जीवनात खरं प्रेम करा
जीवनात खरं प्रेम करा
मी रोज कुणाचे न कुणाचे प्रेमाचे स्टेटस बघत असते आणि काही दिवसांनी त्याच लोकांचे मला ब्रेकपचे स्टेटस दिसत असतात
विचार पडते,' प्रेमात दुरावा का होत असेल?, का बरं लोकांना विरहाचे भागी पडावे लागत असेल?'.
हे विचार मनात चालूच असतात की त्याचं लोकांचे स्टेटस मला पुन्हा प्रेमाचे दिसायला लागतात.
पुन्हा एक प्रश्न पडते, "लोकांप्रमाणे त्यांचं प्रेम पण बदलते काय ?......"
मी आज पर्यंत लोकांचे विचार, त्यांचे मन, त्यांच्या भावना बदलतांनी बघितलय पण कधी प्रेम बदलेल बघितल नाही.
खरं प्रेम जर स्टेटस पूर्त पूरक असत तर ते स्टेटस प्रमाणे बदलेल असत,
पण
इथे विषय फक्त स्टेटसचा नाही.
जर असेच असेल असते तर जगाला प्रेम शिकवणारे, प्रेमाचे देवता *"राधा कृष्ण"* कधीच विरहाचे भागी नसते, म्हणून कधी प्रेमाचा व्यंग करू नका.
खरं प्रेम खूप दुर्मिळ असते, प्रत्येकाला मिळेल असे नाही..........
जर प्रत्येक व्यक्ती प्रेमाचा व्यंग न करता, खरं प्रेम करायला शिकला तर या जगात कधीच कुणाचे मन, कुणाचा विश्वास, कुणाची हृदयस्पर्शी नाती तुटणार नाही.
जीवनात प्रेम करा पण त्याला वस्तू समजुन वापरून सोडायचं........हे प्रेम नाही. कधीं-कधीं असेही असू शकते की प्रेमापेक्षा जास्त महत्वाचे आपल्या आई बाबांचे स्वप्न असतात, तेव्हा आपण विरहाचे भागी पडतो पण आपण त्यांचे स्वप्न पूर्ण केले तर तेच आई बाबा आपले स्वप्न पूर्ण करतात कारण त्यांचही आपल्याला सुखी बघण्याच स्वप्न असते, म्हणून जीवनात प्रेम करा पण त्यासाठी सर्व काही सोडायचं किंवा त्याच प्रेमाचा व्यंग करायचं म्हणजे प्रेम नाही.
प्रेम पुन्हा-पुन्हा होईल असेही नाही.......
ज्यावर प्रेम आहे त्यांच्याशी फक्त बोलत राहणे, सहवासात राहणे म्हणजे प्रेम नाही.......
प्रेमात वर्चस्व विसरून सर्वस्व देणं म्हणजे प्रेम नाही........
तुम्ही स्वतः खूप हुशार आहात, तरीही सांगते.
प्रेमाला परिभाषा नाही, प्रेम मोकळ आहे, प्रेम बदलत नाही, मनाला दुखवत नाही तर दुःखात सोबत असते,
*प्रेम आपल्याला घडवत असते,*
*प्रेम कधी मारत नसते,*
*प्रेम एक नवीन नाव देत असते,*
*प्रेम कधी बदलत नसते,*
*प्रेम नावीन्यपूर्ण असते,*
*प्रेम कधी व्यंग नसते,*
*प्रेम तर मनात असते,*
*प्रेम शरीरात दिसत नसते,*
*प्रेम शेवटी प्रेमच असते,*
*प्रेम शेवटी प्रेमच असते.*
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
*❤️!!.....जीवनात खरं प्रेम करा.....!!❤️*
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
विचार करून सांगा, काही खोटे बोलली काय मी?