STORYMIRROR

sairam sonawane

Inspirational

4  

sairam sonawane

Inspirational

शिव जयंती

शिव जयंती

3 mins
0

*शिव जयंती*


आजचा दिवस हा केवळ उत्सवाचा नाही,
तर स्वाभिमान जागवण्याचा दिवस आहे…
आजचा दिवस हा केवळ जयंतीचा नाही,
तर इतिहासाला वंदन करण्याचा दिवस आहे…

आज आपण स्मरण करतो त्या तेजस्वी सूर्याचं,
ज्याने परकीयांच्या अंधारात स्वराज्याचा प्रकाश पेटवला…
त्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाचं नाव — *छत्रपती शिवाजी महाराज!*

महाराज म्हणजे फक्त एक राजा नव्हते,
ते विचार होते…
ते ध्येय होते…
ते शौर्य, संयम आणि न्याय यांचं जिवंत प्रतीक होते.

ज्या काळात अन्याय राज्य करत होता,
ज्या काळात स्त्रियांचा सन्मान धोक्यात होता,
ज्या काळात स्वधर्म, स्वभाषा आणि स्वाभिमान दडपला जात होता…
त्या काळात एका तरुणाने रायरेश्वराच्या मंदिरात उभं राहून
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे”
असं जाहीर केलं —
आणि इतिहासाचा प्रवाहच बदलला!

महाराजांनी किल्ले जिंकले,
पण आधी माणसं जिंकली…
महाराजांनी युद्ध केलं,
पण कधीही अन्यायासाठी नाही…
महाराजांनी तलवार चालवली,
पण तिच्या धारेवर सदैव धर्म, न्याय आणि जनकल्याण ठेवलं.

त्यांच्या सैन्यात जाती नव्हत्या —
फक्त शौर्य होतं.
त्यांच्या दरबारात भेदभाव नव्हता —
फक्त गुणवत्ता होती.
आणि त्यांच्या राज्यात भीती नव्हती —
फक्त सुरक्षितता होती.

महाराजांनी स्त्रियांचा सन्मान राखला,
शत्रूच्या स्त्रीलाही आई-बहिण मानलं…
म्हणूनच ते फक्त योद्धा नाहीत —
तर संस्कारांचे सम्राट आहेत.

मित्रांनो,
आज आपण किल्ले जिंकायचे नाहीत,
पण मन जिंकायची आहेत…
तलवार उचलायची नाही,
पण शिक्षण, कर्तृत्व आणि प्रामाणिकपणाने नाव कमवायचं आहे…

कारण आजचं स्वराज्य म्हणजे —
स्वत:वर विजय मिळवणं.
वाईट सवयींवर मात करणं.
आणि देशासाठी उपयोगी नागरिक बनणं.

चला तर मग,
या शिवजयंतीला आपण फक्त घोषणाच करू नयेत —
तर संकल्प करूया…

अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा…
स्त्रियांचा सन्मान राखण्याचा…
स्वभाषा, स्वसंस्कृती जपण्याचा…
आणि प्रामाणिकपणे यश मिळवण्याचा…

महाराजांना समजून घ्यायचं असेल,
तर त्यांना फक्त तलवारीत शोधून चालणार नाही…
तर त्यांना राज्यकारभारात, समाजधोरणात, स्त्रीसन्मानात,
धर्मनिरपेक्षतेत आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनात शोधावं लागेल.
१७व्या शतकातील भारताची राजकीय अवस्था पाहिली,
तर ती भीषण होती…
परकीय सत्तांनी देश ताब्यात घेतला होता…
स्थानिक सत्ताधीश जनतेपासून दुरावले होते…
धर्माच्या नावाखाली अत्याचार होत होते…
आणि सर्वसामान्य माणूस भीतीत जगत होता…
अशा वेळी शिवाजी महाराजांचा उदय झाला —
तो केवळ राजकीय घटना नव्हती…
तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांतीचा प्रारंभ होता.
महाराजांनी “स्वराज्य” हा शब्द वापरला —
आणि इथेच त्यांची महानता दिसते.
कारण त्यांनी “माझं राज्य” असं म्हटलं नाही…
“स्वराज्य” म्हटलं.
याचा अर्थ —
राज्य हे राजाचं नसतं…
ते जनतेचं असतं.
ही संकल्पना त्या काळात क्रांतिकारी होती.

महाराजांनी “स्वराज्य” हा शब्द वापरला —आणि इथेच त्यांची महानता दिसते.

कारण त्यांनी “माझं राज्य” असं म्हटलं नाही…“स्वराज्य” म्हटलं.

याचा अर्थ —राज्य हे राजाचं नसतं…ते जनतेचं असतं.

ही संकल्पना त्या काळात क्रांतिकारी होती.

महाराजांनी किल्ले जिंकले —पण त्याहून मोठं म्हणजे लोकांचा विश्वास जिंकला.

त्यांनी प्रशासन उभारलं —पण ते शोषणासाठी नव्हे, तर संरक्षणासाठी.

अष्टप्रधान मंडळाची रचना,राजस्वव्यवस्था,लष्करी संघटना,आरमार उभारणी —

हे सर्व पाहिलं तर लक्षात येतं कीमहाराज फक्त योद्धा नव्हते…तर ते दूरदर्शी राष्ट्रनायक होते.

मित्रांनो,आज आपण २१व्या शतकात उभे आहोत…तंत्रज्ञानाने जग जवळ आलंय…लोकशाही राज्यघटना आहे…स्वातंत्र्य आहे…

पण प्रश्न असा आहे —आपण स्वराज्य जगतो आहोत का?

स्वराज्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्ती नाही…तर स्वतःच्या दुर्गुणांपासून मुक्ती आहे…स्वार्थावर विजय आहे…अनुशासनाचं स्वशासन आहे.

आजची लढाई सीमांवर नाही…तर मनांमध्ये आहे…भ्रष्टाचाराविरुद्ध आहे…अज्ञानाविरुद्ध आहे…नैतिक अध:पतनाविरुद्ध आहे…

आज आपल्याला तलवार नको —तर चारित्र्य हवं आहे…किल्ले नको —तर कर्तृत्व उभारायचं आहे…युद्ध नको —तर राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यायचं आहे.

शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व नाही…तो एक अखंड प्रेरणास्रोत आहे…तो एक विचारसंस्कृती आहे…तो एक जिवंत राष्ट्रधर्म आहे…

जोपर्यंत स्वाभिमान जिवंत आहे,तोपर्यंत शिवराय जिवंत आहेत…

जोपर्यंत न्याय जिवंत आहे,तोपर्यंत स्वराज्य जिवंत आहे…

म्हणून चला —शिवजयंती साजरी करण्यापुरती मर्यादित ठेवू नका…तर शिवविचार आपल्या जीवनपद्धतीत रुजवा…

*जय भवानी!जय शिवाजी!* 🚩
*लेखन:- साईराम ज्ञानेश्वर सोनवणे*
*(कुकाने ता. मालेगाव जि. नाशिक)*


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational