कविता
कविता
1 min
381
आत्म्यांची होते तडफड
अनेक कारणांवरून जेव्हा
तगमग ती सोसवत नाही
तेव्हा भावना बनतात शाई
अन् शब्दरूपी लेखणीतून प्रसवते
एक अप्रतिम कविता . .अलगद!
आत्म्याला मिळते तृप्तता अनोखी
अन् कागदही सुखावतो लेखणीला पाहून!