चुकीचे ग्रह
चुकीचे ग्रह
आज प्रकर्षाने ही ओळ अनुभवली म्हणून आठवली...
तुम्ही एखाद्या साठी कितीही करा अगदी स्वतःला किती ही
त्रास होत असला तरी तो जाणवू न देता...
पण त्या व्यक्तीला जर तुमच्यात खोटच काढायची असेल तर....,
ती व्यक्ती तुम्ही केलेली १० चांगली काम कधीच पाहणार नाही उलट ती तुम्ही १ गोष्ट केली नाही म्हणून गावभर दवंडी पिटणार..
याने काय होतं....? तर
करणारा मग त्याच्यावर झालेले संस्कार म्हणून करत राहतो.
पण मग त्या करण्यात तो आदर,जिव्हाळा,
आपुलकी मात्र उरत नाही...
त्यात मग फक्त असतं कर्तव्य आणि
माणुसकीचं नातं...बस
मला एवढंच वाटतं चुकीचे ग्रह करून
नात्यांमध्ये कटुता आणू नये...