त्रिवार अभिवादन
त्रिवार अभिवादन
कशाला ? ठेवू विश्वास दुस-यावर
स्वतः च इतिहास जाणू आत्ता,
वाचू दे मला पान ते "भारतीय संविधानाचे"
डॉ.भीमराव आंबेडकर यानी केलेल्या सहीचे सोनेरी पान....!
"तरी आम्ही बोलू नये.."
प्रत्येक माणसाला कळू दे भारताचे संविधान
जाणून घ्या रे विचार बाबासाहेबाचे
कलमे जाणा ती एक एक अधिकार नियमाची....!
किती ? लढला भीम अमुच्या हक्कासाठी
जाळून ती मनुस्मृती केले आम्हा मुक्त गुलामीतूनी
चाकले चवदार पाणी आठवा रे ओंजळी
केला प्रवेश तो काळाराम मंदिरी....!
कोटी कोटी लेकराचा
बाप तो निघाला
अश्रू वाहतो झरा
लेकरे रडती आसवांनी....!
अंधारली प्रभा तुझ्याविना
सुखाची न ठेवा दु:खाचा आसरा
जन्म तुझा रमे शिक्षणात सदा
बहाल केले भारतीय संविधान देशा....!
आईची साऊली तू दिली आम्हाला
अश्रूनी घायाळ ओले होई डोळे
तोच रमाईचा कुंकू धनी संसाराचा
झाके नयन अंतिम भेटी सदा....!
आसंवाचा आठला महासागर असा
मावळतीला जातो दु:ख लपवून पुन्हा
दुःखाचा मेळा रडून पाहती तुझ्यापाशी
हबंरडा फोडती तुझी लेकरे आत्ता....
सुटला कुणा निती नियतीचा शेवट
आसंवानी घेरले काळानी कसे ?
नटून फुलांनी अश्रूच्या आसंवानी
दूर तू कुठे ? निघाला मायबापा...!
बुध्दम शरणम् गच्छामी
धम्मम शरणम् गच्छामी
संघम् शरणम् गच्छामी