समेट
समेट
1 min
97
जेव्हा पावसाने दुष्काळाशी
संगनमत करून घेतली फारकत,
तेव्हा मात्र ही गोष्ट मातीच्या वर्मी लागली....
मग मात्र,
मातीनेही सूर्याशी संधान बांधले....
जमिनीवरील आणि आतील पाण्यावर
खावटीचा दावा दाखल केला....
मग काय,
हाहाःकार माजला सर्वत्र...
शेवटी
निसर्गाने पुढाकार घेतला....
पाऊस आणि मातीचे समुपदेशन केले
आणि
देव - दानव आणि मानव साक्षीने
समेट घडवून आणला दोघांत....
आणि
दोघांच्या मनोमिलनाने
चैतन्य पसरले सर्वत्र...
