STORYMIRROR

Madhuri Sharma

Inspirational

3  

Madhuri Sharma

Inspirational

श्रीनाथजींचे दरबारी

श्रीनाथजींचे दरबारी

1 min
173

उदयपूरच्या महाराणाचे दरबारी भुवनसिंह चौहान हे भगवान श्रीनाथजींचे निस्सीम भक्त होते.

ते रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून भागवत भजनात मग्न असायचे,

आणि देवाची प्रार्थना करायचे की 

मी माझ्या हाताने कुठलेही पापी कृत्ये घडु नये, दररोज मी माझ्या स्वत: च्या हातांनी आजारी किंवा गरीब व्यक्तीची सेवा केली पाहिजे.

महाराणा, भुवन सिंग यांच्या भक्ती आणि सेवाभावनेने खूप प्रभावित होते.

एके दिवशी महाराणा जंगलात शिकार करायला गेले. त्याच्यासोबत जहागिरदारांचा एक गटही होता. 

महाराणा यांनी एक हरीण पाहिले. त्यांनी त्यांचा घोडा त्याच्या मागे लावला. हरीण झाडांच्या आच्छादनात जाऊन लपले.

महाराणाचा इशारा मिळताच भुवनसिंगने हरणावर तलवार चालवली. मरणासन्न हरणाच्या डोळ्यातून वाहणारी करुणेची धारा पाहून भुवनसिंग हळहळले.

ते घरी परतले आणि भगवान श्रीनाथजींसमोर हरीण मारल्याबद्दल पश्चात्ताप केला, आणि भविष्यात कोणत्याही निष्पाप प्राण्याची हत्या न करण्याची शपथ घेतली. हरणाच्या हत्येमुळे भुवनसिंगला त्रास झाल्याचे जेव्हा महाराणाला कळले तेव्हा ते त्याच्या दयाळू भावनेने अधिक प्रभावित झाले. 


एके दिवशी महाराणा म्हणाले -

'भुवनसिंह, खरे तर तुम्ही आमचे नसून भगवान श्रीनाथजींचे दरबारी आहात.

आजपासून तुम्ही दरबारात येऊ नका. तुमची जागीर दुप्पट करण्यात येत आहे.

भुवनसिंह म्हणाले, महाराज, मला संपत्ती नको आहे, कोणत्याही निष्पाप प्राण्याला मारायचे नाही हा तुमचा संकल्प हवा आहे.

महाराणांनी त्यांना तसे वचन दिले आणि त्यांचा निरोप घेतला....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational