संवाद - मग , "चूक कोणाची" ?
संवाद - मग , "चूक कोणाची" ?


पत्नी : जर आपल्या आई-वडिलांंची सेवा करण्याची जबाबदारी आणि अधिकार जर मुलींवर असला असता तर ......
पती : तर काय ?
पत्नी : अहो ! काही नाही , आता राहू द्या !
पती : अगं ! ऐकतोय मी बोल ना पुढे .....
पत्नी : जर आई - वडिलांंची सेवा करण्याचा हक्क मुलींना दिला असता तर या देशात "वृद्धाश्रम" नावाचा शब्दच संपुष्टात आला नसता .
पती : का ?
पत्नी : कारण या देशात एकही वृद्धाश्रम राहिला नसता .
पती : एकदम चूक !
पत्नी : चूक कोणाची ?
पती : प्रत्येक मुलींची !
पत्नी : . ते कसे ?
पती : अगं ! काही नाही राहू दे ना आता !
पत्नी : . सांगा ना ! ऐकतेय मी .
पती : . जर प्रत्येक मुली लग्न झाल्यानंतर आपल्या सासरलाच माहेर समजून व तसेच आपल्या सासू-सासर् यांनाच आपले आई-वडील समजून दोन शब्द प्रेमाचे बोलत असले तर देशात काय पूर्ण जग फिरलो तरीही एक वृद्धाश्रम दिसला नसता !!!