STORYMIRROR

Pruthviraj Vinod Pawar

Tragedy Others

5.0  

Pruthviraj Vinod Pawar

Tragedy Others

शेतकऱ्यांची व्यथा

शेतकऱ्यांची व्यथा

1 min
13K

अरेरे माझ्या शेतकरी बांधवा 

तू घेऊ नको फाशी 

नाहीतर जग राहील उपाशी


शेतकरी रोज शेतात राब राब राबतो

पण नेत्यांना निवडणुकीच्या वेळीच तेवढाा दिसतो.


लाल फितीचा कारभार आणि योजनांचा फार्स 

दुष्काळामुळे घशाखाली उतरत ही नाही घास 


शेतात तू करतोस नांगरणी अन् पेरणी,

निवडणुकीच्या वेळेस नेते करू पाहतात तुझी मनधरणी..


कर्जमाफी करतो म्हणून सत्तेत येऊ पाहतात

सत्तेत आल्यावर कसेेेे बरे हे तुला विसरतात ?


कधी जाणार हा ओला व सुका दुष्काळ

तरच येईल  शेतकऱ्यांच्या दारी चैतन्यदायी सकाळ


लवकरच येऊ  दे बळी राजा चं राज

तरच आणि तरच उतरेल नेत्यांचा माज


भारत वर्षाला गरजेची आहे नवी शेत क्रांती

तरच खऱ्या अर्थाने साजरी होईल मकर संक्रांति 


कोणाला सांगू शेतकऱ्यांची व्यथा

कारण सर्व च राजकीय पक्षांना हवी आहे आपली सत्ता...


अरे माझ्या शेतकरी बांधवा

तू घेऊ नको फाशी

नाहीतर जग राहील उपाशी....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy