STORYMIRROR

Ajay Nannar

Tragedy

3  

Ajay Nannar

Tragedy

अधुरी एक प्रेम कहाणी

अधुरी एक प्रेम कहाणी

5 mins
257

एक खरी खुरी प्रेम कहाणी ...........

नक्की वाचा......


अधुरी एक प्रेम कहाणी, कधी हि पूर्ण न होऊ शकणारी.....


एक मुलगी होती साधी सरळ

थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत

रंगलेली....आणि

एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी स्वतःमध्ये ...

गुंतलेला....

अशीच दोघांची एकदा ओळख झाली.....आणि त्यांची छान मैत्री झाली....


त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले....

ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची....

जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms

नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा.....

तिला विचारायचा

"का ग काल तू फोन नाही केला,मी वाट पाहत

होतो तुझ्या फोनची ".

ती त्याला म्हणायची कि, " नाही sorry काल नाही जमल

फोन करायला "....

तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा...

त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा...

रोज त्यांचे फोन आणि sms चालू

राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...

तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms

नाही करायचं...

तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला

करमत

नसे...


ती त्याला sms करायची......त्याचं बोलन वाढू लागल

होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...

किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल

नाही...........


त्याच्या विचारात असताना त्याचे बोलण आठवून

स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत बसायची.

" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "

आता तिला त्याची सवय झाली होती....सतत

त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला

त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या

आवाजात ती आनंदी व्हायची....

हळू हळू ती त्याच पण हि ओळखू लागली होती.... त्याच मूड

कसा आहे ?.. का आहे ?

ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.

तो तिला विचारायचा..."अगं तुला कस कळल कि माझ मूड

खराब आहे ते...?."

ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे....

थोड फार तरी कळू शकत "..

अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्याशिवाय

तिच्या मनात कोणी नसे..


तिला त्याच्याबद्दल सगळ माहित आहे होत....

तो कसा आहे..? त्याचा स्वभाव कसा आहे..?

त्याच दिनक्रमच तिला माहित झाल

होत..


तो कधी जेवतो....

घरी किती वेळ असतो...

 मित्रान बरोबर किती वेळ असतो...

कधी झोपतो कधी उठतो..

तिला हि वाटत होत कि तो तिच्यावर प्रेम करत आहे.....

पण तस काही नव्हते,असच एकदा तिने त्याला फोन केला....दोघांच्या पण

गप्पा छान रंगल्या होत्या,आता तिला त्याच्या मनातल जाणून घ्यायचं होत....


पण काही केल्या तिला ते जमत नव्हते...

मग त्यानेच तिला विचारले " तू लग्न कधी करतेस ?".त्यावर ती

चटकन त्याला म्हणाली..." छे ! एवढ्यात लवकर

नाही अजून वेळ आहे बघू "....मग

तीने त्याला विचारलं " तू कधी करतोस

लग्न"..तो तीला म्हणाला " मी लग्न

करणार नाही. मी एकटाच बरा आहे..".ती खूप दुखी होते...


काही क्षण तिला काहीच

सुचत नाही..हा असा का बोलत आहे..पण

स्वतःला सावरून ... ती परत त्याला

विचारते... " तू असा का बोलत आहे ....

तुझ्या आयुष्यात काही घडल आहे

का?"..तो अपसेट होऊन तिला म्हणतो " होय ,

आणि आता मला कोणीच नको मी एकटाच

बरा आहे खूप सुखी आहे ".त्याच्या आयुष्यात खूप काही घडल

आहे असे तिला वाटू लागल..

मग ते दोघे तो विषय बदलून दुसर्या विषयावर बोलू लागतात ...

आणि ती त्याच कोमजलेला चेहरा फुलवते...

" सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला!

रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला ?"

तिचा हा स्वभाव त्याला खूप आवडत... तो नकळत

तिला बोलून जातो. "तू खूप चांगली आहेस... तुझ चांगलच

होईल..."

पण ती मनातल्या मनात म्हणत असे..... माझे चांगले होईल

पण जेव्हा तू माझ्या सोबत असशील"

करण ती त्याला दुखी पाहू शकत नव्हती .....

त्याला कलाल नव्हत कि ती निष्पाप त्याच्यावर प्रेम

करायची

तिच्या मनात एक अशा होती कधी तरी तो तिचा विचार

करेल

कधी तरी त्यला तिच्या भावना समजतील.. तिला नेहमी

वाटायचं

आज न उद्या त्याला माझ प्रेम केलले आणि मी माझ प्रेम व्यक्त

करेल.

असेच २-३ वर्ष निघून जातात ती अजूनही त्याला तशीच call -

sms करत होती.....


तो मुलगा हि काही बोलला नव्हता.

ती त्याची वाट पाहत होती,तिच्या मनात कुठेतरी आशा

होती.

कि तो पण तिच्यावर प्रेम करेल

गणेशउस्तव चलू होते.. ७ दिवसाचे बाप्पा त्याच्या गावी

निघाले होते..

ती आनंदात गणपती विसर्जनाला निघाली होती....


तिच्या सेल वर सारखे call येत होते....

समुद्रावर पोहचल्यावर परत तिला एक call आला

तिने तो call receive केला पलीकडून,


 "असल कसलं तुझ आंधळ प्रेम

तू फसलीस तुला फसवल "

ती पूर्णपने घाबरली होती "का काय झाल"

"अग तू ज्याच्यावर प्रेम करतेस तो married आहे...."


तिच्या

पायाखालची जमीनच सरकते ती स्तब्ध होते.....


एका आडोश्याला होताना तिच्या पायात काच रुतली

पायातून रक्त वाहत होत तिला माहितच पडल नाही...

ती तशी स्तब्ध बसत.. तेवढ्यात तिचे frnds आणि आई शोधात

येतात..

तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते "अग पायात काच

गेली आहे आणि तुझ लक्ष कुठेय


"आई मग पायातून काच काढते

पण तीच हृदय त्या काचे प्रमाणेच तुटल होत

तशीच जाऊन ती समुद्रात बसते कोणाला डोळ्यातले अश्रू

दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते

त्या रात्री तिला झोप लागली नाही...


दुसर्या दिवशी ती त्याला call करते डोळ्यातले अश्रू गिळून ती

त्याला बोलते....


"ह्या पुढे मला कोणत्या हि प्रकारचा contact

करू नकोस"

तो पार गोंधळून गेला होता हि अचानक अशी काय बोलते

म्हणून

"अग काय झाल " ती " तू खूप काही गोष्टी माझ्यापासून

लपवल्या आहेस"

त्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळतो परत ती त्याला

बोलते " तुला माहित आहे का मी तुझ्यावर किती प्रेम करते" तो

म्हणतो "

हो मला माहित आहे " ती shock होते "काय"

तो " हो मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतेस आणि मी हि

तुझ्यावर प्रेम करतो.....


पण ते कधी पूर्ण होऊ शकत नाही आणि कधी व्यक्त हि ...

मला तुला फसवायचं नव्हत आणि मला तसे करता हि आले असते

पण म्हणून मी तुला काही बोललो नाही मी पण तुझ्यावर खर

प्रेम केल

मला हि तुला बोलायचं होत पण मी घाबरत होतो कि

कदाचित हे सगळ समजल्या नंतर

तू माझी मैत्री हि तोडशील म्हणून मी तुला काही बोलत

नव्हतो

मला निदान तुझ्याशी निव्वळ मैत्री तरी ठेवायची होती...


मी तुला कधी मिळवू शकत नव्हतो पण मला तुला गमवायच पण नव्हत म्हणून मी गप्प होतो.

नशीब पण कसे आहे बघ न जेव्हा वेळ होत तेव्हा माझ्यासोबत

प्रेम नव्हत आणि जेव्हा प्रेम आहे तेव्हा माझ्यासोबत वेळ नाही

पण मी देवाकडे एकाच प्रथांना करतो तुझा पुढचा जन्म फक्त

माझ्यासाठी असू दे" आणि तो शांत होतो

तिला हसावे कि रडावे तेच काळात नव्हते शेवटी ती त्यला

बोलते


" आज मी हारून पण जिंकली आहे "


आणि call ठेवते आज हि ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात फरक एवढाच कि ते प्रेम

फक्त त्यांच्यास्वतः पुरत असत.....


तिने आता त्याला call - sms कारण सोडलं आहे..


पण तो महिन्यातून पंधरादिवसातून १-२ call करून तिची विचारपूस

करतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy