गाव सारं जळत गेलं
गाव सारं जळत गेलं
गाव तस चांगलं पण वेशीला टांगलं
सरपंचाच्या निडणुकीसाठी एकमेकांसमोर उभं ठाकलं IIध्रु II
जशी जशी निवडणूक जवळ आली
तशीतशी गावांमध्ये रणधुमाळी सुरु झाली ,
मनामनांतजिकंण्याचे मनसुबे दिसु लागले
आणिगटागटांत जबर डाव रंगू लागले .
उमदेवार झाले जाहीर आणि फुकले रणशिंग
एकदाचं वाजतगाजत सुरु झाले घुमशान ,
पक्ष नाही म्हटलं तरी पॅनल पुढं आलं
नात्यानात्यांमध्येच दरी निर्माण करून गेलं .
भावाभावाच्या नात्यांतील ती बघवत नव्हती दरार
माहित नव्हतं पद मिळेल की व्हावं लागेल फरार ,
लाखो रुपयांचा चुराडा मात्र केला
आणि त्याबरोबरच एकमेकांवरील विश्वासही गमावला .
चहाच्या वक्ताला पारापारावर रंगायच्या चर्चा
अर्धा कप एकाचा आणि प्रचार दुसऱ्याचा ,
तिसऱ्याच्या मिसळीवर ताव मारायचा
आणि चौथ्याच्या हातात हात द्यायचा .
नेहमीगरिबांना पायदळी तुडवणाऱ्याला
आता लागले रोजच हात जोडायला ,
दिवसाला भेळीचे पुडे आणि भेटीगाठींचा सपाटा
रातच्याला दारूचा धिंगाणा आणि ढाब्यावरच्या पार्ट्या .
गावाचा विकास घडवू म्हणनारा सावकाराचा दलाल
साड्यांचे गठ्ठे आणि नोटांची तोडू लागला बंडलं ,
रोज शांत दिसणारा गावही मी कित्येक वर्ष अनुभवला
निडणुकीच्या पहिल्या रात्री मात्र त्याला मी विकताना पहिला .
आम्हीच बसवले धाब्यावर लोकशाहीला
आणि दड्पशाहीचा माज ही दिसला ,
डोळ्यांतला आमच्याच निर्दयी स्वार्थ मला दिसला
शे-पाचशे रुपयांसाठी स्वाभिमानही विकलेला पहिला .
कुणीकुणी सुंदर गावांची मोठी दिवा-स्वप्ने पहिली
मात्र दुसऱ्या दिवसाच्या निकालाने ती अधुरीच राहिली ,
पुन्हा गुलालाचा डोंगर आणि रस्ते लालेलाल झाले
ढोलताशाच्या गजराने गावं सारं दणाणून गेलं .
पुढील पाच वर्षासाठी एकमेकांच्या
मनात खोल दरी बनवून गेलं ,
पराभवाच्या ईर्ष्येने गाव सारं जळत गेलं
गाव सारं जळत गेलं