STORYMIRROR

Madhuri Sharma

Inspirational

3  

Madhuri Sharma

Inspirational

समरस रहा...

समरस रहा...

1 min
169

एकेकाळी एक म्हातारा शेतकरी होता, ज्याने अनेक वर्षे आपल्या पिकांवर काम केले होते. एके दिवशी त्याचा घोडा पळून गेला. ही बातमी समजताच त्याचे शेजारी भेटायला आले. "किती दुर्दैवी घटना घडली ," ते सहानुभूतीने म्हणाले...


   कदाचित," शेतकऱ्याने उत्तर दिले.


दुसर्‍या दिवशी सकाळी घोडा परत आला आणि आणखी तीन जंगली घोडे घेऊन आला. "काय महान भाग्य!" शेजारी उद्गारले.


"कदाचित," वृद्धाने उत्तर दिले.


दुसर्‍या दिवशी, त्याच्या मुलाने एका अशक्त घोड्यावर स्वार होण्याचा प्रयत्न केला, त्या घोड्याने त्याला जमिनीवर फेकून दिले आणि त्याचा पाय मोडला. त्याच्या दुर्दैवावर शेजारी पुन्हा सहानुभूती द्यायला आले, किती वाईट घडलं ना!


"कदाचित," शेतकऱ्याने उत्तर दिले....

  

एके दिवशी, लष्करी अधिकारी तरुणांना सैन्यात भरती करण्यासाठी गावात आले. मुलाचा पाय मोडल्याचे पाहून ते त्याच्याजवळून गेले त्याला त्यांनी लष्करात भरती करुन घेतले. त्यांना असेच साहसी शिपाई पाहिजे होते. शेजाऱ्यांनी शेतकऱ्याचे अभिनंदन केले की सर्वकाही चांगले झाले.


"कदाचित," शेतकरी म्हणाला...


कथेचे तात्पर्य -

शापाचे आशीर्वादात रूपांतर होते असे अनुभव आपल्या सर्वांना आले आहेत; नकार पुनर्निर्देशनात बदलतो आणि विनास्वार्थ केलेली प्रार्थना ही तुम्ही घडवलेली सर्वोत्तम गोष्ट आहे. चांगले काय आणि वाईट काय सर्व परिस्थिती मान्य करून समरस होऊन सामान्य जीवन जगावं......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational