जगात सर्व मणुष्य असो वा प्राणी असो वा कविता असो.! तो सर्वांनाच लागु पडतोय...!काही कविता आंधारातल्या काजव्यांच्या प्रकाशाप्रमाणे चमकत असतात,आणि काही कविता मिनमिनत्या प्रकाशाप्रमाणे अस्त होतात.     

      शब्दांतुन व्यक्त केलेली प्रकाशीत कविता ही कधी गौरव मिळवते तर कधी अपमान झेलत असते.कधी प्रसन्नता मिळवते तर कधी शल्य जोपासत असते. कधी नवचेतना व स्फुर्ती देत असते,तर कधी निरूत्साही वेदनेत रमवणारी असते..

काही कविता श्रीमंत असतात तर काही कफल्लक असतात.काही आयुष्य घडवत असतात तर काही कहर करतात.कविता ही कूठेही प्रगट होत असते..

गौतम बुद्धाला ती पद्मासनात मिळाली,  

महावीर यांना उकडू आसनात मिळाली

येशू ख्रिस्ताला ती क्रूस वर मिळाली..

सुकरातला ती विषात मिळाली...

रैदासाला ती जोडे,चप्पल शिवतांना मिळाली....

कबीरदासाला चादर विणता विणता मिळाली...

गोरा कुंभाराला माती सांधतांना मिळाली...

सुरदासाला एकताऱ्यात ,विणेत मिळाली...

कुणाला कुठे तर कुणाला कुठे ही कविता मिळाली. विश्वातिल ती एकमेव चीरंतन कविता शाश्वत सत्य व सुंदर अशी आहे.


Rate this content
Log in