महिमा कवी कालिदासाची
महिमा कवी कालिदासाची
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
कालिदास सांगून गेले,
अवगुण छोटा वा मोठा।
व्यक्तीला संपवून टाकतो ,
चांगल्या सवयीचा तोटा । ।
कोणतेही काम करा,
ज्यात परिश्रम आहे खरा ।
त्याच्या थकवा राहत नाही,
जर परिणाम होतो बरा । ।
सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी,
सूर्याची लाली दिसते खरी।
महान व्यक्ती सुखदुःखातही,
एकसारखी राहते बरी। ।
दगडांच्या तुकड्यांना समजतो,
अज्ञानी हा रत्न खरा।
पृथ्वीचे अन्नश, पाणी, सुवचन ,
हे तीन रत्ने न कळे त्याला। ।
वस्तू जूनी असल्यावर ती,
वाईट होईल असं नाही।
माणसाच्या उत्तम गुणाने,
त्याची किंमत कमी नाही। ।
सत्य आणि धैर्यवान पुरूष,
आपली ओळख ठरवितो।
कठिण समयी साहस धैर्याने,
आपले काम तो करितो। ।
दान पुण्य केल्याने मिळते,
सुखी समृद्धी पर लोके।
माता पित्याच्या सेवेने मिळते,
परम् सुख दोन्ही लोके। ।
बिन स्वार्थाने सूर्य ही आपला,
प्रकाश सर्वाना देतो।
सज्जन पुरूषही दुसऱ्याच्या, मदतीला धावून येतो.। ।