चारोळी
चारोळी


१.
प्रेमात किती ताकत आहे
हे प्रेमात पडल्यावर कळतं
कुणासाठी प्रेमानं जपलेलं हृदय,
कुणासाठी तरी उरात जळतं
--------------------
२.
दुःख मला रोज छळते
वेदनांची सल अश्रूंना कळते
मनाच्या गाभाऱ्यातून दुःख
पापण्यांच्या दारातूनओघळते
--------------------
३.
माझं मन अथांग नदीसारखं
सुखदुःख,वेदना सामावूनघेतं
आली संकटं उरात साठवतं
ध्येयासाठी जगण्याशी लढतं
--------------------
४.
शब्दांशी जोडू शब्दांचे मोती
साहित्यातून जोडू नवी नाती
कवितेतून करुन शब्द शृंगार
फुलवू प्रबोधनाचा सुप्त अंगार
--------------------
५.
वाळूतल्या चिंब पाऊलखुणा
फेसाळल्या लाटांनी मिटवल्या.
भेटीच्या ओलेत्या आठवणी
सागराने मिठीत साठवल्या.
--------------------
६.
पिसारा फुलवून नाचणाऱ्या
मोराला अश्रूंचा शाप आहे.
मुक्या सौंदर्याच्याकाळजाला
नियतीच्या वेदनेचे पाप आहे
--------------------
७.
मनाला स्वप्नांचा शाप आहे
डोळे मिटल्यावर डोकावतात
उध्वस्त झाल्यावर ती सारी
मनही उध्वस्त करुन जातात
--------------------
८.
ज्यांच्या जीवावर जगतो आम्ही
निर्धास्त ते आपुली शान
रात्रदिन थकली नाही सेवा
ज्यांची ते जय जवान जय किसान
--------------------
९.
कळ्यांची फुलं व्हावी तशी
शब्दांचीही फुलं उमलतात
सुगंधातुन मनाच्या भावना
कवितेच्या ओळींनी फुलतात
--------------------
१०.
जगण्याची लढाई असं लढायचं,
कधी तू भांडायचं,कधी रुसायचं.
आयुष्यात सुखदुःखाच्या वळणावर,
दोघांनी प्रेमानं हसतच जगायचं.
--------------------
११.
मनाच्या आरशावर भावनांचे
शब्द कवितेत रेखाटत गेलो.
शब्दांचे प्रतिबिंब उमटत गेले
आठवणींचे क्षण साठवत गेलो.
--------------------
१२.
प्रेमाची भाषा कळायला
शिक्षण नसलं तरी चालतं
शब्द न वाचताही मनाशी
मन सारं इशाऱ्यानं बोलतं
--------------------
१३.
<p>तू न मी कितीदा ठरवलंय
अखंड प्रेमानं दोघ वागायचं
पण,तू सोडून गेल्यावर मला
सांग विरहात कसं जगायचं
--------------------
१४.
आयुष्य जगताना सुख,दुःख
वेदनांशी चांगली मैत्रीजमली
कधी रडत,कढत तर कधी हसत खेळत नाती जपली.
--------------------
१५.
जगणं पोरकं झाल्यावर
मुलाला आईचं महत्व कळतं
लढ म्हणायला कुणी नसलं की बापाचं महत्व कळतं
--------------------
१६.
मनाच्या डायरीत पानोपानी
प्रेमाची आठवण लपलीआहे
पाने खराब झाली तरी शब्दांनी प्रीत आपली जपली आहे
--------------------
१७.
तुझ्या आठवणींचे सोनेरी क्षणओंजळीत होते जपलेले.
क्षणात नकळत सारे क्षण
फसवून मला विरुन गेले.
--------------------
१८.
जगण्याची लढाई एकट्याची असते,
बाकी सारे सोबत असतात.
वेदना,यातना एकट्याने सोसायच्या,
बाकी सारे सहानुभूतीला
असतात.
---------------- ----
१९.
शब्द लेखणीत साठवून मी
कवितेने श्रीमंत झालो.
शब्द सारे पाठवून मी
शेवटी रिकामाच झालो.
--------------------
२०.
ह्रदयात जपलेल्या भावना
शब्दांनी पेरत गेलो.
अंकुरलेले शब्द मनातले
कवितेत जपत गेलो.
--------------------
२१.
मनाच्या खोप्यामधी एक पाखरु गुटर-गु करते आहे.
सांकेतीक भाषेत प्रेयसीला
प्रेमाने साद घालते आहे.
--------------------
२२
आपलं नातं हजारात कळतं
जिव्हाळाही निर्माण करतं
नातं आपुलकीचं असलं की
मन मनाशी अलगद जुळतं
--------------------
२३.
हल्ली प्रेमावर मी लिहीत नाही
मनाच्या पटलावर झालेल्या
अन विसरुन गेलेल्या
जुन्या जखमांना ताजे करत नाही.
------------------
२४.
तुझ्या नजरेत हरवत गेलो,
आणि स्वप्न होऊन बसलो.
क्षणिक जगणं जगत गेलो,
भंगून गेल्यावर शून्य झालो.
-------------------
२५.
कधी कधी शब्दही रडतात
त्यांची आसवं पुसणार कोण
त्यांच्या वेदनांवर फुंकर घालून
त्यांवर मलम लावणार कोण