दोषी कोन? भाग -2
दोषी कोन? भाग -2
पन मानसी आज खूप उदास होती .ती आज खूप वेगळी वागत होती.तीला माझी साथ आवडायची .पन आज ती काही लपवत होती .आम्ही चालत-चालत
थोडे लांब गलो.गुलाबी ठंडीची मजा घेत घरी येतांना सुर्य देवतेचे दर्शन झाले. त्या वेळेस मी मानसीच्या चेहर्या कडे पहिल तिचा चेहरा सूजलेला होता जनू रात्रभर ती झोपली नव्हती.
"आज काय रात्री जाग्रण केल" मी म्हणाली पन मानसी ठोड़ बोलून मौन झाली. महेशला (मानसीचा नवरा) लवकर ऑफिसला जायच होत म्हणुन.आम्ही लवकर घरी परतलो.काम करतांना पन मानसीचा चेहरा आठवत होता .
दुसर्या दिवशी बर ही महनुण मानसी नही आली. मी पन आग्रह केल नही .थोडे दिवस गले पन मानसी रोज मला बोलन टाळायची मानसीच हे रूप मी आधी पहिल नव्हत.माझ्या मनात खूप विचार यत होते.पन मी तिच्या घरी जाण्याचे टाळायची . तिचा नवरा घरी आस्तना आम्ही भेटायचो नाही. महेश बद्दल मानसीने खूप काही सांगितल होते.
थोडे दिवसानंतर एक दुपारी .महेश नसतांना मानसी घरी आली आणि रडू लागली मी घाबरले . मानसीला शांत केले आणि विचारले "कय झाल का रडता"
मानसी ने रडता-रडता संगितल ."महेश ने संगितलए की बाहेर जायच नही "कोणाशी बोलायचे नही."
"का ?पण "मी म्हणाली
"महेश ला माझ्यासोबत राहेच नही आवडत्त"
"तो म्हणतो मला तुझ्याशी लग्न करायच नव्त "
"पन आई साठी केल"
"मला तुझ्यावर प्रेम नही"
"तू चालती हो ईथून"
एवढ़ बोलता - बोलता मानसी खूप रडू लागली .महेशच्या जीवनात आदी पन खूप मैत्रिणी होत्या मानसी मला नेहमी सांगायची.
मानसी गावातली साधी भोळी मूलगी होती. ती मुलींच्या बाबतीत महेशवर शक करायची. पन मी नेहमी तिचा मनातून ती गोष्ट काढून टाकायची. तो मानसीची कळजी करत असायचा .आजकाल स्त्री -पुरुष जवळ काम करतात आस म्हनुण त्यांच्या मनातून तो विचार काढून टाकायची .कदाचीत मला माणसांची पारख नव्हती.मानसी ने सांगितल की पूनम आणि महेश एकमेकांना प्रेम करतात.पूनम त्यांच्या ओफ्फिस मधे काम करते .खूप दिवसांपासून महेश खूप छान वागत होता ज्या गोष्टी त्यांने आधी नही केल्या त्या करत होता खूप प्रेमाने वागत होता.मला वाट्ला मला खूप प्रेम करतो.
मानसी आनाथ होती. तिचे नतेवाइकांनी तिचे लग्न लावले होते.म्हणून ती कोणाला काहिच सांगुशकत नव्हती म्हणून महेशनी तिला नाही संगितल होत .मी मानसीला नेहमी सांगायची की
"महेश वर तुमची जावाबदारी आहे."
"आता व्यवस्तीत काम पन करतोय आणि तुमची कळजी पन करतोय."
पन मी आज किती चुकिची ठरली होती. कोणाला समजवण आणि धीर देन कितप्त योग्य आहे? मी आज स्वताःला पन कुठेना कुठे जावाबदार मानते.
मानसी साधी सरळ होती.पन एक नजरेत माणसाची पारख करत होती.तरी महेशच्या खोट्या प्रेमात फसून तिच्या जवळून महेश लांब जातोय ते तिला कळाल नही. तिने जो विश्वास ठेवला होता तो धुळीला मिळाला.
मानसी एकटी आहे आज दोषी कोण? जी छळली गेली ती मानसी? की ज्यानी छळल तो महेश? की जिने धीर दिला सागळठिक होईल आस आश्वासनं
देणारी मी?