प्रेमरंग (भाग २)
प्रेमरंग (भाग २)
सुमितच्या मित्रांना खूप चिंता सतावू लागली.ह्याच आता पुढे काय होणार याच विचाराने सर्व जण त्रस्त झाले होते.दुसऱ्या दिवशी ही मित्र मंडळी शाळेत जाऊ लागली व जाता जाता अचानक सुमितने त्याच्या मित्रांना विचारले की,भावांनो!आज आपण दुसऱ्या तासालाच बाहेर येऊयात आणि खो-खो चा सराव करूयात स्पर्धा आता जवळ आल्या आहेत.त्याचे मित्र ही म्हणाले की,भावा होय आता स्पर्धा जवळ आल्या आहेत आणि सराव सुरू करायलाच हवा.सुमित व त्याचे मित्र हे अभ्यासात जरी मागे असले तरी ते खेळात पुढेच होते व खो-खोच्या संघातील मुले ही त्याच्याच वर्गातील होती.
शाळेत पोहचल्यानंतर दुसऱ्या तासाला ही मंडळी मैदानात आली सरावासाठी त्यांनी मैदानातील मोठे खडे व मैदानाला पाणी मारून घेतले.सराव सुरू झाला बघता बघता दुपारचे ३.०० वाजले शाळेची मधली सुट्टी झाली होती.तेवढ्यात सुमितने संकेतला सांगितले की,संकेत आपण मधली सुट्टी संपेपर्यंत तिच्या शाळेत जाऊन येऊयात.संकेत हो म्हंटला,पण लगेच येऊयात नाहीतर सर ओरडतील त्यावर सुमित म्हंटला की भावा फक्त पाहून येऊयात तिला. सुमितने त्याची एटलास सायकल काढली व दोघे जण त्यावर स्वार होऊन वैष्णवीच्या शाळेत गेले.वैष्णवीची पण मधली सुट्टी झाली होती. ती तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर आली होती सुमितने तिला पाहिले पण त्याच्यात बोलण्याचे धाडसच झाले नाही.वैष्णवीने ही त्याला पाहिले व विचार केला की हा आता इथे काय करतोय हा मला तर पाहण्यासाठी नाही ना आला.वैष्णवी लगेच आपल्या मैत्रिणींना म्हणाली चला आपण वर्गात जाऊन बसूयात ती वर्गात गेली.सुमितला समजले की तिने मला पाहिलं आहे म्हणून तिने पळ काढली सुमित नाराज झाला आणि संकेतला म्हणला की, ति मला पाहून वर्गात गेली. संकेत म्हणाला सुमित चिंता नको करुस घाबरली असेल ती अस तू अचानक आलास तिच्यासमोर चल आपणही आता शाळेत जाऊयात.
संकेत आणि सुमित शाळेत गेलीत,जाताच सराव सुरू करण्यास लागलीत.संध्याकाळी ट्युशन मध्ये सुमित वैष्णवीकडे पाहू लागला वैष्णवी सुद्धा सुमितकडे पाहू लागली नजरेचा खेळ सुरू झाला होता.बघता बघता ३ महिने उलटून गेले पण यांचं पुढे काहीच झालं नाही.फक्त चालू होता तो नजरेचा खेळ.पण ह्या ३ महिन्यात सुमित वैष्णवीवर एकतर्फे प्रेम करू लागला होता.पावसाळा सुरू झाला होता प्रेमाचे रंग बहरून येण्यास सुरुवात झाली होती.
सुमितला प्रश्न पडु लागले की, जर आता मी काहीच केलं नाही तर वैष्णविला कोणी दुसराच घेऊन जाईन याच विचाराने तो अंतरमनातून डगमगू लागला होता.वैष्णवी कोनादुसर्याकडे बोलली तरी हा आता नाराज व्हायचा,याच सगळ्या गोष्टींचा विचार करून सुमित रडू लागला त्याच्या मित्रांनी विचारले, अरे!सुमित काय झाले तुला.असा रडतोयस का। सुमित म्हणाला अरे ती मला सोडून कोना दुसऱ्या मुला सोबत बोलत आहे माज प्रेम तिला दिसत का नाही.त्यावर त्याचे मित्र म्हणाले अरे भावा सुमित ती फक्त मैत्रीच्या नात्याने बोलत असेल त्यांच्यासोबत तू उदास होऊन रडू नको लहानमुलासारखे.सुमित म्हणाला खूप दुःख होत आहे रे,मला पसंत नाही ती कोणा दुसर्यासोबत बोललेलं.तेवढ्यात आकाश बोलला अरे सुमित नको उदास होऊ वैष्णवीची बहीण माजी गर्लफ्रेंड आहे मी सांगतो दीक्षाला की, तू वैष्णवीवर किती प्रेम करतोस ते.आकाश वर सर्वे मित्र चिडले आणि म्हणाले, अरे! आकाश तुज आणि दीक्षाच चालू आहे तर मग तू आमच्यापासून का लपवलस इतके महिने झाले सुमित वैष्णवीच्या मागे मागे फिरतोय पण तू आम्हास सांगितके का नाही...? आम्ही काही बोलणार होतो का तुला.आकाश म्हणाल की, अरे तस काही नाही दीक्षा बोलली होती की कोणाला ही आपलं चालू आहे ते कळता कामा नये. संकेत म्हणाला, आकाशला बर जे झालं ते झालं पण आता दीक्षाला सांग सुमितच आणि वैष्णवीच जुळवून दे बिचारा किती रडतोय बग तूच आता त्याच तेवढं काम कर.आकाश म्हंटला भावा मी सांगतो तिला तुम्ही काळजी करू नका.
ट्युशन सुटल्यानंतर आकाश व दीक्षा भेटायचे.आकाश ने बोलता बोलता दीक्षाला सांगितले की,माजा मित्र सुमित तुज्या बहिणीवर खूप प्रेम करतो काहीही कर पण त्याचं जुळवून दे,खूप साधा मुलगा आहे तो उत्कृष्ट खेळाडू सुद्धा आहे.दीक्षा म्हणाली हे मला पण माहीत आहे की सुमित वैष्णवीवर प्रेम करतो ते.आकाश म्हणाला की हे तुला कस माहीत...? दीक्षा म्हणाली की मला हे वैष्णवीनेच सांगितलं आहे की सुमित सारखा पाहतो माज्याकडे अन मधल्या सुट्टीत शाळेतही पाहण्यासाठी येतो.त्यावर आकाश म्हणाला मग वैष्णवी पसंद करते का त्याला...?दीक्षा म्हणाली, माहीत नाहींरे आकाश मला असं काही म्हणाली नाही पण मी नक्की सांगेन वैष्णविला.आकाश म्हणाला, आठवणीने सांग तिला सुमित आजकाल खूपच उदास राहायला लागला आहे.दीक्षा म्हणाली होय मी सांगते तिला आता खूप उशीर झाला आहे आपण आता घरी जाऊयात.
घरी गेल्यानंतर दिक्षाने वैष्णवीस सर्वकाही सांगितले अन म्हणाली की,वैष्णवी...,सुमित हा खूप साधा मुलगा आहे तो तुज्यावर खूप प्रेम करतो आणि तुज्यात त्याचा जीव गुंतला आहे......पण तुज्या मनात सुमितबद्दल काही असेल तर मला सांग उगाच कोणाला अस आशेवर नको ठेऊस.वैष्णवीने दिक्षाच सर्व बोलणं ऐकून घेतलं व म्हणाली,ताई हो! माहीत आहे मला तो माज्यावर प्रेम करतो.मला पाहण्यासाठी तो मधल्या सुट्टीत रोज येतो एवढंच नाहीतर तो फक्त मला पाहण्यासाठीच लवकर ट्युशनमध्ये येतो मला सर्व माहीत आहे.दीक्षा म्हणाली,जर सर्व माहीत आहे तर मग तुम्ही बोलत का नाही...? वैष्णवी म्हणाली,मला खूप भीती वाटते कारण;कोणाला काही समजल तर आणि ह्या आधी मी कोणाशी अस बोलले पण नाही मग कस बोलू सुमितशी..? आणि तो सुद्धा बोलण्याचा प्रयत्न नाही करत म्हणून मग मी पण बोलत नाही.दीक्षा म्हणाली मग अस किती दिवस चालणार आणि कधी पर्यंत जर तुज्या मनात सुमित असेल तर तस मला तरी सांग. मी बहीण आहे तुजी मग तुला त्रास कसला आहे.वैष्णवी म्हणाली होय आहे, सुमित माज्या मनात पण एवढ्यात तर मी नाही बोलणार त्याच्याशी,होय! तो मला आवडतो पण काही दिवस अजून मी नाही बोलणार त्याच कारण अस की,जर त्याने प्रयत्न केला माज्याशी बोलण्याचा तरच मी सुद्धा बोलेन त्याच्याशी. पण आता ही चर्चा बंद करूयात आणि जेऊन झोपुयात उद्या सकाळी शाळेत जायचे आहे.असं बोलून दोघीही झोपी गेल्या.
दुसऱ्या दिवशी सुमित हाच विचार करत होता की तिच्याशी संपर्क कसा साधता येईल.एवढ्यात आकाश समोर आला आणि सुमितला सांगितले की,दिक्षाने वैष्णवीस सर्व काही सांगितले आहे.सुमित घाबरला! अन हळू आवाजात विचारले अरे....काय बोलतोयस....काही बोलली का वैष्णवी.यार मला भीती वाटते.आकाश म्हणाला अरे वेड्या घाबरतोस का..? वैष्णविला सुद्धा तू आवडतोस पण तू बोलत नाही तिच्याशी म्हणून ती सुद्धा नाही बोलत तुज्याशी,हे असं प्रकरण आहे.सुमित म्हणाला तू खर बोलतोयस ना,पण मला हिम्मत होत नाही तिच्याशी बोलण्याची.
ह्याच भीतीने सुमित तिच्याशी काहीच बोलला नाही,अन एकतर्फी प्रेमाला तेथूनच वर्षाव सुरू झाला.सुमितने धाडस केलंच नाही आणि हाच राग वैष्णवीने मनात धरला.अन सुमीतकडे बघणं बंद केलं. ह्याचा त्रास आता सुमितला होऊ लागला.आणि त्याच त्रासाचं वर्चस्व त्याच्या मनात उतरलं आणि सिधा सरळ सुमित व्यसनाला लागला.
आकाश आधीपासूनच व्यसन करत होता.एकेदिवशी ट्युशनला सरांनी अचानक सुट्टी दिली. ह्या मित्रांनी ठरवले की आता सुट्टी भेटली आहे तर थोडं फार हिंडत बसूयात.सर्वेजन चालत फिरत होते. आकाश ने एक सिगारेट घेतली आणि व ती ओढू लागला. सुमितने प्रश्न विचारला त्याला की आकाश सिगारेट ओढल्यानंतर काय भेटत तुला..?आकाश ने सांगितले की,मन जरा शांत होत सर्व त्रास दूर होतो.सुमित म्हणाला की,असं!मग बघू मला पण दे.तेवढ्यात शशांक आणि संकेत म्हणाला की, सुमित हाच एक पर्याय नाही तुज्याकडे त्रास दूर करण्यासाठी.पण सुमित कसला ऐकतोय सुमितने आकाशकडून सिगारेट हिसकावून घेतली व ती ओढली.ओढताच त्याला ठसका लागला तरीही तो ओढत होता.ओढल्यानंतर म्हणाला की, आकाश अरे! खरच रे मन शांत झालं. शशांक व संकेत म्हणाला, सुम्या हे तू चुकीचं केलंस तू सिगारेटचे सेवन नव्हते करायचे.सुमित म्हणाला...,
" प्यार का गम तुम क्या जाणो,
इस दिल मे उसकी सुरत बनी हे,
उसके बिना अब मे , मे ना रहा ,
मेरे प्यार का किस्सा तुम क्या जाणो"।
हे ऐकताच शशांक म्हणाला, अरे भावा सर्वकाही माहीत आहे पण तू त्रास नको रे एवढा स्वताला करून घेऊस. सुमित म्हणाला,जर वैष्णवी नाही मिळाली मला तर, मी जगणार नाही. आजही वैष्णवी माजी नाही म्हणून आता मी मरणाच्या दारात स्वतः चालून जाणार हे बोलून सुमित घरी निघून गेला.
शशांक, संकेतला म्हणाला, संकेत मी म्हणालो होतो ना,हा काहीतरी बर वाईट करून घेईन स्वतःच आणि आज तीच वेळ आपल्या मित्रावर आली आहे. ह्याला आता सावरायच कस यातून बाहेर कस आणता येईल.संकेत म्हणाला,आता ह्याला यातून बाहेर आणण अशक्यच आहे. शशांक आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करूयात याला बाहेर आणण्याचा.
सुमित दिवसंदिवस आता सिगारेट ओढू लागला होता. त्यात त्याने आता नशेचे पान सेवन करण्यास सुरुवात केली होती. वैष्णवी मिळेल की नाही याचं विचाराने तो त्रस्त झाला होता.ट्युशन मध्ये वैष्णवीने त्याच्याकडे न पाहील्याचे दुःख त्याला सतावू लागले होते.
एकेदिवशी सुमितने ट्युशन सुटल्यानंतर थेट दिक्षाची भेट घेतली,अन तिला सांगितले की,दीक्षा मी तुज्या बहिणीवर खूप प्रेम करतो पण मला तिच्याशी बोलण्याचे धाडस होत नाही.मी काय करणार ना. की, या आधी मी कोणत्याच मुलीच्या संपर्कात आलो नाही.म्हणून तू बोल तिच्याशी की, मला आता नाही रहावत तिच्याशिवाय.दीक्षा म्हणाली, सुमित मला माहित आहे की तू वैष्णवीवर खूप प्रेम करतोस ते, पण तूच तिला सांगावेस अस मला वाटत आणि तिलाही. हे ऐकून सुमित म्हणाला, ठीक आहे मी प्रयत्न करेन तिच्याशी बोलण्याचा. तरीही सुमितला धाडस होत नव्हते बोलण्याचे.
त्याच दुसऱ्या दिवशी सुमित व त्याचे मित्र शाळेत गेल्यावर, इतिहासाचा तास चालू होता. शशांक आणि सुमित एकाच बाकावर बसायचे. तास चालू असताना पाऊस सुरू झाला होता. पावसाच्या सरी जशा कोसळत होत्या तसेच सुमितचे अश्रू अनावर होत होते.त्याला प्रेमाचा सुगंध अन त्याची उणीव भासत होती. त्याचे शरीर जरी वर्गात असले तरी त्याचे मन मात्र वैष्णवीच्यात रमले होते.
काय करू अन काय नाही असे त्याला प्रश्न पडू लागले. भावनांच्या आहारी गेल्यामुळे त्याने एका ब्लेड ने आपल्या हातावर वार केले. हे पाहताच शशांक म्हणाला, ए.... पागल झाला आहे का..? काय! करतोयस हे तू...भानावर ये जरा. हे पाहून शशांकच्याच डोळ्यात पाणी आले. सुमित ऐकेनाच. सुमितचा हात रक्तभंभाळ झाला होता पण त्याला ते जाणवत नव्हते.अक्षरशः प्रेमरंगात रंगून गेला होता. सुमित शशांकला म्हणाला,
" जख्म भरी इस जिंदगी मे,
मरहम ना लग पायेगा...
इस प्यार के जख्म पे,
दवा क्या काम कर पायेगा....
असे,बोलून त्याने आपले अश्रू अनावर केले. प्रेमरंगात ह्या गोष्टी त्याच्यासोबत घडू लागल्या. मस्ती आणि आवारगी करता करता त्याला प्रेमरंग चढला. न कळत तो प्रेमरंगात पडला आणि व्यसनाची संगत त्याने पत्कारली. पण आता पुढे काय....? वैष्णवी भेटेल की नाही हाच प्रश्न त्याला आणि त्याच्या मित्रांना सतावू लागला.