पाणी ....!
पाणी ....!
आज ग्लोबल वार्मिंगच्या युगात
घोटभर पाणी मिळविण्यासाठी
पार्थालाही विचार करावा लागेल
हजारदा ....
गांडीव धनुष्याची प्रत्यंचा चढवितांना
कारण ;
पाणी सार्वजनिक कुठे राहिलंय आता ?
भगीरथही विचार करेल हजारदा
गंगेला धरतीवर आणण्यासाठी ,
गंगेला अपवित्र करण्यासाठी
करोडो हाथ इथे सज्ज असतांना ....
कारण ;
पाणी एवढे कुठे निर्मळ राहिलंय आता ?
पाणी पेटू लागलंय चराचरात
वैश्विक युद्धाचे बीजारोपण
ह्या पाण्यामुळे होईल की काय असे वाटतेय
मनःशांती करणारे ,
तनशुद्धी करणारे
पाणीही पेटू लागलंय आता ....!!!!
