विश्व कप आणि क्रिकेट
विश्व कप आणि क्रिकेट
क्रिकेट हा एकमेव असा भारतातील लोकप्रिय खेळ
जो लहान थोर प्रत्येक जण पाहतो काढून वेळ
वल्ड कप जसा सुरू होणार असतो
सगळा भारतच जणू सज्ज होवून जातो
गोलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजाकडे भिरकावतो
प्रत्येक प्रेक्षकच जणू चेंडूचा तो प्रवास जगतो
जेव्हा तो चेंडू आकाशात उंच झेप घेतो
पाहणाऱ्या प्रत्येकाचेच ह्रूदय ठोठावतो
क्रिकेटची चर्चा करण्यास नाही ओळख लागत
प्रत्यक्षात कधीही न खेळणाराही मांडतो स्वत:चे असे मत
पण त्यातूनही जेव्हा भारत पाकिस्तानची मँच असते
युध्दासम वातावरणात इंडियाची लढत सुरू होते
कपिल आणि धोनीने जिंकवून दिला होता विश्व कप या आधी भारताला
तसेच यश मिळून इतिहास रचन्याचे सामर्थ्य मिळो विराटच्याही टीमला