कातरवेळ...
कातरवेळ...
संध्याकाळ म्हणलं की असचं होत. कातरवेळेला बरच काही आठवत राहतं ,मन कुठे लागत नाही भूतकाळात रमून जात...
किती तरी गोष्टी असतात सांगण्यासारख्या मनात साठून राहिलेल्या... समुद्राच्या लाटा जश्या उधानल्या सारख्या येतात अगदी मनातही आठवणींचा तसाच उधानलेला समुद्र असतो.
या आठवणी कधी कमी होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत... मग ,मनं कासावीस होत आणि संध्याकाळी ,कातरवेळी असं भूतकाळात रमून जात... जुन्या आठवणींत...
उगाच येत राहतात मनात अनेक विचार...मग नेहमीच वाटत राहतं मनाला..." रमून गेले भूतकाळात आणि... तुझ्याशिवाय निघून गेली आज ही एक.... संध्याकाळ "