Sachin Arun Londhe

Horror

3.8  

Sachin Arun Londhe

Horror

रांजणावरची हडळ

रांजणावरची हडळ

15 mins
2.8K


(ही कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनाचा भाग आहे. यातील पात्र व जागा काल्पनिक आहे.)

 

उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुकत्याच सुरू झाल्या होत्या. अजय आपल्या मित्रांन सोबत खेळून धावतंच घरात आला. अजय चे वडिल (अनिल) इतक्यातच कामा वरून येऊन चहा पित बसले होते. अजय धावतच त्यांच्याकडे आला. बाबा, "आज क्रिकेट खेळताना खूप मज्जा आली "."मी नाॅट आऊट पन्नास रन्स केले. "अरे वा ! म्हणजे माझा मुलगा 'सचिन ' होणार". तेवढ्यात किचन मधून अजय ची आई रमा पोहे घेऊन आली. अजय हळूच आईच्या कानात पुटपुटतो "आई विचार ना बाबांना आपण कधी जायचं"? हो.. हो..विचारते..थांब जरा. अनिल चहाचा घोट घेत..हम्म.. रमा , काय विचारायच बोलतोय अजय? कही नाही हो, नेहमीचाच प्रश्न आपण आपल्या गावी पिसोट्याला कधी जाणार? ह्या सुट्ट्यांमधे तरी घेऊन चला म्हणून मागे लागलाय. अनिल अजयला जवळ घेतो, "हे बघ अजय मी सुट्टी साठी अॅप्लीकेशन दिलंय, मंजूर झाली कि नक्की जाऊ". "बाबा तुम्ही दरवर्षी हेच सांगता, आणि मला घेऊन जात नाही". अजय रागात त्याच्या रूम मधे निघून जातो.


रमा, "याला कसं सांगू आपण का जात नाही ते". "पण मी काय म्हणते ज्या गोष्टीला इतके वर्ष झाले त्या साठी आपण गावी न जाणं हे मला काय पटत नाही". "कदाचित अफवा असू शकते किंवा आपल्याला घरा पासून दूर ठेवण्यासाठी तर हे कटकारस्थान नसेल ना? आणि तसं पण या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही". "अग हो पण आई बाबा वारल्या पासून आपण गावी गेलोच नाही आणि तसही पिसोट्याला जाऊन काय करायचे आणि जर त्या गोष्टी खर्या असतील तर"? ."मला वाटते जो पर्यन्त अपण तिथे जात नाही आपल्याला खरं काय ते समजणार नाही"." तुम्ही या वेळेस माझ्या साठी गावी जाण्याचा प्लॅन करा".


अनिल थोडा विचारात पडतो आणि दिर्घ श्वास घेत म्हणतो " ठिक आहे करूया प्लॅन ".

दुसऱ्या दिवशी अनिल ऑफिसमधे गावी जाण्यासाठी वीस दिवसाची रजा टाकतो. घरी येताच अनिल हि बातमी अजयला आणि रमाला सांगतो. दोघे खूप खुश होतात आणि जाण्याच्या तयारीला लागतात. रविवारी सकाळची सात ची गाडी असल्यामुळे रमा आदल्या रात्रीच सर्व तयारी करून ठेवते आणि सकाळी पाच चा अलार्म लावून झोपी जाते.सकाळी ठरल्याप्रमाणे तिघे एसटी स्टॅंडवर पोहोचतात.


"रमा तुम्ही इथे थांबा मी गाडीची इनक्वायरी करून येतो". तसा अनिल इनक्वायरी काउंटरच्या दिशेने निघुन जातो आणि पाच मिनिटांनी परत येतो. " अगं, गाडी थोड्याच वेळेत तीन नंबर वर येणार आहे , चल पटकन आपण तिथे जाऊ". तसे दोघे बॅग उचलतात आणि निघतात. अजय सर्व खुप उत्सुकतेनं पाहत असतो आणि तोही आई बाबांच्या सोबत तीन नंबरच्या दिशेने धावू लागतो. अजय पहिल्यांदाच पिसोट्याला निघाला होता आणि ती उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


अचानक कर्कश आवाजात अनाउन्समेंट होते." पिसोट्याला जाणारी गाडी तीन नंबरवर आलेली आहे तरी प्रवाशांनी चढून घ्यावे". अजय, अनिल आणि रमा तिघेही गाडी मध्ये बसतात. आता गाडी पिसोट्याच्या मार्गाला लागते. अजय खिडकी मध्ये बसून पळणारी झाडं, शेत, कौलारु घरं बघण्यात दंग होऊन जातो. पण दुसरीकडे अनिलच्या चेहर्यावर एक वेगळीच चिंता दिसत होती. तो स्वतः शीच बोलत होता." पिसोट्याला जाऊन आपण चुकी तर करत नाही ना? आणि जे ऐकलंय ते खरे तर नसेल ना"?. असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घोंघावत राहतात. रमाला त्याच्या चेहर्यावरची चिंता जाणवते. ती त्याचा हात हातात घेते आणि बोलते." काळजी करू नकोस सर्व ठिक होईल". आपण खूप एन्जाॅय करू आणि बघ अजय पण किती खूश दिसतोय". गाडी आता वेगाने पिसोट्याच्या दिशेने धावू लागते. थंडगार वारा, हिरवेगार शेत, कौलारू घरं पाहत अजय आणि रमाचा कधी डोळा लागतो हे त्यानाच समजत नाही. अनिल मात्र अजूनही त्याच विचारात गुंतलेला असतो. काही तासां नंतर अनिल च्या आवाजाने रमाला जाग येते. " रमा ए रमा उठ अगं आलं आपल गाव". रमा गोंधळून उठते आणी अजय ला जागं करते आणि तिघेही गाडीतुन खाली उतरतात. एस.टी त्यांना वेशीवर सोडून निघून जाते. अनिल आणि रमा बॅग उचलतात आणि घराकडे निघतात. अजय आता जास्तच खुश दिसत होता. "बाबा, कुठे आहे आपल घर?" "अरे.. आता तर आपण वेशीवर आहोत अजून इथून दोन किलोमीटर अंतरावर आपली वस्ती आहे".


तिथून तिघेही रस्ता ओलांडून गावाच्या दिशेने चालू लागतात. आजुबाजुला घनदाट झाडी आणि त्यातून जाणारी कच्ची वाट. जस जस ते आत जातात तसे तसे झाडी दाट होत जातात. त्या मधेच पक्षांचा आवाज कानावर पडत होता. थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्शुन शहारे आणत होती. एका वळणावर झाडांच्या आत एक पडकं घर अजय च्या नजरेस पडतं त्या पडक्या घराच्या खिडकी मधून कोणीतरी आपल्या कडे पहातय असा भास त्याला होतो. अजय हळूच आईचा पदर ओढतो आणि बोटाने त्या घराकडे इशारा करतो. रमा ची नजर त्या खिडकी कडे जाती. तिला तिच्याकडे पाहणारी एक विचित्र आकुती दिसते. ती डोळे बारीक करून नीट पाहण्याचा प्रयत्न करते.त्यात तिला दिसतो सुरकुतलेला काळपट चेहरा, पांढरे शुभ्र डोळे, पाढरे विस्कटलेले केस , ते पाहून रमा दचकते आणि अनिल चा हात जोरात पकडते. तसा अनिल तिच्या कडे पाहतो. अनिल ला तीच्या चेहर्यावरची भिती स्पष्ट दिसते. तो तिचा आणि अजय चा हात हातात घेत म्हणतो. " रमा, अजय तिकडं पाहू नका पुढे बघुन चला पटकन".जसे ते पुढे जातात त्या घरातुन मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येऊ लागतो.तसा तिघेही चालण्याचा वेग वाढवतात. थोडं पुढे गेल्यावर अजय घाबरतच विचारतो. " बाबा कोण होते तिकडे? रमाला सुध्दा हाच प्रश्न पडलेला असतो.


"काही वर्षा पूर्वी या घरात एक कुटुंब रहायचं सदाभाऊंच त्यात त्याची बायको, मुलगा आणि सून. पण नेहमी होणार्या भाडणाला कंटाळून त्याचा मुलगा आई वडिलांना सोडून शहरात गेला. त्याची आई गेली तरी तिच्या अंत्यदर्शनासाठी सुध्दा आला नाही. एकट्या पडलेल्या सदाभाऊच्या डोक्यावर परिणाम झाला. तेव्हा पासून ते गावात वेड्यासारखं फिरत आणि त्या घरात त्याच्या बायको सोबत राहत त्याला अजूनही वाटतय त्याची बायको तिथेच आहे." अजय आईचा हात घट्ट पकडतो. अता तिघेही घराच्या दिशेने पटपट चालू लागतात. समोरच त्यांना गावचं मंदिर दिसू लागते. " बाबा, ते मंदिर कसलं आहे हो?" बाळा ते आपल्या ग्रामदेवत भैरवनाथाचं मंदिर आहे". "आपण दर्शन घेऊन पुढे जाऊ".अजय ने अनिल च्या कडेवर चढून मंदिराची घंटा वाजवली आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरात प्रवेश करताच अनिल ला थोडं प्रसन्न वाटलं. तिघांनी हात जोडले आणि देवाला नमस्कार केला. मंदिरातील पुजार्याने अनिल कडे पाहिले आणि दचकून म्हणाला " अरे अनिल तु का आलास"? "झालेल्या गोष्टी तुला माहितच आहे तरी तु आलास"."हे देवा रक्षण कर यांचं ". असे बोलुन पुजारी तेथून निघून जातो. " बाबा ते पुजारी काका असे का बोलले". अनिल अजय च्या प्रश्नाला टळतो. " काही नाही रे.. तु लक्ष नको देऊ त्यांच्या बोलण्याकडे". आता तिघेही दर्शन घेऊन घराकडे निघतात . एक अरुंद रस्ता आणि आजुबाजुला थोड्या थोड्या अंतरावरची घरं अजय दंग होऊन पाहत होता. पिसोटं गाव तसं खुप छोटं आणि तेथील लोकसंख्या सुध्दा जास्त नव्हती. बहुतेक जन कामा धंद्यासाठी शहरात गेलेला. अनिल अजूनही पुजारी काका च्या बोलण्याचा विचार करत होता.


रमा एका जुन्या घरा कडे बोट दाखवून बोलते. "ते बघ अजय आपलं घर". अजय खुप खूश होतो आणि घराच्या दिशेने धावू लागतो. अनिल पटकन त्याचा हात पकडतो. "सावकाश बाळा, धावू नकोस रस्ता कच्चा आहे पडशिल तु". अजय खूप उत्साहाने घरा कडे बघू लागतो. जुन्या पध्दतीचं कौलारु घरा. मातीच्या भिंती, आणि घरा समोर मोठा वरांडा आणि त्याच्या बाजूला एक छोटी अडगळीची खोली आणि त्याच्याच समोर एक मोठा रांजण पण आता त्या मधे खुप माती आणि त्यात झाडं उगवली होती. त्या रांजणा कडे पाहून रमा ला अस्वस्थ वाटू लागते. ती लगेच आपली नजर घरावर टाकते. " अनिल आधी सर्व घर साफ कराव लागेल ,आपण अजयला शेजारच्या जाधवांच्या घरी ठेवू आणि साफसफाई झाली कि आणू त्याला" . " हो रमा ठिक आहे. हे घे चावी तु दार उघड मी त्याला सोडून येतो". अनिल च्या घरापासून जाधवांच घर थोड्याच अंतरावर होते. जसे दोघे घरा जवळ पोहचतात तेव्हा जाधव ताई घर सारवताना त्यांना दिसतात. अजय बाबानां हळूच विचारतो. "बाबा त्या काकू काय करत आहेत". " ते शेणाने घरा सारवत आहे". अजय ला ते सर्व विचित्र वाटतं कारण या आधी त्याने हे कधीच पाहिले नव्हते.


"नमस्कार जाधव वहिनी, कशे आहात? आणि जाधव कुठे दिसत नाही". तशी ती ताडकन उठती आणि पाण्यात हात बुचकळती आणि आपल्या पदराला हात पुसत म्हणते." आहो अनिल भाऊजी तुम्ही कधी आलात. या आता मध्ये बसा मी पाणी आणते तुमच्या साठी." अनिल आणि अजय घरात जातात आणि खाली जमिनीवर बसतात. जाधव ताई पाणी घेऊन येतात. " आहो हे गेलेत शेतात झाडांना पाणी द्यायला येतील इतक्यात". " पण तुम्ही इतक्या वर्षांनी कसं येणं केलत". अनिल पाण्याचा घोट घेत. "अजय दरवर्षी गावी जाण्यासाठी हट्ट करायचा ह्या वर्षी म्हटलं चला जावून यावं". " आणि वहिनी घरात खुपच घाण आहे तर मी आणि रमा ते साफ करुन घेतो तर तो पर्यंत अजय ला इथे ठेवू का"?. जाधव ताई अजय ला जवळ घेत म्हणाली. "यात काय विचरायचं आपलंच घर आहे". "राहु द्या त्याला इथे तुमचं झालं कि न्हया". "पण भाऊजी एक विचारु क"?. " हो वहिनी विचाराना". " तुम्हाला घडलेल्या घटना तर माहीत आहेत, तरी तुम्ही का आलात"? "आता आलाच आहात तर जरा काळजी घ्या". अजय ला काहीच समजत नाही कि हे सगळे असं का बोलत आहेत. "बाबा ते मंदिरातील पुजारी काका आणि आता या काकु असे का बोलत आहेत". अनिल पुन्हा अजय च्या प्रश्नाला टाळतो. आणि त्याला समजवतो. " हे बघ अजय काकुंना त्रास द्यायचा नाही मी आणि तुझी मम्मा घर आवरतो आणि झालं कि तुला घ्यायला येतो". "तोपर्यंत नो मस्ती". अनिल अजयला सोडून निघून जातो.


"रमा दार उघडून आत मधला कचरा झाडू ने काढत असताना अचानक कौलांच्या आतुन मोठा साप तिच्या समोर पडतो. तशी ती दचकून ओरडत बाहेर पडती आणि अनिल ला गच्च मिठी मारते. ती इतकी घाबरते कि तिला काही सुचतच नाही. अनिल तिला शांत करत विचारतो. " रमा अग घाबरू नकोस मी आहे ना इथे.. शांत हो आधी आणि काय झालं ते सांग". रमा अडकत अडकत बोलते." अ..अअ अनिल आत मी एक मोठा साप पाहिला आणि आपल्या माळ्यावरुन तो खाली पडला". अनिल तिला शांत करतो आणि घरामध्ये डोकावतो. " रमा तु इथेच बैस मी आत जाऊन बघतो". अनिल हाता मधे काठी घेऊन आत शिरतो. आत खुप शोधूनही त्याला काहीच सापडत नाही. "अग मी सगळीकडे पाहिले पण काहीच नव्हतं. " कदाचित तुला भास झाला असेल ". रमा चं अनिल च्या बोलण्या कडे लक्षच नसतं. ति एकटक रांजणाकडे पाहत बसलेली अनिल ला दिसते. तो तिच्या जवळ जातो आणि खांद्यावर हात ठेवत म्हणतो. " रमा ए रमा अग मी तुझ्याशी बोलतोय लक्ष कुठे आहे तुझ". तशी तिची नजर अनिल कडे वळती आणि भानावर येती. "काय म्हणालात तुम्ही"." अग मी सगळीकडे पाहिले काहीच नव्हतं तिथे ". " चल पटकन आवरून घेऊ अंधार पडायच्या आधी ". रमा भानावर येते आणि दोघं घर साफ करायला घेतात.


आता घर आवरून अनिल अजय ला आणायला निघून जातो. रमा आता जेवण बनवायला सुरुवात करते. अनिल आणि अजय घरी परतात. अजय पहिल्यांदाच आपलं गावचं घर पाहत होता. तो बराच वेळ घर न्याहळत बसतो. आता हळूहळू अंधार पडू लागतो. तिघेही जेवन करुन वरंड्यात येउन बसतात . बाहेर छान थंडगार हवेमधे रमा चा क्षीण क्षणार्धात गायब होतो. अजय आईच्या मांडीवर डोकं ठेवून आकाशातले तारे पाहण्यात दंग होऊन जातो आणि तिथेच झोपी जातो. " रमा मी बिछाना घेऊन येतो आज आपण बाहेरच झोपू". रमा ला अनिल ची कल्पना खुप आवडते. अनिल घरातून बिछाना घेऊन येतो आणि बिछाना टाकतो. अनिल अजय ला उचलून बिछान्यावर टाकतो. रमा आणि अनिलही बिछान्यावर पडुन आकाशात तारे बघण्यात मग्न होऊन जातात. शहरात अस मोकळं आकाश कधी दिसतच नाही. थोड्याच वेळात दोघेही झोपी जातात. मध्यरात्री अनिला कसल्यातरी आवाजाने जाग येते. पण तो तसाच डोळे झाकून पडून राहतो. तो नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्याला त्याच्या आजुबाजुला कुणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. कोणी तरी त्यांच्या भोवती गोल गोल फिरत आहे असे जाणवते. काही क्षणा नंतर त्याला त्याच्या कानाजवळ जोरजोरात श्वासोच्छ्वास घेत असल्याचे जाणवते. अनिल अजूनही डोळे झाकून शांतपणे त्या हालचाली ऐकत पडून राहतो. नक्की काय करायचे हे त्याला समजत नव्हते. आता तो डोळे उघडायचे असं ठरवतो आणि तेवढ्यात चालण्याचा आवाज बंद होतो. अनिल आता हळूहळू आपले डोळे उघडतो आणि आजुबाजुला पहायला लागतो. अंधार खूप असल्यामुळे त्याला काही दिसत नाही. अजय अता उठून बसतो.


अचानक त्याची नजर रांजणावर पडते आणि त्या वर त्याला कोणीतरी बसल्याचा भास होतो. एक काळी आकृती, लांबसडक केस आणि त्या केसांन मधून दिसणारे लालभडक डोळे. अनिल घाबरुन आपली नजर फिरवतो आणि रमा कडे पाहतो, ती गाढ झोपेत होती. त्याला समजत नाही काय करायचे ते. अचानक त्याला रमा चा आवाज ऐकू येतो. पण तो बघतो रमा तर झोपली आहे. मग हा आवाज कोणाचा. "अनिल ए अनिल...उठ आठ वाजलेत". "अजून किती वेळ झोपणार". अनिल खडबडून जागा होतो आणि रमा कडे पाहतो. रमा ला त्याच्या चेहर्यावरची भिती स्पष्ट दिसते. "अरे इतक घाबरायला काय झालं ?". अनिल शांत होतो आणि रांजनाकडे पाहतो. " काही नाही ग थोडं विचित्र स्वप्न पडलं". अजय तेवढ्यात घरातून बाहेर येतो. " बाबा उठलात तुम्ही? आणि आज कुठं फिरायला जायचं? ". "हो..हो जरा आवरु दे मला मग जाऊ आपण डोंगरा वरच्या मंदिरात". अजय खुप खुश होतो आणि आवरायला लागतो. अनिल आणि अजय दोघेही सर्व आवरुन डोंगराच्या दिशेने निघतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे त्याना विहीर दिसते आणि अजय अनिल ला बोलतो. "बाबा चलाना आपण विहीरी मधलं पाणी बघू". अनिल अजय च्या हट्टासाठी तयार होतो. विहिरी च्या जवळ जाता जाता अनिल ला अस्वस्थ वाटू लागते.


आता दोघेही विहिरीत डोकावतात. विहिरी अर्धी भरलेली होती. आत डोकावताच अनिल ला पाण्यात एक बाईचा म्रुतदेह तरंगताना दिसतो. ते पाहून अनिल घामाघुम होतो आणि अजय ला धरून घराच्या दिशेने धावू लागतो. अजय ला काहीच समजत नाही आणि न राहवून तो विचारतो" बाबा आपण का धावतोय?". अनिल काही न बोलता तसाच धावत सुटतो. अनिल जसा घरी पोहोचतो रमा त्याला तशा अवस्थेत पाहून घाबरते. "अनिल काय झालं तुला? इतका का घाबरलाय "?. अनिल काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. रमा त्याला शांत करते आणि पाणी देते. अनिल घटाघटा पाणी पितो आणि डोळे झाकून बसतो. रमा अजय ला विचारते. " अजय काय झालं बाबांना?". "तुम्ही डोंगरावर जाणार होता ना?" . " हो आई पण त्या विहिरी कडे जेव्हा आम्ही गेलो आणि बाबांनी विहीरी मधे पाहिल्या नंतर ते धावत सुटले, मला समजलंच नाही काय पाहिले त्यानी". अनिल थोडा शांत झाला होता तो अजय ला बाहेर खेळायला पाठवतो. अनिल आता रमा ला सांगायला सुरुवात करतो. " रमा मला वाटतं आपण परत आपल्या घरी जावं". "मला इथे विचित्र आणि अस्वस्थ वाटू लागले आहे". "पण अनिल असं झालं तरी काय?".


"अगं आम्ही त्या विहिरी कडे जेव्हा गेलो तर त्यात मला एका बाईचं प्रेत दिसलं ते पाहून मी अजय ला घेऊन लगेच पळत सुटलो". " मला वाटतं काही होण्या आधी आपण लगेच इथून जाउया". रमा अनिल ला जवळ घेते आणि समजावते. "अरे असं कसं होऊ शकतं आणि गावातले सगळे तेथूनच पाणी भरतात पण असे काही असते तर सकाळीच सगळ्यांना समजले असतं". "तुला कदाचित भास झाला असेल". अनिल ने पाहिलेले ते द्रुश्य अजूनही त्याच्या डोळ्यासमोरुन जात नव्हतं. " रमा मला काल पासून हेच वाटतय की आपण इथे नव्हते यायला पाहिजे ". रमा त्याला समजवते आणि आराम करायला सांगते. काही तासांनंतर अनिल ची झोप उघडते. रमा त्याला म्हणते. " उठलास..कसं वाटतंय आता. " हो जरा बरं वाटतं आहे आता". " जा फ्रेश होऊन घे मी चहा टाकते" . अनिल आणि रमा वरांड्यात संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात चहा पित बसतात आणि अजय मात्र वरांड्यात खेळण्यात मग्न झाला होता. "अनिल आपण ती आडगळीची खोली आणि ते रांजन साफ करून घ्यायचे का?". " नको रमा त्यात अजूनही त्यांच्या वस्तू आहेत". " आहे तसच राहू दे उगाच आपल्या मागे काही नको आणि तुही ती खोली उघडू नको". दोघेही बोलता बोलता घरात जातात. अनिल थोड्या वेळाने बाहेर येतो तर त्याला अजय कुठेच दिसत नाही. तो जोरात रमाला आवाज देतो. " रमा ए रमा! बाहेर ये पटकन अजय कुठं दिसत नाहीये". रमा हातातलं काम टाकून धावतच बाहेर येते. " काय हो, कुठे गेला अजय? " अग इथेच खेळत होता आणि आता कुठं दिसत नाही ".दोघेही आजुबाजुला खुप शोधतात पण अजय कुठेच दिसत नाही. जाधव ताई पण त्यांना शोधायला मदत करते. पण अता अंधार वाढत चालला होता तशी अनिल ची चिंता सुध्दा वाढत चालली होती. रमाचं रडून रडून हाल बेजार झालं होतं. " अनिल कुठे गेला असेल रे आपला अजय?".


अनिललाही सुचत नव्हतं कुठे शोधायचे अजय ला. त्याने संपूर्ण गाव शोधून काढलं होतं. अजय कुठे गेला असेल? तो सुखरूप तर असेल ना? असे अनेक प्रश्न रमाच्या डोक्यात गोंधळ घालत होते. आता दोघेही घराबाहेर बसून अजय ची वाट पाहू लागले. अता मध्यरात्र झाली होती दोघेजण बसल्या ठिकाणी झोपी गेले होते. अशावेळेस अजय च्या रडण्याच्या आवाजाने रमाला जाग येते. ती अनिल ला जाग॔ करती. दोघांना अजय च्या रडण्याचा आवाज ऐकू येतो पण अजय कुठेच दिसत नाही. ते नीट कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतात. तो आवाज अडगळीच्या खोलीतून येत असल्याचे त्यांना जाणवते. अनिल खोलीच्या दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करतो. त्याला आत मध्ये कसली तरी कुजबूज ऐकू येते पण स्पष्ट काय बोलत आहे ते त्याला समजत नाही. अनिल आणि रमा त्या विचित्र आवाजाने आणखीनच भिती वाटते. रमा म्हणते" अनिल दरवाजा तर बाहेरून बंद आहे. मग अजय चा आवाज आतून कसं काय येतोय ". अनिल रमाला बोलतो " तू आत जा आणि या खोलीची किल्ली घेऊन ये". रमा आत जाते आणि किल्ली घेऊन येते. अनिल अजूनही दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. अता त्याला आतमधली कुजबूज स्पष्ट ऐकू येऊ लागते. त्याला एका बाईचं आणि अजयचं बोलणं ऐकू येते. " अमर बाळा तू आता मला सोडून जायचं नाही आणि माझ्या सोबत इथेच रहायच". " खुप वर्षानं पासून तुझी वाट पाहतेय." आता कोणीही तुला माझ्या पासून दूर करू शकणार नाही".


अनिल रमाच्या हातून किल्ली घेतो आणि दार ऊघडतो आणि दार उघडताच आतून येणारा आवाज बंद होतो. आत मधे लाईट नसल्यामुळे त्यांना काहीच स्पष्ट दिसत नाही. अनिल आत जाऊन पाहतो त्याला अजय जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत दिसतो.तो त्याला उचलतो आणि वरांड्यात घेऊन येतो. रमा आणि अनिल ला अजय ची परिस्थिती बघवत नाही.रमा त्याला कुशीत घेऊन रडू लागते. अनिल तिला शांत करतो आणि झोपायला सांगतो. पण दोघांनाही झालेल्या गोष्टीमुळे झोप लागत नाही." रमा .. मला अजूनही समजत नाही की अजय आत गेला कसा! आणि जो आत मधे त्या बाईचा आवाज !पण आतमध्ये कुणीच नाही आणि ती बाई अजय ला अमर का बोलत होती. " अनिल जसा रमा कडे पाहतो. तर ती तिथे नसते. अजय त्याला जमिनीवर पडलेला दिसतो. आणि अचानक तो त्या खोली कडे पाहतो.रांजनावर बसलेली रमा त्याला एका वेगळ्याच अवतारात त्याला दिसते. केसं सोडलेली, रक्ताळलेले डोळे, चेहर्यावर राग असं भयानक रूप त्याच्या समोर होतं. अनिल जोरात ओरडतो.."कोण आहेस तुझ्या?". आणि का आमच्या मागे लागली आहे.?

ती अनिल कडे पाहून जोरा जोरात हासु लागते.." हा..हा..हा . मी मंदा काही वर्षांपूर्वी या गावात मी , माझा मुलगा अमर आणि नवरा रहायला आलोत. माझी आणि माझ्या सासरकडच्याची नेहमी भांडण होत. त्यांना वाटायचं माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. म्हणून आम्ही इथे या गावात आलो. या खोलीत भाडेकरू म्हणून राहत होतो. या घरचे आजी, आजोबा वारल्या नंतरही आम्ही इथेच होतो." काही महिन्यांनंतर माझा नवरा सुध्दा मला वेडं समजायला लागला आणि कदाचित ते खरं सुध्दा होतं." ऐके दिवशी तो बाजारात जातो म्हणून माझ्या अमरला घेऊन गेला तर तो परत आलाच नाही. मी खुप दिवस त्याची वाट पाहिली पण तो आला नाही. रोज या रांजणावर बसून मी त्यांची वाट बघत बसायचे".


एक दिवस मी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेले तेव्हा अमर मला विहिरीच्या पायरीवर बसलेला दिसला आणि वर येताना त्यांचा पाय घसरून पडला. मीही उडी मारली. दोन दिवसा नंतर माझं प्रेत पाण्यावर आलं." माझा अमर कधी येईल ह्याचीच मी वाट पाहत होती आणि आज तो आला. आता त्याला माझ्या पासून कुणीच दूर नेऊ शकणार नाही". येवढं बोलून रमा रांजना वरून खाली पडते अनिल तिला पकडतो आणि मांडीवर तिचं डोक ठेवून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो."रमा ..ए रममा ऊठ गं, बघ अजय बोलतोय तूला ऊठ चल पटकन . आता हळूहळू पहाट व्हायला सुरुवात झाली होती. रमा हळूहळू शुद्धीवर यायला लागते. "अनिल काय झालंत रे मला आणि अजय कुठे आहे आपला." मला त्याच्या कडे घेऊन चल". दोघेही जेव्हा वरांड्यात येतात तेव्हा अजय तिथे नसतो. आता दोघेही अजय च्या नावाने ओरडू लागतात. तेवढ्यात जाधव ताई येते आणि रमा ला बिलगून रडायला सुरुवात करते. अनिल तिला विचारतो वहिनी तुम्ही का रडताय.


ती रडत रडत बोलते..."अजय..अजय विहिरी कडे.. चला पटकन". अनिल आणि रमा ते ऐकताच विहिरीच्या दिशेने धावतात. विहिरीच्या भोवती त्यांना गर्दी दिसते. दोघेही विहिरीमधे पाहतात त्यांना अजयचं प्रेत तरंगताना दिसते. रमा ते पाहून वेडी होते. अनिलला मंदाचे शब्द आठवतात.

"आता अमरला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ शकणार नाही."


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror