सत्तावीस एप्रिल(27)
सत्तावीस एप्रिल(27)
बा रा म्हंटल की आपल्याला
रा त्रीला सुद्धा दचकून जाग येते
व्या धीग्रस्त जीवाला
दि वसासुद्धा घेरी येते......!
व नवास परवडला पण
सा वली देखील नको वाटते
चि डचिड होते अंतराची
सां गड घालणे सुद्धा नको वाटते...!
ज रा कोठे मोकळा श्वास घ्यावा
छा न छान काहीतरी ऐकावे तर
न सते ताप डोक्यास होतात
बाराच्या भावात सारे
मनसुबेच उद्ध्वस्त होतात...!
लाख मोलाची जिंदगी आपली
कोटी बहाद्दरांनी बेहाल केली
वाटते नशिबाने कशी ही असली
क्रूर चेष्टाच की हो मांडली....!
तरीही तिन्ही सांजेला
नभात चन्द्र हसत आहे
चांदणीही पहा कशी
त्यास साथ दूर राहुनी देत आहे....!