STORYMIRROR

Madhuri Sharma

Tragedy Action Thriller

3  

Madhuri Sharma

Tragedy Action Thriller

हिरण्याक्ष - शाप आणि मृत्यू

हिरण्याक्ष - शाप आणि मृत्यू

1 min
231

 हिरण्याक्ष आणि त्याचा भाऊ हिरण्यकशिपू यांची कथा पुराणात आढळते. हिंदू धर्मग्रंथांनुसार दोन शक्तिशाली राक्षस हे विष्णूचे द्वारपाल जया आणि विजयाचे अवतार होते. 

   

    सनक ऋषी, ज्यांना जया आणि विजयाने विष्णुलोकात प्रवेश नाकारला होता, त्यांनी त्यांना पृथ्वीवर राक्षस म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला होता.

  हिरण्यक्षाने तीव्र तपस्या केली आणि तो अत्यंत शक्तिशाली झाला.

त्याने देवांचा (देवतांचा) पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. त्यानंतर त्याने समुद्रात उडी मारली आणि त्याच्या शक्तिचा वापर करून त्याने पृथ्वी वर लाटांचा मारा केला. लवकरच पृथ्वी जलमय झाली.

  त्याने महासागरांचा देव वरुणाला आव्हान दिले. पण वरुणाने राक्षसाशी युद्ध करण्यास असमर्थता मान्य केली आणि त्याला विष्णूला आव्हान देण्याचा सल्ला दिला.

 

   ब्रह्मदेव ज्यांना हे समजले की हिरण्याक्ष खूप शक्तिशाली झाला आहे त्यांनी पृथ्वी मातेचे रक्षण करण्यासाठी विष्णूचे ध्यान केले.

  

   ब्रह्मदेवाच्या नाकातून विष्णू भगवान एका लहान वराह (डुकराच्या) रूपात प्रकट झाले.


लवकरच, वराह अवतारात असलेले विष्णू भगवान यांच्या आकारात वाढ झाली , आणि त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि बुडलेल्या पृथ्वीला आपल्या दातांनी वर उचलले.

  

  हिरण्यक्षाने वराहला त्याच्याशी लढण्याचे आव्हान दिले.


पृथ्वीला त्याच्या मूळ स्थितीत आणल्यानंतर, वराह अवतारात असलेल्या विष्णूंनी हिरण्याक्ष राक्षसाशी युद्ध केले आणि त्याचा वध केला.

 

ही कथा भागवत पुराणात आढळते.


तुम्हाला माहीत आहे का?


श्रीमद्भागवतामध्ये दोन भिन्न वराहांचा उल्लेख आहे.


एकाला श्वेता वराह म्हणतात आणि दुसऱ्याला रक्त वराह म्हणतात. म्हणजे एक पांढरा आणि एक लाल. आणि ते वेगवेगळ्या वेळी दिसतात. रक्त वराहने हिरण्यक्षाचा पराभव केला होता.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy