नामस्मरण
नामस्मरण
||नामप्रभात||
श्रीराम
भक्ती करण्यासाठी तीर्थी जावेच लागते हे काही बरोबर नाही. महादेव शंकरासारख्या देवाधिदेवाने हा उपदेश सतीला केला होता. जगात भटकण्याने शांती मिळत नसते, मग ते भगवंताच्या प्राप्तिकरता का असेना! जोवर मनात कुठे जावं, काही करावं अशी जड भावना वास करते, तोवर तुमच्या मनात परमात्मा येत नसतो. कारण फार भटकणाऱ्याची बुद्धीही भटकत असते.
जो मनुष्य जेथे बसला असेल, तेथेच त्याने भक्ती करावी. एकाच जागी बसून प्रभूला प्रसन्न करा. हीच उत्तम भक्ती होय!
श्रीमद्भागवतरहस्य (पू. डोंगरेमहाराज)