STORYMIRROR

Prachi Deshpande

Fantasy Others

3  

Prachi Deshpande

Fantasy Others

अक्षरांशी संवाद

अक्षरांशी संवाद

2 mins
491

काल चुलत बहिणीला अभ्यासाला घेऊन बसले आणि तिचे अक्षरं बघून, शुद्धलेखनाचा सल्ला तिला दिला! तेव्हा चार ओळी मी पण तिला लिहून दाखवल्या. ती म्हणाली , “आता किती छान लिहीलं ग ताई तू, मग हे तुझ्या रजिस्टर मध्ये काय ग अशी अक्षरे ?” तिने म्हटल्यावर मला ही जाणवले, खरंच आहे ! अक्षरं छान नीटनेटकी आली आहेत ! कारण, मनापासून लिहिली होती ती ! तशी माझी अक्षरे गोल-गुळगुळीत ....! पण , मग हे सुद्धा वाटलं की मला हे आजच का जाणवतेय? तेव्हा आवाज आला,“अगं, तुला वेळ कुठे मिळाला आहे , आणि तू कुठे वेळ काढला आहे , शांत बसून एकाग्रतेने कोऱ्या पानावर त्या शाईची चमक बघत अक्षरं गिरवण्याचा ? अभ्यास करताना फक्त भराभर तुझं ज्ञान शब्दांत बांधून हवे तसे अक्षरं कागदावर गिरवले की झालं तुझं ! ” 

माझे अक्षरं माझ्याशी बोलू लागलेत ! आणि मला ते पटलं देखील की खूपच घाई होत आहे ! माझ्याच अक्षरांचं सौन्दर्य जणू मी हिरावून घेतलं !

त्याच क्षणी जाऊन शाळेची एखादी वही, काही लेख कवितांचा कागद , माझ्या नोट्स सगळं जमा केलं आणि जरा संवाद साधला सर्वांसोबत ! 

शाळेत असतांना मोठमोठी गोल गोल अक्षरं पाहून खूप हसू आलं ! पण लहानपणी कसे आपण बिनधास्त होतो ते त्या लिखाणात जाणवत होतं ! स्पष्ट आणि ठळक !! आणि तेवढ्याच ठळक चुका सुद्धा त्या अक्षरांत , पण भीती नव्हती चुकांची ...

नंतर शिक्षकांचा ओरडा खात खात, “अगं किती मोठी ती अक्षरं तुझी , रेखीव आहेत पण जरा लहान काढ सुंदर दिसतील.” आणि मी पण ते ऐकलं ! हळूहळू बदल होत कॉलेज मध्ये असतांना ती रेखीव, सुटसुटीत आणि आकर्षक झाली होती !!!! 

ते बघून असं वाटलं की माझ्या स्वभावाचे त्या लिखाणात प्रतिबिंब दिसते आहे !!! असेल का असं ? ज्यांची अगदी मोजून मापून काढलेली अक्षरे ते शिस्तबद्ध, ज्यांची अक्षरे थोडी मोठी आणि त्या अक्षरांना हेलकावे, असे असणारे लोक मुक्तछंद ! असा एक अंदाज आणि थोडं निरीक्षण !!! 

तर, असा सगळा स्वतः च्या अक्षरांचा बदल मी लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनुभवला ! मग लक्षात आलं की अभ्यासाचा वाढलेला भार, स्पर्धेचं युग, यात माझ्या अक्षरांना मी असं धावायला लावलं की त्यांचं सौन्दर्य कमी होत गेलं ! जो आल्हाददायक अनुभव त्या अक्षरांना डोळ्यात साठवून मिळायचा , तीच अक्षरे आज डोळ्याखालून घालणं कठीण होत होतं ! आणि जी अक्षरे मलाच भावली नाहीत , ती उद्या वाचकांना, परीक्षकांना कशी भावणार ???? 

एकच वाक्य ठराविक जणांनी लिहिलं तरी वेगवेगळी अक्षरे वाचकांवर वेगवेगळा प्रभाव पाडतात ! म्हणून, त्या अक्षरांचे सौन्दर्य , त्याची सुबकता , ठळकपणा हे आपल्याच व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असतं हे मला लक्षांत आले ! 

आणि आज जशी तल्लीन होऊन लिहायला बसले, त्याच श्रद्धेने मी माझी लेखणी रोज धरेल आणि रोज माझ्या अक्षरांच्या प्रेमात नव्याने पडेल असे मी ठरवले !!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Fantasy