गुपीत
गुपीत
अगदी शून्यात आभाळात बघत बसलेली चारु ऑफिसातून आलेल्या राघवचा धक्का लागताच भानावर आली. का ग इतकी घाबरलीस का ? राघव ने विचारले. नाही काही नाही अस बोलून कधी आलात?मी पाणी आणते सांगुन चारु आत निघून गेली. राघवने त्याकडे दुर्लक्षच केले. मात्र चारुच्या मनात अनेक विचारांचा गोंधळ घातला होता. काय करु नि काय विचारात च तिने स्वतःला सावरले नी थोडा शांत होण्याचा प्रयत्न केला. रात्र झाली, थकलेल्या राघवला झोप कशी लागली कळालेही नाही.चारुची मात्र घालमेल सुरुच होती, विचार थैमान घालय होते. कारण असच काही होत...
राघव नि चारुच्या लग्नाला तब्बल बारा वर्षे झाली होती. एक दहा वर्षांचा गोंडस मुलगा अमेय नि सहा वर्षाची गोड मुलगी अवनी होती. सगळं अगदी सुरळीत चालू होते. राघव कामानिमित्त नेहमीच बाहेर असायचा तेव्हा दोन्ही मुल चारुजवळ असायची.
एम ए मराठीत झालेली मात्र घरच्या जबाबदारीने घराबाहेर पडताच येईना मुल सांभाळणे यातच पूर्ण वेळ जायचा शिवाय राघव ही जास्त करून बाहेर असायचा, परत जवळ मोठी व्यक्ती नाही.