विदर्भ
विदर्भ
विदर्भाची महान गाथा, रचली ही इतिहासातं
गायीली हर मुखांनी, पिढ्यानपिढ्या केली आत्मसातं
पावन वैनगंगा पेनगंगा , जोपासती घट्ट मैत्रीची
पाऊलखुणा रूजली अनंत, ऋषी संत अवतारांची
जपला बाणा सहिष्णुतेचा , धरोधर संस्कारांची पिरूनं
कालीदासाचे मेघदूत सर्वसेनाचा , हरीविजय ग्रंथ रचूनं
बौद्ध धर्म जैन धर्म शिरपूरात वसले , भूमी ती झाली
पावनं
मातीच्या उदरातून कृषी , उत्पन्न निर्मिली
विणकराचा विकासाची दिशा, अद्भूत घडविली
धन्य धन्य झाले शिवराय, जिजाऊचा ममतेच्या छायेनी
सिंदखेड जन्मस्थान या माऊलीचे, थोरवी दिली या मातीनी
रुसली आज ही माया, जनजनांच्या मनोवृत्तीनी
प्रश्र्न अनेक उद्गारले, नकारात्मकतेच्या मानसिकतेनी
विकासाचे सामाजिकरण कुंठले, अंधश्रद्धेचा मार्गिकरणानी
विदर्भ वेगळा व्हावा, या कुटील कारस्थान राजकारणानी
होतेय हानी अखंड भारत भूची , या एकात्मकतेवर स्वार्थी विचारांनी....