प्रिय स्वतंत्र भारता
प्रिय स्वतंत्र भारता
प्रिय स्वतंत्र भारता,
तुला स्वतंत्र होऊन कित्येक वर्षे उलटली के आत्ता
तुझ्या स्वतंत्र चळवळीत "ति" एक भाग होतीच की...
पण,सर्वांना स्वतंत्र बहाल करतांना "ति" स्वतंत्रे पासन वंचितच राहीली ,
आजही मग, तुच सांग "ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा ?
इथली जाती व्यवस्था निस्तारली म्हणतात आत्ता...
पण, सामाजिक व्यवस्थेत " ति" सर्वात खालच्या स्तरात होती रे...
याचा सर्वानाच विसर पडलाय जणु...
मग, आत्ता तिने याचा शोक व्यक्त करायचा
की, तिची स्वतंत्र चळवळ मरकुटीला गेली या तगमग तिने जगायचं...
तूच सांग ना , तुझ्या या पुरूष प्रधान संस्कृतीचीशपथ घेऊन सांग,
"ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ?
समानेता हक्क मिळायला रे आत्ता,,,
यातूनच तर ,"ति "सुजाण झाली...
डॅा., वकील, नोकरदार, अधिकारी, अगदी राष्ट्रपति ही झाली
आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून तूझ्या रक्षणार्थ सज्ज झाली.
" ति"ने प्रत्येक बाजूने सिध्द केलाय स्वत:ला!
पण, यातही तिला मोकळा श्वास होता कुठे...
इथल्या विचारीक विवंचनेत जगणाऱ्या सार्यांनी,
"आम्ही सवड दिली, म्हणून तू"! असा ठसा लावून सोडलय रे तिला...
मग, तुझ्या त्या विवंचीत समाजाचा दाखला देऊन सांग,
" ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ?
तुझ्या त्या निर्जीव सिमा रेषांच्या रक्षणार्थ खूप हळवी होतात ना रे सगळे.
त्यासाठी तर, सैनिक बळ, प्रशासन, अत्याधुनिक तंत्रज्ञान सदा सर्वच...
पण, तिच्या बाबतित एवढे कुणी हळवी नसत बाबा !
आणि, अस्सतच तस्स तर, "ति"
कधी, अशी जन्माच्या आत ति मारली गेली असती का ?
कधी, घरातच संस्कृती च्या नावावर गाडली गेली असती का ?
मग आत्ता, तुझ्या रक्षणार्थ झडलेल्या प्रत्येक कणांचा उदो-उदो करून सांग
"ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ?
प्रिय, स्वतंत्र भारता,
एकदा तरी "ति" च्याकडे डोळसपणे बग जरा...
कुठे, तुझ्या स्वतंत्र उत्सवाच्या आनंदात तिने तिच्या
अ स्वातंत्र्याचा व्यभिचार अंतर्भूत तर, केला नाही ना...
अरे... आत्ता तरी प्रिय स्वतंत्र भारता
बोल ना, थोडासा यावरही.
"ति"ने हा स्वतंत्र उत्सव कसा साजरा करायचा ?
