शुगर
शुगर
आई! आई! म्हणून संकु आवाज देत होता. आई घर कामात व्यस्त. परत संकू नीं आवाज दिला. आई लवकर बाहेर ये. मीं काय आणलं बघ?
काय रे. संकेत?थांब मीं आलीच. म्हणून ती स्वयंपाक घरातून आपली काम सोडून बाहेर आली.
आणि घराचा दरवाजा उघडला. आणि पाहते तर काय बाहेर, संकेत एक छोट्याश्या कुत्राच्या पिल्लाला हातात घेऊन बाहेर उभा होता.
अरे हें काय? कशाला आणलं हें पिल्लू. जा जिथून आणलं तिथेच सोडून ये. जा पटकन . पळ ....नको आणून त्याला आपल्या घरात. असं म्हणून आई त्याला रागावतच होती.
पण संकेत आईच एक तो कुठे आहे . मला नही जमणार परत त्याला सोडून यायला.मीं त्याला घरातच ठेवानार माझ्या सोबत..
अरे मीं नाही त्याला सांभाळणा बर.तू शाळेत गेल्यावर.त्याचं कोण करेल???
"ये आई नाहीन ग. "बघन!किती छोटंसं क्युट किती गोड आहॆ. ग ते..
अगदी थोड्यावेळातच त्या पिल्लाला संकेत चा लळा लागला. अगदी त्यांच्या हातात तो आईच्या कुशीत स्वतःला सुरक्षित असल्या सारखं समजतं होता.
संकेत त्या पिल्ला च लाड करण्यात इतका मग्न होता. त्याचं माझ्या बोलना कडे लक्ष नव्हतं. आणि त्याने हट्ट च केला मीं ह्याला सोडून नाही येणार. माझ्या जवळच राहणार तो आता. माझा मित्र म्हणून.
त्यांच्या हट्टा पुढे मला झुकावंच लागलं.आणि...
त्या पिल्ला पेक्षा संकेत च्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते छोटंसं पिल्लू माझ्या मना जवळ केव्हा आलं कळच नाही.
नाही नही म्हणत.संकेत साठी त्यांचा सांभाळ करायला लागली.आणि एक दिवस त्याचं बारस ही झालं. आणि त्याचं नाव ही ठेवलं "शुगर ".दिसायला खूपच गोड होत. हळूहळू.....
शुगर केव्हा घरचा सदस्य बनला आम्हाला कळच नाही.
त्यांचे काळे भोर केस उंच. असा चेहऱ्यावर वरचा तांबूस रंगाचे केस. गब्बू गब्बू असणारा" शुगर " घराची रखवाली करायला लागला. कोणी दरवाज्या वर आलं तर त्यांच स्वागत "शुगर "च करायचं.
कधी भूकून तर कधी मायेने जवळ जाऊन.प्रत्येकाला आपलस करायचं..
शुगर ची भीती होती सगळ्यांना. सहसा पटकन कोणी अनोळखी घराच्या दरवाज्या आता येण्याचं धाडस करत नव्हतं.पण त्यांचा लळा मात्र सगळ्यांनाचा होता.
तो लहान होता तर आजूबाजूला असेलेलं सगळे लहान मुलं त्यांच्या सोबत खेळायला यायचे. कधी बिस्कीट तर कधी काहींना खायला घेऊन यायचं.
लहान मुलाचं तर तो चाहता झाला होता.आणि शुगर ला खूप मस्ती करायला आवडायच.
आपण जी भाषा बोलायचं ती त्याला सहज कलळून जायची. रागवलं तर ऐकून घ्यायचा. आणि प्रेमानं बोलवलं तर समजवून घ्यायचा.कधी कधी वाटायचं त्याला तर वेळ पण कळायची.
संकेत शाळेतून केव्हा येतो. तर त्यांची वाट पाहत दरवाजा जवळ बसून राहायचा त्यांचा येण्याचं दरवाजाच्या आवाज आला पटकन शेपटी हालवत धावत जायचा. जो पर्यन्त संकेत लाड नाही करणारा जवळ नाही घेणारा तो स्वस्थ नाही बसायचा.
संकेत चा हट्ट होता म्हणून मीं त्याला घरात ठेवलं होत. पण शुगर माझ्या मनात कायमचा घर करून गेला.
हळू हळू दिवस जसे जातं होते.तस वाटायला लागलं शुगर ला सांभाळायचं म्हणजे आपल्याला वर कायमच बंधनच आहॆ.
कारण त्याला सोडून कुठे जाता येणार नाही. मग त्याला कोणाकडे ठेवायचं.अचानक कुठे जावं लागलं तर कस होणार.????
शुगर कुठे राहिली??? त्यांची काळजी कोण घेईल. मग निर्णय घेतला की त्याला कोणा कडे तरी सोडून यायचं कायमच. आपल्याला त्रास होईल पण लवकरच आपण बंधन मुक्त होऊन जाऊ.
मग एक दिवस ओळखीच्यांकडे संकेतला नं सांगता त्याला हळूच सोडून आलो.सोबत त्त्याचं खाण्यापिण्याचं, झोपण्याचं, त्यांच्या वस्तू पण देऊन आलो ज्यांच्या सवयी त्याला होत्या. आमच्यापासून दूर गेल्याच त्याला भास होणार नाही.
आपलं नातं एवढंच होत असं समजून स्वतःला समजूत घातली.आणि आम्ही निश्चिंत झालो.
फक्त एक दिवस झाला असेल. आणि दुसऱ्यादिवशी दारा समोर" शुगर" दिसला. ज्यांच्याकडे ठेवला होता त्यांनी परत आणून सोडला आणि म्हणाले याला सांभाळणं सोपं नाही आहे आम्ही नाही सांभाळू शकत याला. आणि परत त्याला आम्ही घरात घेतलं. तुटलेलं बंधन परत जुळलं.
जस शुगर ठरवूनच आमच्याकडे आला होता. राहीलतर आमच्या सोबतच. नाहीतर कोणाकडे राहणार नाही.असंच काही..
परत बंध जुळेल.
असं करत काही काळ निघून गेला आणि परत एकदा दुसरीकडे सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.
संकेतही पण तयार नव्हताच,पण समोर कोणताच पर्याय ही नव्हता.
कारणही तसच होत. दुसरीकडे राहायला जायचं. तिथे जागा लहान मग शुगर ला कस ठेवणार.?
घराच शिफ्टिंग झालं . दोन तीन दिवस सहज निघून गेले. कामाच्या व्यस्ततेत. पण ते दोन तीन दिवस रोजच शुगरची आठवण यायची..
त्याचं आवाज त्यांचा भास. सारखं जाणवत होता.तो आपल्या आजूबाजूला आहेच.असा स्पर्श होत होता.
तो घरात नव्हता पण तो सारखा समोर दिसत होता.
आणि मग नं राहून निर्णय घेतला त्याला परत आणण्यायचं
.तीनचार दिवस दूर असलेला शुगर नीं आम्हाला बघितलं आणि आमच्या आवाजावरून तो नुसता उच्छल कुद करायला लागला. आणि जोर जोरात ओरडायला लागला. जणू त्याला खूप आनंद झाला. आम्ही आल्याचा तो त्याच्या भावना व्यक्त करत होता. जणू तो आमचीच वाट बघत होता.
पण ज्यांच्या कडे शुगरला सोडल तो सहजतेने परत दयायला तयारच नव्हता...
मग आम्हालाच त्यांच्या पायापडावं लागलं, विनवणी करावी लागली आमचा शुगर आम्हाला परत दे . "आम्ही त्याच्या शिवाय राहू शकणार नाही तोही आमच्या शिवाय". खूप मिन्नते केली..मग मानला...
जसं त्यांनी त्यांच्या गळ्यातली साखळी सोडली तसा तो आमच्याकडे वेगाने धावत आला . आणि आम्हाला बिलगुनं राहायला.त्यांच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू होते.
प्राण्यांना ही भावना असतात. माणसाची ओळख असते. कोणताही द्वेष न करता फक्त प्रेम करणारे, ते मुके प्राणी. माणसाला कधीच समजले नाही त्याचं प्रेम. आपण एकदा लळा लावला की ते कधीच आपल्याला विसरत नाही..
त्याला जवळ घेतलं. त्याला कुरवाळल.
अरे आम्ही कुठे बाहेर जाऊ तर तुला कोण सांभाळ या भीतीपोटी तुला आमच्यापासून दूर केलं . तुला सोडून आम्हाला जाता येत नाही तुझी काळजी कोण घेईल.हया काळजीने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
आणि परत तो आमच्या सोबत आनंदाने घरी आला.
जणू तो आमच्यापासून दूर झालाच नव्हत्ता असच वाटत होत...
. "आपलं कोणतं नातं आहे रे हे कोणतं ऋणानुबंध आहे हे आत्म्याचे नात आहे"म्हणूनच तुला आमच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही..
हे नात्याचं बंधन कोणाला तोडता येणार नाही. तू आमचा आहे आणि आमचाच राहणार आहे. नवीन घरातही तो पूर्वीसारखाचा रुळून गेला.
आई एक एक गोष्ट आठवत होती. "शुगर" एक महिन्याचं असताना घरात आल्या पासून आतापर्यंत चा त्यांचा प्रवास ... एकेक दिवस समोर येत होता.
. हातामध्ये शुगर ला धरून रडत होती.त्यांच्या अंगावरून हात फिरवत होती.असं वाटतंय तू परत धावून येशील.
उठ! उठ शुगर उठ ! तुला काय झालं उठ डोळे उघड बघ. काय झालं तुला? उठ शुगर पण शुगर उठतो कुठे? तो आता कायमचा झोपून गेला होता सगळ्यां बंधनातून कायमचा अचानक मुक्त करून गेला होता.
दहा वर्षाचा त्याचा हा काळ जो आमच्यासोबत त्याने घालवला होता तो सगळा डोळ्यासमोरून जात होता.
त्यांच्या आठवणीनीं मनाला डोळ्यात अश्रू आणत होत्या . तुझा आणि आमचं रक्ताचं नातं नव्हतं पण तू आमचाच होता. तू कायम आमचाच राहशील....तू केव्हा? आमचा झाला कळलच नाही .
तुला पाळताना नाही कळलं तू जेव्हा सोडून जाशील तर आम्हाला एवढा वेदना होतील..शुगरच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवत त्याला रिती रिवाजाप्रमाणे घरच्या सदस्यासारखंच शेवटचे संस्कार केले..
कितीके वेळा तुला आमच्या पासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला.पण त्या वेळस नाही कळलं की तुला ही वेदना होत असतील. तुलाही भावना असतील..
पण तू स्वतःहून आज आमच्या पासून कायमचा वेगळा झाला. तुझ्या त्या गोड "आठवणीतून "आम्ही कधीच मुक्त होणार नाही.
