तोल...!
तोल...!
कडी कधी अस वाटत
जग सार बॅलन्सड जीवन जगत
आपलंच घोड का सदा
सारख पेंड खातं
कितीही प्रयत्न केले
तरी घडी जीवनाची बसत नाही
एकही दिवस विवंचने शिवाय
कधी सरत नाही
त्रागा करून तरी काय उपयोग
म्हणून आता रागही येत नाही
निस्क्रीयतेचे लेबल लागता
आता खंतही वाटत नाही
आळवावरच्या पाण्यासारखे
दिवस उमेदीचे सरून गेले
मृगजळा मागे धावून धावून
उराचे पुरते अनेक तुकडे झाले
पाहण्यारांनी पाहून घेतले
प्रत्येकाने हात धुवून घेतले
चांगलेच भाऊबंदकीचे बिगुल वाजले
संसाराचेही पुरते बारा वाजले
आता तारेवरच्या कसरितेचे
अप्रूप काही उरले नाही
चिंतेचे कारण जे होते
तेही आता शिल्लक राहिले नाही
तोल हा शब्द फक्त मला
आतून सावरायला खुणावत राहतो
म्हणून तर सारे विसरून पुन्हा
मी जीवनाचा नवा डाव मांडतो.....!