जीवन
जीवन


सुखमय जीवन
सांभाळून ठेव
नाहीतर आहे
मोठा भेव।।
दिल्लीला भूकंप
तिनचार वेळा
येऊन गेला
जीवन अस्ताव्यस्त झाला।।
कोरोनाची माहामारी
लढता लढता
थकुन गेली
जनता सारी।।
टिडीने दाखविली
किमया भारी
खाऊन बसली पिकं सारी
गेली शेतकऱ्यांची शिदोरी।।
शूरवीराप्रमाणे आला
तो बघा वादळवारा
झाड झुडपे पाडुन
घराचे सप्पर घेऊन गेला।।
डोळ्यातील आसवे
पुसता पुसता
कंठ दाटुन आला
समुद्रही सुकून गेला।।
सावध हो नियमाचे
करून घे पालन
वेळोवेळी दक्षता घे
किमती आहे जीवन।।