ह्याला जीवन ऐसे नाव..
ह्याला जीवन ऐसे नाव..
ह्याला जीवन ऐसे नाव...
प्रदीप आणि नेहा सुखी जोडपं...कोणत्याही गोष्टीची काही कमी नाही...व्यवसाय..रग्गड पैसा...सगळं पायाशी लोळत होत...मन तरीही आयुष्यात एक खंत होती....लग्नाला दहा वर्षे होऊनही नेहा आई होऊ शकली नव्हती...याचीच सल तिच्या मनात कायम होती, तिला छळत होती..लग्नानंतर एक दोन वर्षे छान गेली त्यांनतर मात्र हळूहळू कुजबुज व्हायला लागली.… घरातले बाहेरचे बोलायला लागले...
“आमचं नशीबच फुटकं, आमच्या नशिबात काही नातवाच सुख नाही आहे....आम्हाला असच मरावं लागेल...नातवंडाच तोंडही बघता येणार नाही..” सासूचे टोमणे रोज सुरूच असायचे...
दिवस भराभर सरकत होते, दोघांचेही प्रयत्न सुरू होते..... सगळ्या टेस्ट करून झाल्या..रिपोर्ट नॉर्मल यायची...पण नेहाला काही दिवस गेले नाहीत.
नेहाचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, सगळ्यांच्या टोचून टोचून बोलण्याने नेहा दुःखी राहू लागली, हळूहळू तिच्या तब्बेतीवर परिणाम होऊ लागला...आई होण्याची आशा तिनी सोडली, पण प्रदीपच्या मनात विश्वास होता यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल, प्रदीपने नेहाला कधीच एकट सोडलं नाही..सतत तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला....
एका वर्षानंतर कळलं की , नेहाच्या गर्भाशयात समस्या असल्यामुळे तिला गर्भधारणा होत नाही आहे, आता मात्र नेहा पुरती हरली..पण प्रदीपच्या प्रेमामुळे तीनी स्वतःला सावरलं, ते डॉक्टरांकडे गेले..त्यांच्याशी चर्चा केली त्यांनतर डॉक्टरांनी तिला सरोगसी प्रक्रियेबद्दल सांगितलं...
नेहाला आणि प्रदीपला पटलं पण आता मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे घरी कस सांगायचं त्यांना कस पटवून द्यायचं... तेही काम प्रदीपने केलं त्यानी खूप समंजस पणे आई बाबांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं सांगितलं...आधी त्यांना ते पटलं नाही पण प्रदीपच्या खूप प्रयत्नानंतर ते या गोष्टीला तयार झाले...
नेहानी इंटरनेट वर सरोगसी बद्दल संपूर्ण माहिती वाचली, त्यातून तिला कळले की मेडिकओव्हर फर्टिलिटी मध्ये सरोगसी दिली जाते..
दुसऱ्या दिवशी दोघेही डॉक्टरांकडे गेले...डॉक्टरांशी बोलल्यानंतर दोघांनाही विश्वास वाटला की आता सगळं ठीक होईल, परिस्थिती बदलेल...
डॉक्टरांशी बोलणं झालं, घरचेही तयार झाले पण....
“पण” काही आपल्या आयुष्यातून जात नाही...
आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला...तो म्हणजे एक अशी बाई जी ह्यांच्या बाळाला आपल्या उदरात वाढवेल... नऊ महिने तिच्या पोटात वाढवेल... मग शोधाशोध सुरू झाली...
नेहाच्या घरी कामाला येण्याऱ्या कमलाबाईची गावची विधवा बहीण निर्मला हीच नाव कमलाबाईंनी सुचवलं, कमलाबाई घरच्यासारख्या असल्यामुळे त्यांना घरातल्या सगळ्या गोष्टी महिती असायच्या..
कमलाबाईंनी लगेच निर्मलाला फोन करून इकडे बोलावून घेतले, दुसऱ्या दिवशी सकाळीच निर्मला कमलाबाई सोबत नेहा कडे आली...नेहा आणि प्रदीपने तिला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं...आधी निर्मला नाही म्हणाली,पण कमलानी तिला समजावलं..
“हे बघ निर्मले, तसही तू गावी एकटीच असतेस, ना कोणी समोर ना मागे...लग्न झाल्यावर तुलाही कितीस सुख मिळालं बघ...
हिथ राहशील तर चांगलं राहायला मिळणार, खायला मिळणार आणि नेहाताई तुला महिन्याचे पैसेही देतील...
“पण ताये..
“आता पण नाही की बिन नाही, फटकन हो म्हणून टाक...
तिच्या हो म्हणायच्या आधीच कमला त्या दोघांकडे जाऊन...
“नेहा ताई निर्मली तयार आहे, माझी बहिण थोडी अल्लड आहे पण तुम्ही तिला समजून घ्या...काही चुकलं माकल तर मोठ्या मनाने माफ करा..
तिघेही दवाखान्यात गेले, डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली आणि सरोगसीचा निर्णय ठरला, तारीख ठरवून समोरची संपूर्ण प्रक्रिया करायचं ठरलं...
ठरल्याप्रमाणे निर्मला च्या गर्भाशयाची क्रिया झाली...
समोरचे तीन महिने नेहा आणि प्रदीप नी निर्मलाची खूप काळजी घेतली, सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्या मागे मागे तिला काय हवंय नको ते बघितलं...
हळूहळू दिवस सरकत होते, बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले..
डिलिव्हरी ची वेळ आली, निर्मलाच सिझेरियन झालं...आणि तिनी एका गोंडस बाळाला जन्म दिला...
ते गोंडस आणि निरागस बाळ बघून निर्मलाच्या आनंदाला उधाण आले...तिला आनंदाश्रू अनावर झाले..
पहिल्या दिवशी सगळ्यांनी दवाखाण्यात जाऊन बाळाला गोंजारल...
निर्मलाच्याही डोक्यावरून हात फिरवला... नऊ महिने ती जे आयुष्य जगली ते दिवस न विसारण्यासारखे होते...निर्मलाच्या आयुष्यात पहिल्यांदा...ती अस जीवन जगली..
नर्मदाच मन बदललं,ती मनातल्या मनात विचार करू लागली,
“आता यांना आपण आपलं बाळ सोपवलं तर हे लोक मला इथे राहण्याची परवानगी नाही देणार..मला हे घर सोडून जावं लागेल..मला माझ्या बाळापासून दूर राहावे लागेल..नाही..नाही...मी माझ्या बाळाशिवाय कशी काय राहू शकेल... मी जाते इथून, खूप दूर निघून जाते....
रात्री सगळे झोपले असताना निर्मला बाळाला घेऊन घरून निघाली, अर्ध्या रात्री नेहाला जाग आली, ती निर्मलाच्या खोलीत गेली, तिला तिथे न बघून नेहा जोरात किंचाळली,
प्रदीप...प्रदीप...लवकर ये...
प्रदीप उठून आला
“काय झालं नेहा...
“प्रदीप निर्मला नाही आहे.. ती गेली...ती आपल्या बाळाला घेऊन गेली...नेहा जोरजोरात रडायला लागली..
“नेहा शांत हो, आपण शोधू तिला, जास्त दूर गेली नसणार ती...
“प्रदीप मला माझं बाळ हवंय..मला माझं बाळ हवंय...
“तू थांब मी बाहेर पडतो,बघतो दिसते का...
प्रदीप तिला शोधायला निघाला...त्यानी खूप शोधलं पण निर्मला नाही भेटली..
दुसऱ्या दिवशी नेहमीकडे कमलाबाई कामावर आली तिच्या ध्यानीमनी काहीच नव्हतं..
नेहा आली,
“कमलाबाई, कुठे आहे तुमची बहीण...?.कुठे आहे निर्मला?..
“नेहाताई तुम्ही काय बोलता?...
“निर्मला कुठे आहे?...ती घरातून पळून गेली आहे आणि माझ्या बाळाला पण घेऊन गेली...
“नेहाताई मला तर यातलं काहीच माहीत नाही...
नेहा हताश होऊन खाली बसली आणि ढसाढसा रडू लागली..
“नेहाताई मला माफ करा हो...मला नाही वाटलं निर्मला अस काही करेन म्हणून मी विश्वासाने तिला इकडे घेऊन आली होती..मला माफ करा नेहा ताई....
पुढेही काही दिवस प्रदीपने निर्मलाचा शोध घेतला, पोलीसात तक्रारही नोंदवली पण काहीच उपयोग झाला नाही..
काही दिवस, काही महिने उलटले...नेहाच्या मानसिक आरोग्य ढासळत होते, प्रदीपला सगळं कळत होत, नेहासाठी काहीतरी करावं म्हणून सतत धडपडायचा...
एक दिवस प्रदीप नेहाला अनाथाश्रमात घेऊन गेला...तिथल्या छोटया छोट्या मुलांकडे बघून नेहाच्या चेहऱयावर हास्य उमलल.... पहिल्याच दिवशी प्रदीपला जाणवलं की नेहाला तिथे जाऊन खूप बरं वाटलं...तो अधेमधे तिला घेऊन जायला लागला...नेहामध्ये बराच बदल व्हायला लागला...ती आधी पेक्षा आनंदी राहायला लागली...
प्रदीप आता वेळात वेळ काढून रोज न्यायला लागला...
एक दिवस बोलता बोलता प्रदीप बोलला....
“नेहा ती छोटीशी परी किती क्युट आहे ना, तिच्याशी खेळावसच वाटत...मला तर ती खूप आवडते... तुला कशी वाटते...
“मला पण खूप आवडते...
“नेहा माझ्या मनात एक गोष्ट आहे बोलू का?..
“विचारायचंय काय त्यात..बोल..
“आपण त्या क्युट परीला आपल्या घरी आणायचं..आपल्याकडेच ठेवूया तिला..??.
“प्रदीप माझ्या मनातल बोललास, पण आई बाबा?...
“आता आपण फक्त आपला विचार करायचा?...हम्म..आपण उद्याच आश्रमात बोलून बघूया…
“ठीक आहे...
नेहा आणि प्रदीप ने सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून त्या गोंडस परीला घरी आणलं...
प्रदीपचे आई वडील दुखावले..प्रदीप आणि नेहा वेगळे राहायला गेले ..
तिघेही खूप आनंदात राहू लागले
दोघेही परीचे खूप लाड करायचे, खूप प्रेम करायचे...नेहा तर खूप खुश होती....
परीच्या रुपात त्या दोघांना मुलगी मिळाली आणि परीला आई बाबा...
आता नेहाची फॅमिली पूर्ण झाली..आणि नेहाच मातृत्व पूर्णत्वास आलं..
“दुःख विसरुनी समोर जावे
लपवुनी चेहऱ्यावरचे भाव
समोरच्याला आनंद द्यावे
ह्याला जीवन ऐसे नाव”
समाप्त:
आपल्या समाजात अश्याच कित्येक नेहा आणि कित्येक प्रदीप असतील जे बाळासाठी तडफडत असतील...त्या दोघांचा निर्णय अगदी योग्य होता..
कधी कधी रडत बसण्यापेक्षा आणि आपलं आपलं करत बसण्यापेक्षा परक्यांना आपलं मानलं की त्यातूनही आनंद मिळतो..... आपल्यामुळे कुणाला तरी आनंद मिळतोय ही गोष्ट सुखावून जाते... दुसऱ्यांसाठी जगण्यातही आनंद मिळतो...आनंद देणे आणि आनंद मिळवणे ह्यालाच जीवन ऐसे नाव...
