STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy

3  

Sanjay Ronghe

Tragedy

" कसली ही लढाई "

" कसली ही लढाई "

1 min
218

अस्त्र नको, शस्त्र नको

कशी ही लढाई ।

पैशाच्या बळावर

मारायची नुसती बढाई ।

निर्बल बघून सारे   

करतात मग चढाई ।

निरपराधी जातात बळी

म्हणे कोण कुणाचा भाई ।

नाव किती गाव किती

वाळत नाही शाई । 

खबरे मागून खबर येते

जातो जीव त्राही ।

विचारांना थारा कुठे

सारे उचलतात बाही ।

रक्त गळते डोळ्यावाटे

पुसायला कोणी नाही ।

मनातच उठतात ज्वाला

होते लाही लाही । 

दूर निपचित पडले प्रेत

बघते दिशा दाही ।

हरलो जिंकलो वाद कुठला

मी जगतो शाही ।

सांगू नका वरचढ कोण

कोण कुणाला पाही ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy